शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्यायला पाणी नाही! तर दुसरीकडे ओला दुष्काळ!!

By admin | Updated: March 28, 2016 03:17 IST

नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीस पाणी देण्याची पद्धत ही ओला दुष्काळ पडण्यासारखी आहे, तर न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या (पाण्याविना) दुष्काळात कसे

रांजणगाव सांडस : नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीस पाणी देण्याची पद्धत ही ओला दुष्काळ पडण्यासारखी आहे, तर न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या (पाण्याविना) दुष्काळात कसे जगावे याचा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे हे चित्र एकाच मंडल अधिकार क्षेत्रातील आहे. पाणीवाटपाचे नियम हे पूर्वी कडक होते. पाटबंधारे विभागाकडून पाणी वाया गेल्यास पाण्याच्या प्रमाणात दंड आकारला जात असे; परंतु अलीकडील काळात शेतास भरपूर पाणी देत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिरिक्त पाण्याचा ओला दुष्काळ जाणवू लागला आहे. कारण, या भागात सतत पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनी नापीक झालेल्या आहेत. वाळकी -रांजणगाव सांडस या बेट भागात मुळा-मुठा-भीमा या नद्यांचा संगम झालेला आहे; तसेच पारगाव (ता. दौंड) येथे पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधलेला असून, या बंधाऱ्याला प्लेटा टाकल्यावर, या पाण्याचा फुगारा हा राहू भागातील बंधाऱ्यापर्यंत पोहोचतो, त्यामुळे या भागात बारमाही पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी वैयक्तिक तसेच सहकारी पाणीपुरवठा योजना राबवून शेतीस पाणीपुरवठा या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु, विजेचे भारनियमन हे रात्री व दिवसा असल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी उसाच्या शेतात मोकळे पाणी सोडून वीज जात नाही, तोपर्यंत पाणी पाहण्यास जात नसल्यामुळे पाणी हे दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेत भिजवून पाणी ओढ्यास वाहून जात आहे.पानगवताने ओढे ( कंजाळ) भरल्यामुळे पाणी हे पुढे सरकत नाही, परिणामी शेतात क्षारांचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच, या भागातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप आलेले आहे. पावसाळ्यातही रस्त्याची दयनीय अवस्था होत नाही, एवढी या भागातील पाईपलाईन लिकेजमुळे झालेली आहे.लिकेज माझे नाही तुझे आहे, तू काढ, अशी भावना असल्यामुळे पाणी वाया जात आहे. सार्वजनिक रस्त्याचे गटार होत आहे, पण लिकेज काढण्यास शेतकरी हा पुढे येत नाही. त्यामध्ये पाटबंधारे विभागाने कडक कारवाई करण्यास सुरुवात करावी. दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागणार नाही, या नदीकाठच्या नागरिकांना पाणी असूनही दुष्काळ हा वीज गेल्यावर जाणवतो. कारण वीज नसेल तर पाणी मिळत नाही, त्या दिवशी पाणी हे जपून वापरले जाते. (वार्ताहर)शिरूर पाणीपुरवठा योजना राबवापुरंदर तालुक्याला जशी पुरंदर उपसा सिंचन योजना राबवून पाणीपुरवठा केलेला आहे, तसाच भीमा नदीवरून शिरूर पाणीपुरवठा योजना राबविली तर न्हावरे,करडे, निरवी,आंबळे, उरळगांव, कोळपेवस्ती, दहीवडी, रांजणगाव गणपती, कळवंत वाडी, शिरसगाव काटा, आंधळगाव, कुरुळी, सरहद वाडी या भागातील लहान वाड्यावस्त्या यांना वर्षभर पाणी हे पिण्यास व शेतीस उपलब्ध होऊ शकते. चासकमानच्या कॅनॉलमधून या पाण्याचा विसर्ग केल्यास नगर जिल्ह्यातील काही गावांना पाणी मिळू शकते, हे काम लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले तर होऊ शकते.