शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाशिवाय प्रवासच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आरक्षणाशिवाय प्रवासच नाही, असा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासावर बंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आरक्षणाशिवाय प्रवासच नाही, असा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासावर बंदी नसल्याने आरक्षणाला गर्दी होते आहे. नियोजन करूनच प्रवास होत असला, तरी ती संख्याही मोठी असल्याने स्थानकांमध्ये रोजच बऱ्यापैकी गर्दी असतेच.

पुण्यातून दिवसभरात रोज १० गाड्या सुटतात. मुंबई, कोल्हापूर, कलकत्ता, मिरज, तिरूपती इकडे या गाड्या जातात. त्याशिवाय आठवड्यातून दोनदा, तीनदा अशा ३२ गाड्या आहेत. पुण्यातून एकूण ४२ गाड्या सुटतात. तसेच दिवसभरात म्हणजे २४ तासांत पुणे स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांची संख्या १२० आहे.

आरक्षण केल्याशिवाय तसेच ते कन्फर्म असल्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रशासनाकडून प्रवेशच दिला जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी तिकीट आरक्षित असलेलाच असतो. पुण्यातून रोज जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण २५ हजार आहे.

मुंबईकडे जाणारे प्रवासी अर्थातच जास्त आहे. तसेच बिहार, मध्य प्रदेश या राज्यात पुण्यातून जाणाऱ्याची संख्याही बरीच आहे. त्या तुलनेत राज्यांतर्गत प्रवासाचे आरक्षण कमी आहे. त्यातही नागपूर, अमरावतीकडे फारसा ओढा दिसत नाही. एरवी गाड्यांना असते तशी गर्दी स्थानकांमध्ये दिसत नाही. काही गाड्यांचे आरक्षण फुल होते, तर काही गाड्यांमध्ये जागा आहे तेवढे आरक्षण होत नाही.

आरक्षणासाठी आता तिकिटाची पूर्ण रक्कम द्यावी लागते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याचे प्रमाण कमी आहे. तिकीट किती दिवस आधी रद्द केले त्यावर किती टक्के रक्कम परत मिळेल ते अवलंबून आहे. मात्र तिकीट रद्दचे प्रमाण कमीच आहे.

रेल्वेत स्लिपर कोच आणि सीट अशी रचना असते.लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्लिपर कोच असतात. त्याचे आरक्षणही तसेच होते. मध्ये उभे राहून, किंवा दारात उभे राहून प्रवास करण्याची मुभाच नाही. एरवी असा प्रवास होत असल्याने गाड्यांचे डबे गर्दीने ओसंडून वाहत असतात, पण आता गाड्यांची तपासणी होते, असे तिकीट कन्फर्म नसलेले प्रवासी नसतातच, असले तरी ते लगेच बाहेर काढले जातात, त्यामुळे सगळ्याच रेल्वे गाड्या कधी नव्हे ते शिस्तीत व गोंधळ गर्दीविना धावत आहेत.

----

आरक्षण असल्याशिवाय प्रवास नाही

२४ तासातील गाड्या- १२०

पुण्यातून रोज सुटणाऱ्या १०

आठवड्यातून एकदा दोनदा- ३२

आरक्षण जास्त-मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बिहार

आरक्षण कमी-राज्यातंर्गत, नागपूर अमरावती

--

आरक्षण ऑनलाईन पद्धतीने होते. वेगवेगळ्या ठिकाणी होते. बहुतेक गाड्या सध्याही फुल असतात. जागा उपलब्ध आहेत, त्यापेक्षा जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांना पुढच्या तारखेचे आरक्षण मिळते. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या घटलेलीच आहे.

- मनोज झंवर, मुख्य जनसंपर्क अधिकारी