शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीला जाणाऱ्यांची गय नाही

By admin | Updated: December 31, 2014 23:29 IST

भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणेमधील घटना यानंतर होणार नाही, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आरोपी निर्दोष सोडता येणार नाहीत.

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील पिंपरगणेमधील घटना यानंतर होणार नाही, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. हे प्रकरण न्यायालयात गेल्याने आरोपी निर्दोष सोडता येणार नाहीत. यातून काय मार्ग काढता येईल, याची जबाबदारी वन्यजीव विभाग घेईल; मात्र यापुढे जंगलात शिकारीला जाणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा वन्यजीव विभाग पुणेचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिला.लिमये यांच्या अध्यक्षतेखाली आहुपे येथील देवराईत भीमाशंकर अभयारण्यात येणाऱ्या गावांची बैठक आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. बैठकीस मोठा समुदाय उपस्थित होता. शाश्वत संस्थेच्या कुसुमताई कर्णिक, सुभाषराव मोरमारे, मारुती लोहकरे, भीमा गवारी, संजय गवारी, रमेश लोहकरे, बुधाजी डामसे, बबनराव घोईरत, जावती गवारी, कोंडिबा तळपे, शंकर लांघी यांनी अभयारण्यात राहणाऱ्या लोकांच्या मागण्या मांडल्या. तसेच, पिंपगरणे घटनेत शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, त्यांची निर्दोष मुक्तता करावी, अशी मागणी केली. वाघोरी, भाला, कोयते, कुऱ्हाड, हाडबे याचा वापर जंगलातील लोक करणारच. यावर निर्बंध घालू नयेत; अन्यथा भीमाशंकरचे गडचिरोली होईल, अशा संतप्त प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी या वेळी दिल्या. भीमाशंकर अभयारण्याचे अद्याप फायनल नोटिफिकेशन झाले नसल्यामुळे येथील लोकांचे हक्क व अधिकार निश्चित झाले नाहीत. सन २००५ च्या कायद्यात वनजमिनींवर सामूहिक व वैयक्तिक हक्क देण्यात आले आहेत. परंतु त्याबाबत अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. जंगलातून जाताना आदिवासींना पारंपरिक हत्यारे वापरण्यास निर्बंध घालू नये, वनविभागातील विविध विकासकामांना अडथळा करू नये, जंगली प्राण्यांपासून शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, आहुपे-कोंढवळ रस्ता मंजूर व्हावा, रानडुकरांच्या शिकारीला परवानगी मिळावी, भीमाशंकर मंदिर परिसरात दुकाने लावण्यास अडथळा करू नये, अशा मागण्या केल्या.सुनील लिमये म्हणाले, की जंगल राखण्याची जबाबदारी जेवढी वन्यजीव विभागाची आहे, तेवढीच स्थानिक वनकमिट्यांची आहे. त्यामुळे पिंपरगणेसारखी घटना पुन्हा होणार नाही,याची दक्षता वन कमिट्यांनीच घ्यावी. येथून पुढे स्थानिक कुठलीही व्यक्ती जंगलातून कोयता घेऊन जाताना वनकर्मचारी अडवणार नाही. आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वाघोरी, भाले, कोयता याची सर्व माहिती वनपाल यांना द्यावी. शिकारीसारखा कोणताही गुन्हा पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. या वेळी सहायक वनसंरक्षक आर. एन. नाले, भीमाशंकर वनक्षेत्रपाल तुषार ढमेढरे हे उपस्थित होते. (वार्ताहर)डुक्कर मारायला लेखी परवानगी देणार रानडुकरांमुळे शेतीचे नुकसान होत असेल, तर मालकीत आलेले डुक्कर मारा. यासाठी लेखी अर्ज वनक्षेत्रपाल यांच्याकडे करा. डुक्कर मारण्याची परवानगी दिली जाईल. याचा गैरफायदा कोणी घेणार नाही, याची काळजी घ्या. जंगलात जाऊन कोणताही वन्यप्राणी मारू नका, असे घडल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होईल. ४कोंढवळ बंधाऱ्याचे काम वन्यजीव विभागामुळे अडलेले नसून, जलसंपदा विभागामुळे अडले आहे. फायनल नोटिफिकेशनमध्ये कोणत्याही प्रकारे लोकांची शेती अभयारण्यात घेण्यात येणार नाही. सामूहिक व वैयक्तिक हक्कांचे दावे लोकांना मिळालेच पाहिजेत,यासाठी लागेल ती मदत केली जाईल. ४वनविभागाच्या हद्दी ठरवून चिरे रवताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. कोणाचीही जमीन वनविभाग घेणार नाही. ४जंगली प्राण्यांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांची नुकसानभरपाई दिली जाईल. रस्त्यांच्या डागडुगीजीचे कोणतेही काम करताना अडवले जाणार नाही, फक्त यासाठी दोन दिवस अगोदर लेखी अर्ज आमच्याकडे दिला जावा, असे लिमये यांनी सांगितले.