शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

दहा दिवस पाणी नाही

By admin | Updated: December 12, 2015 00:46 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील १६ गावच्या हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे जलाशयातून पारगाव

सासवड : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील १६ गावच्या हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे जलाशयातून पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना केली असून गेल्या १० ते ११ दिवसांपासून ही योजना बंद आहे. यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. सध्या या भागात टंचाईची परिस्थिती असून मध्यंतरी झालेल्या पावसामुळे नाझरे जलाशयात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र पाणी उपसा करणारे पंप जळाले आहेत. जलवाहिनीला गळती असल्याची कारणे दाखवून योजना आणखी काही दिवस बंद ठेवणार असल्याचे पत्र योजना समितीने शासनाला दिले आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी हैराण झाले आहेत. पाण्याच्या टँकरची मागणी करूनही मिळत नसल्याने आता या १६ गावांतील लोक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे नायगाव ग्रामपंचायत सदस्य किशोर खळदकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. सध्या योजनेचे १५० एचपीचा १, ५० एचपीचे २ आणि १५ एचपीचा १ पंप असून जलाशयाखालील जलवाहिनीला गळती लागली असल्याने समितीने जलसंपदा राज्यमंत्री, जि. प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार पुरंदर, गटविकास अधिकारी यांना पत्र दिले असून वरील कारणांमुळे योजना १० दिवसांपासून बंद आहे. समिती योजना चालविण्यास सक्षम नाही. त्यामुळे शासनाने जबाबदारी घेऊन नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, असे पत्रात नमूद केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (वार्ताहर)> सध्या या योजनेला जिल्हा परिषदेकडून सुमारे २५ लाखांचा निधी नवीन पंप घेण्यासाठी मिळाला आहे. मात्र योजना सुरळीत चालविण्यासाठी हा निधी पुरेसा नाही. योजना चालविणाऱ्या समितीने शासनाला पत्र देऊन जबाबदारी झटकून दिली. याच जलाशयातून बारामती तालुक्यातील मोरगाव प्रादेशिक योजना आहे. मागील काही महिन्यांपूर्वी या योजनेचे पंप, जलवाहिन्यांसाठी २० कोटींचा निधी मिळाला होता, परंतु पुरंदर तालुक्याच्या पारगाव - माळशिरस प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस असा भरीव निधी कधीच मिळाला नाही.