शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

अचल साठ्यातून शेतीसाठी पाणी नाही!

By admin | Updated: November 28, 2015 00:50 IST

उजनीच्या अचल साठ्यातून कुठल्याही परिस्थितीत शेतीसाठी पाणी वापरायचे नाही, असे सक्त आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

पुणे : उजनीच्या अचल साठ्यातून कुठल्याही परिस्थितीत शेतीसाठी पाणी वापरायचे नाही, असे सक्त आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. मग गेल्या १० वर्षांत वेळोवळी पाणी का सोडले जात होते? असा सवाल चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यातील ४ धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी तत्काळ सोडा, असा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने गुरुवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासनाला आता कार्यवाही करावी लागणार आहे. २६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाची कार्यवाही न झाल्याने पाणी सोडण्यात टाळाटाळ का होत आहे, असा सवाल करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असा अर्ज सिद्धेश्वर वऱ्हाडे यांनी प्राधिकरणाकडे केला होता. यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर उजनी धरणात पुण्यातील ४ धरणांमधून १० टीमएसी पाणी तत्काळ सोडा, असे आदेश प्राधिकरणाने गुरुवारी पुन्हा एकदा दिले आहेत. या आदेशात उजनीतील अचल साठ्यातून शेतीसाठी पाणी वापरता येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत तेपाणी वापरायचे नाही, असे सक्त आदेशच प्राधिकरणाने दिले आहेत. हे २६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशातही म्हटले आहे. यावर चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्राधिकरण न्यायाची भूमिका घेत नाही. जर नियामानुसार अचलपाणी साठ्यातून पाणी सोडता येत नाही, तर यापूर्वी कित्येकदा पाणी सोडले आहे. तेव्हा आजच्याएवढी टंचाईची परिस्थितीही नव्हती; मग आताच हा हट्ट का? सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. उजनी धरणात १,८०३ दलघमी म्हणजे ६४ टीएमसी अचलपाणी साठा आहे. हे पाणी शेतीसाठी वापरायचे नाही; मग पिण्यासाठी देणार असतील तर सोलापूरला अवघे अडीच टीएमसी म्हणजे ९८ दलघमी पाणी पिण्यासाठी लागते. मग १,७०० दलघमी पाण्याचे करणार काय? असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी केला आहे. (वार्ताहर)1शेतीसाठी अचल साठ्यातून पाणी घ्यायचेच नाही, असा सक्त आदेश प्राधिकरणाचा आहे. या धरणासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच, बॅकवॉटरमधील पाण्यावर त्यांच्या शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. या आदेशामुळे त्यांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. 2येथील शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या हे लक्षात येत नाही. त्यांनी जर न्यायालयात या आदेशाला विरोध केला नाही, तर त्यांच्या भविष्यात पाण्यासाठी गंभीर संकट उभे राहील. या आदेशामुळे जर कोणी पाणी घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. मोटारी जप्त होतील, कारवाई होईल. या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. उलट हे समजून न घेता, ते वरच्या धरणातून पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत.