शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अचल साठ्यातून शेतीसाठी पाणी नाही!

By admin | Updated: November 28, 2015 00:50 IST

उजनीच्या अचल साठ्यातून कुठल्याही परिस्थितीत शेतीसाठी पाणी वापरायचे नाही, असे सक्त आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

पुणे : उजनीच्या अचल साठ्यातून कुठल्याही परिस्थितीत शेतीसाठी पाणी वापरायचे नाही, असे सक्त आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. मग गेल्या १० वर्षांत वेळोवळी पाणी का सोडले जात होते? असा सवाल चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यातील ४ धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी तत्काळ सोडा, असा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने गुरुवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासनाला आता कार्यवाही करावी लागणार आहे. २६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने दिलेल्या आदेशाची कार्यवाही न झाल्याने पाणी सोडण्यात टाळाटाळ का होत आहे, असा सवाल करून अधिकाऱ्यावर कारवाई करा, असा अर्ज सिद्धेश्वर वऱ्हाडे यांनी प्राधिकरणाकडे केला होता. यावर गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर उजनी धरणात पुण्यातील ४ धरणांमधून १० टीमएसी पाणी तत्काळ सोडा, असे आदेश प्राधिकरणाने गुरुवारी पुन्हा एकदा दिले आहेत. या आदेशात उजनीतील अचल साठ्यातून शेतीसाठी पाणी वापरता येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत तेपाणी वापरायचे नाही, असे सक्त आदेशच प्राधिकरणाने दिले आहेत. हे २६ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशातही म्हटले आहे. यावर चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्राधिकरण न्यायाची भूमिका घेत नाही. जर नियामानुसार अचलपाणी साठ्यातून पाणी सोडता येत नाही, तर यापूर्वी कित्येकदा पाणी सोडले आहे. तेव्हा आजच्याएवढी टंचाईची परिस्थितीही नव्हती; मग आताच हा हट्ट का? सोलापूरची ५ हजार एकर क्षेत्राची आतापर्यंत पाण्याची मागणी आहे. उजनी धरणात १,८०३ दलघमी म्हणजे ६४ टीएमसी अचलपाणी साठा आहे. हे पाणी शेतीसाठी वापरायचे नाही; मग पिण्यासाठी देणार असतील तर सोलापूरला अवघे अडीच टीएमसी म्हणजे ९८ दलघमी पाणी पिण्यासाठी लागते. मग १,७०० दलघमी पाण्याचे करणार काय? असा सवाल याचिकाकर्ते अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी केला आहे. (वार्ताहर)1शेतीसाठी अचल साठ्यातून पाणी घ्यायचेच नाही, असा सक्त आदेश प्राधिकरणाचा आहे. या धरणासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच, बॅकवॉटरमधील पाण्यावर त्यांच्या शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. या आदेशामुळे त्यांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. 2येथील शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या हे लक्षात येत नाही. त्यांनी जर न्यायालयात या आदेशाला विरोध केला नाही, तर त्यांच्या भविष्यात पाण्यासाठी गंभीर संकट उभे राहील. या आदेशामुळे जर कोणी पाणी घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. मोटारी जप्त होतील, कारवाई होईल. या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. उलट हे समजून न घेता, ते वरच्या धरणातून पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत.