शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पुण्यामध्ये तूर्तास पाणीकपात नाही

By admin | Updated: April 11, 2017 04:00 IST

पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुणे : पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून, हा उन्हाळा काहीअंशी सुसह्य होईल. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त दिनेश वाघमारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, बाबूराव पाचर्णे, जयदेव गायकवाड, दत्तात्रय भरणे, शरद रणपिसे, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. पुणे शहराचे पाणी शहराला मिळणार आहे. पालिकेला मंजूर साठ्याप्रमाणे पाणी देण्यात येणार असून, १६ जुलैपर्यंत पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. जर दुरुस्तीची कामे निघालीच, तर महिन्यातून आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगताच आमदार शरद रणपिसे यांनी ही एक प्रकारची कपातच, असे म्हणत त्याला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांनी त्यांची दुरुस्ती आवश्यक असते, असे सांगून समजूत घातली. पाणीसाठा आणि पाणीवाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करण्यात आलेला नाही. खराडी बेबी कॅनॉलसह मुळा-मुठा कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. पुणेकरांनी जपून पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी मिळून पुनर्वसनासाठी १३१ कोटी रुपये आणि पाण्याचे १७२ कोटी धरणाच्या कामासाठी देणे आहे. १७२ कोटींबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, तूर्तास १३१ कोटी रुपये देण्यासाठी दोन्ही महापालिका आगामी काळात सर्वसाधारण सभेच्या वेळी ठराव मंजूर करून पैसे देण्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे. याबाबत दोन बैठका घेण्यात येणार असून, महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.भामा-आसखेड धरणाचे २.६ टीएमसी पाणी पुण्याला मिळणार आहे. येरवड्यापासून आळंदीपर्यंत नागरीकरण झालेले आहे. या पाण्यामुळे खडकवासलाच्या पाण्यावर येणारा ताण कमी होईल. पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे. -गिरीश बापट, पालकमंत्री