शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यामध्ये तूर्तास पाणीकपात नाही

By admin | Updated: April 11, 2017 04:00 IST

पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पुणे : पुणे शहराचा दोन वेळचा पाणीपुरवठा कायम राहणार असून तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला असून, हा उन्हाळा काहीअंशी सुसह्य होईल. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत पुण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त दिनेश वाघमारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, बाबूराव पाचर्णे, जयदेव गायकवाड, दत्तात्रय भरणे, शरद रणपिसे, बाळा भेगडे आदी उपस्थित होते. पुणे शहराचे पाणी शहराला मिळणार आहे. पालिकेला मंजूर साठ्याप्रमाणे पाणी देण्यात येणार असून, १६ जुलैपर्यंत पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. जर दुरुस्तीची कामे निघालीच, तर महिन्यातून आवश्यकता भासल्यास दोन ते तीन वेळा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगताच आमदार शरद रणपिसे यांनी ही एक प्रकारची कपातच, असे म्हणत त्याला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालकमंत्र्यांनी त्यांची दुरुस्ती आवश्यक असते, असे सांगून समजूत घातली. पाणीसाठा आणि पाणीवाटपामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करण्यात आलेला नाही. खराडी बेबी कॅनॉलसह मुळा-मुठा कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. पुणेकरांनी जपून पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी मिळून पुनर्वसनासाठी १३१ कोटी रुपये आणि पाण्याचे १७२ कोटी धरणाच्या कामासाठी देणे आहे. १७२ कोटींबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल. मात्र, तूर्तास १३१ कोटी रुपये देण्यासाठी दोन्ही महापालिका आगामी काळात सर्वसाधारण सभेच्या वेळी ठराव मंजूर करून पैसे देण्याबाबत निर्णय घेतील. त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे. याबाबत दोन बैठका घेण्यात येणार असून, महिनाभरात प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.भामा-आसखेड धरणाचे २.६ टीएमसी पाणी पुण्याला मिळणार आहे. येरवड्यापासून आळंदीपर्यंत नागरीकरण झालेले आहे. या पाण्यामुळे खडकवासलाच्या पाण्यावर येणारा ताण कमी होईल. पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे. -गिरीश बापट, पालकमंत्री