शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

प्यायला पाणी नाही! तर दुसरीकडे ओला दुष्काळ!!

By admin | Updated: March 28, 2016 03:17 IST

नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीस पाणी देण्याची पद्धत ही ओला दुष्काळ पडण्यासारखी आहे, तर न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या (पाण्याविना) दुष्काळात कसे

रांजणगाव सांडस : नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीस पाणी देण्याची पद्धत ही ओला दुष्काळ पडण्यासारखी आहे, तर न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांना कोरड्या (पाण्याविना) दुष्काळात कसे जगावे याचा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे हे चित्र एकाच मंडल अधिकार क्षेत्रातील आहे. पाणीवाटपाचे नियम हे पूर्वी कडक होते. पाटबंधारे विभागाकडून पाणी वाया गेल्यास पाण्याच्या प्रमाणात दंड आकारला जात असे; परंतु अलीकडील काळात शेतास भरपूर पाणी देत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना अतिरिक्त पाण्याचा ओला दुष्काळ जाणवू लागला आहे. कारण, या भागात सतत पाणी साचून राहिल्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जमिनी नापीक झालेल्या आहेत. वाळकी -रांजणगाव सांडस या बेट भागात मुळा-मुठा-भीमा या नद्यांचा संगम झालेला आहे; तसेच पारगाव (ता. दौंड) येथे पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधलेला असून, या बंधाऱ्याला प्लेटा टाकल्यावर, या पाण्याचा फुगारा हा राहू भागातील बंधाऱ्यापर्यंत पोहोचतो, त्यामुळे या भागात बारमाही पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी वैयक्तिक तसेच सहकारी पाणीपुरवठा योजना राबवून शेतीस पाणीपुरवठा या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. परंतु, विजेचे भारनियमन हे रात्री व दिवसा असल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी उसाच्या शेतात मोकळे पाणी सोडून वीज जात नाही, तोपर्यंत पाणी पाहण्यास जात नसल्यामुळे पाणी हे दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेत भिजवून पाणी ओढ्यास वाहून जात आहे.पानगवताने ओढे ( कंजाळ) भरल्यामुळे पाणी हे पुढे सरकत नाही, परिणामी शेतात क्षारांचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच, या भागातील रस्त्यांना गटारांचे स्वरूप आलेले आहे. पावसाळ्यातही रस्त्याची दयनीय अवस्था होत नाही, एवढी या भागातील पाईपलाईन लिकेजमुळे झालेली आहे.लिकेज माझे नाही तुझे आहे, तू काढ, अशी भावना असल्यामुळे पाणी वाया जात आहे. सार्वजनिक रस्त्याचे गटार होत आहे, पण लिकेज काढण्यास शेतकरी हा पुढे येत नाही. त्यामध्ये पाटबंधारे विभागाने कडक कारवाई करण्यास सुरुवात करावी. दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागणार नाही, या नदीकाठच्या नागरिकांना पाणी असूनही दुष्काळ हा वीज गेल्यावर जाणवतो. कारण वीज नसेल तर पाणी मिळत नाही, त्या दिवशी पाणी हे जपून वापरले जाते. (वार्ताहर)शिरूर पाणीपुरवठा योजना राबवापुरंदर तालुक्याला जशी पुरंदर उपसा सिंचन योजना राबवून पाणीपुरवठा केलेला आहे, तसाच भीमा नदीवरून शिरूर पाणीपुरवठा योजना राबविली तर न्हावरे,करडे, निरवी,आंबळे, उरळगांव, कोळपेवस्ती, दहीवडी, रांजणगाव गणपती, कळवंत वाडी, शिरसगाव काटा, आंधळगाव, कुरुळी, सरहद वाडी या भागातील लहान वाड्यावस्त्या यांना वर्षभर पाणी हे पिण्यास व शेतीस उपलब्ध होऊ शकते. चासकमानच्या कॅनॉलमधून या पाण्याचा विसर्ग केल्यास नगर जिल्ह्यातील काही गावांना पाणी मिळू शकते, हे काम लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले तर होऊ शकते.