शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

आदेशाअभावी भीमा नदीला पाणी नाही, दोन दिवस आणखी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:48 IST

उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.

इंदापूर : उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.उजनी धरणाजवळच्या भीमा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने नदीकाठच्या सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर झालेली आहे. पिके जळू लागली आहेत. लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. या संदर्भात गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ह्यलोकमतह्ण सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आमदार, माजी मंत्र्यांनी पाठपुरावा करत भाटनिमगावच्या बंधा-याची दुरुस्ती करावी, त्यामध्ये पाणी सोडावे अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांनी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडण्यात येईल या आशेने गेल्या आठवडाभरात नदीकाठ व कालव्या लगतच्या शेतक-यांनी धावपळ करत वीज पंपांची दुरुस्ती करुन घेतली. जलवाहिन्यांची फुटतूट नजरेखालून घालत, त्यांची ही डागडुजी करुन घेतली. पण आत्ता पाणी सोडण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याने शेतकरी धरणाकडे डोळे लावून बसले आहेत.मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते. उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले.उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.याबाबत ८ मार्च रोजी मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर बैठक झाली होती. ९ मार्चपासून भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते.उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले. १५ मार्चपासून कालवा व नदीला सोडलेले पाणी २० एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन असणार आहे.१५ मे पासून दुसरे आवर्तन सुरु होणार आहे. ते ३० ते ३५ दिवस राहणार आहे. ११ जानेवारीला कालव्याला सोडलेले पाणी साधारणपणे २५ दिवस तर नदीला १९ जानेवारीला सोडलेले पाणी दहा ते बारा दिवस राहिले.परंतू उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.