शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आदेशाअभावी भीमा नदीला पाणी नाही, दोन दिवस आणखी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:48 IST

उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.

इंदापूर : उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.उजनी धरणाजवळच्या भीमा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने नदीकाठच्या सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर झालेली आहे. पिके जळू लागली आहेत. लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. या संदर्भात गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ह्यलोकमतह्ण सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आमदार, माजी मंत्र्यांनी पाठपुरावा करत भाटनिमगावच्या बंधा-याची दुरुस्ती करावी, त्यामध्ये पाणी सोडावे अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांनी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडण्यात येईल या आशेने गेल्या आठवडाभरात नदीकाठ व कालव्या लगतच्या शेतक-यांनी धावपळ करत वीज पंपांची दुरुस्ती करुन घेतली. जलवाहिन्यांची फुटतूट नजरेखालून घालत, त्यांची ही डागडुजी करुन घेतली. पण आत्ता पाणी सोडण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याने शेतकरी धरणाकडे डोळे लावून बसले आहेत.मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते. उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले.उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.याबाबत ८ मार्च रोजी मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर बैठक झाली होती. ९ मार्चपासून भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते.उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले. १५ मार्चपासून कालवा व नदीला सोडलेले पाणी २० एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन असणार आहे.१५ मे पासून दुसरे आवर्तन सुरु होणार आहे. ते ३० ते ३५ दिवस राहणार आहे. ११ जानेवारीला कालव्याला सोडलेले पाणी साधारणपणे २५ दिवस तर नदीला १९ जानेवारीला सोडलेले पाणी दहा ते बारा दिवस राहिले.परंतू उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.