शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

आदेशाअभावी भीमा नदीला पाणी नाही, दोन दिवस आणखी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:48 IST

उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.

इंदापूर : उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.उजनी धरणाजवळच्या भीमा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने नदीकाठच्या सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर झालेली आहे. पिके जळू लागली आहेत. लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. या संदर्भात गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ह्यलोकमतह्ण सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आमदार, माजी मंत्र्यांनी पाठपुरावा करत भाटनिमगावच्या बंधा-याची दुरुस्ती करावी, त्यामध्ये पाणी सोडावे अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांनी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडण्यात येईल या आशेने गेल्या आठवडाभरात नदीकाठ व कालव्या लगतच्या शेतक-यांनी धावपळ करत वीज पंपांची दुरुस्ती करुन घेतली. जलवाहिन्यांची फुटतूट नजरेखालून घालत, त्यांची ही डागडुजी करुन घेतली. पण आत्ता पाणी सोडण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याने शेतकरी धरणाकडे डोळे लावून बसले आहेत.मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते. उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले.उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.याबाबत ८ मार्च रोजी मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर बैठक झाली होती. ९ मार्चपासून भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते.उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले. १५ मार्चपासून कालवा व नदीला सोडलेले पाणी २० एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन असणार आहे.१५ मे पासून दुसरे आवर्तन सुरु होणार आहे. ते ३० ते ३५ दिवस राहणार आहे. ११ जानेवारीला कालव्याला सोडलेले पाणी साधारणपणे २५ दिवस तर नदीला १९ जानेवारीला सोडलेले पाणी दहा ते बारा दिवस राहिले.परंतू उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.