शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीला जाणाऱ्यांची गय नाही

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणेमधील घटना यानंतर होणार नाही, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आरोपी निर्दोष सोडता येणार नाहीत.

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणेमधील घटना यानंतर होणार नाही, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आरोपी निर्दोष सोडता येणार नाहीत. यातून काय मार्ग काढता येईल, याची जबाबदारी वन्यजीव विभाग घेईल; मात्र यापुढे जंगलात शिकारीला जाणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वन्यजीव विभाग पुणेचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिला.लिमये यांच्या अध्यक्षतेखाली आहुपे येथील देवराईत भीमाशंकर अभयारण्यात येणाऱ्या गावांची बैठक आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. बैठकीस मोठा समुदाय उपस्थित होता. शाश्वत संस्थेच्या कुसुमताई कर्णिक, सुभाषराव मोरमारे, मारुती लोहकरे, भीमा गवारी, संजय गवारी, रमेश लोहकरे, बुधाजी डामसे, बबनराव घोईरत, जावती गवारी, कोंडिबा तळपे, शंकर लांघी यांनी अभयारण्यात राहणाऱ्या लोकांच्या मागण्या मांडल्या. तसेच, पिंपगरणे घटनेत शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, त्यांची निर्दोष मुक्तता करावी, अशी मागणी केली. वाघोरी, भाला, कोयते, कुऱ्हाड, हाडबे याचा वापर जंगलातील लोक करणारच. यावर निर्बंध घालू नयेत; अन्यथा भीमाशंकरचे गडचिरोली होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी या वेळी दिल्या. भीमाशंकर अभयारण्याचे अद्याप फायनल नोटिफिकेशन झाले नसल्यामुळे येथील लोकांचे हक्क व अधिकार निश्चित झाले नाहीत. सन २००५ च्या कायद्यात वनजमिनींवर सामूहिक व वैयक्तिक हक्क देण्यात आले आहेत. परंतु त्याबाबत अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. जंगलातून जाताना आदिवासींना पारंपरिक हत्यारे वापरण्यास निर्बंध घालू नये, वनविभागातील विविध विकासकामांना अडथळा करू नये, जंगली प्राण्यांपासून शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, आहुपे-कोंढवळ रस्ता मंजूर व्हावा, रानडुकरांच्या शिकारीला परवानगी मिळावी, भीमाशंकर मंदिर परिसरात दुकाने लावण्यास अडथळा करू नये, अशा मागण्या केल्या.सुनील लिमये म्हणाले, की जंगल राखण्याची जबाबदारी जेवढी वन्यजीव विभागाची आहे, तेवढीच स्थानिक वनकमिट्यांची आहे. त्यामुळे पिंपरगणेसारखी घटना पुन्हा होणार नाही,याची दक्षता वन कमिट्यांनीच घ्यावी. येथून पुढे स्थानिक कुठलीही व्यक्ती जंगलातून कोयता घेऊन जाताना वनकर्मचारी अडवणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वाघोरी, भाले, कोयता याची सर्व माहिती वनपाल यांना द्यावी. शिकारीसारखा कोणताही गुन्हा पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. या वेळी सहायक वनसंरक्षक आर. एन. नाले, भीमाशंकर वनक्षेत्रपाल तुषार ढमेढरे हे उपस्थित होते. (वार्ताहर)डुक्कर मारायला लेखी परवानगी देणार रानडुकरांमुळे शेतीचे नुकसान होत असेल, तर मालकीत आलेले डुक्कर मारा. यासाठी लेखी अर्ज वनक्षेत्रपाल यांच्याकडे करा. डुक्कर मारण्याची परवानगी दिली जाईल. याचा गैरफायदा कोणी घेणार नाही, याची काळजी घ्या. जंगलात जाऊन कोणताही वन्यप्राणी मारू नका, असे घडल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होईल. ४कोंढवळ बंधाऱ्याचे काम वन्यजीव विभागामुळे अडलेले नसून, जलसंपदा विभागामुळे अडले आहे. फायनल नोटिफिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारे लोकांची शेती अभयारण्यात घेण्यात येणार नाही. सामूहिक व वैयक्तिक हक्कांचे दावे लोकांना मिळालेच पाहिजेत,यासाठी लागेल ती मदत केली जाईल. ४वनविभागाच्या हद्दी ठरवून चिरे रवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. कोणाचीही जमीन वनविभाग घेणार नाही. ४जंगली प्राण्यांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची नुकसानभरपाई दिली जाईल. रस्त्यांच्या डागडुगीजीचे कोणतेही काम करताना अडवले जाणार नाही, फक्त यासाठी दोन दिवस अगोदर लेखी अर्ज आमच्याकडे दिला जावा, असे लिमये यांनी सांगितले.