शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाशिवाय प्रवासच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आरक्षणाशिवाय प्रवासच नाही, असा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासावर बंदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आरक्षणाशिवाय प्रवासच नाही, असा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासावर बंदी नसल्याने आरक्षणाला गर्दी होते आहे. नियोजन करूनच प्रवास होत असला, तरी ती संख्याही मोठी असल्याने स्थानकांमध्ये रोजच बऱ्यापैकी गर्दी असतेच.

पुण्यातून दिवसभरात रोज १० गाड्या सुटतात. मुंबई, कोल्हापूर, कलकत्ता, मिरज, तिरूपती इकडे या गाड्या जातात. त्याशिवाय आठवड्यातून दोनदा, तीनदा अशा ३२ गाड्या आहेत. पुण्यातून एकूण ४२ गाड्या सुटतात. तसेच दिवसभरात म्हणजे २४ तासांत पुणे स्थानकात जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांची संख्या १२० आहे.

आरक्षण केल्याशिवाय तसेच ते कन्फर्म असल्याशिवाय रेल्वे स्थानकात प्रशासनाकडून प्रवेशच दिला जात नाही. त्यामुळे प्रत्येक प्रवासी तिकीट आरक्षित असलेलाच असतो. पुण्यातून रोज जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण २५ हजार आहे.

मुंबईकडे जाणारे प्रवासी अर्थातच जास्त आहे. तसेच बिहार, मध्य प्रदेश या राज्यात पुण्यातून जाणाऱ्याची संख्याही बरीच आहे. त्या तुलनेत राज्यांतर्गत प्रवासाचे आरक्षण कमी आहे. त्यातही नागपूर, अमरावतीकडे फारसा ओढा दिसत नाही. एरवी गाड्यांना असते तशी गर्दी स्थानकांमध्ये दिसत नाही. काही गाड्यांचे आरक्षण फुल होते, तर काही गाड्यांमध्ये जागा आहे तेवढे आरक्षण होत नाही.

आरक्षणासाठी आता तिकिटाची पूर्ण रक्कम द्यावी लागते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याचे प्रमाण कमी आहे. तिकीट किती दिवस आधी रद्द केले त्यावर किती टक्के रक्कम परत मिळेल ते अवलंबून आहे. मात्र तिकीट रद्दचे प्रमाण कमीच आहे.

रेल्वेत स्लिपर कोच आणि सीट अशी रचना असते.लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्लिपर कोच असतात. त्याचे आरक्षणही तसेच होते. मध्ये उभे राहून, किंवा दारात उभे राहून प्रवास करण्याची मुभाच नाही. एरवी असा प्रवास होत असल्याने गाड्यांचे डबे गर्दीने ओसंडून वाहत असतात, पण आता गाड्यांची तपासणी होते, असे तिकीट कन्फर्म नसलेले प्रवासी नसतातच, असले तरी ते लगेच बाहेर काढले जातात, त्यामुळे सगळ्याच रेल्वे गाड्या कधी नव्हे ते शिस्तीत व गोंधळ गर्दीविना धावत आहेत.

----

आरक्षण असल्याशिवाय प्रवास नाही

२४ तासातील गाड्या- १२०

पुण्यातून रोज सुटणाऱ्या १०

आठवड्यातून एकदा दोनदा- ३२

आरक्षण जास्त-मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बिहार

आरक्षण कमी-राज्यातंर्गत, नागपूर अमरावती

--

आरक्षण ऑनलाईन पद्धतीने होते. वेगवेगळ्या ठिकाणी होते. बहुतेक गाड्या सध्याही फुल असतात. जागा उपलब्ध आहेत, त्यापेक्षा जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांना पुढच्या तारखेचे आरक्षण मिळते. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची संख्या घटलेलीच आहे.

- मनोज झंवर, मुख्य जनसंपर्क अधिकारी