शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

चाळीस वर्षात एकही योजना नाही

By admin | Updated: September 20, 2014 23:35 IST

1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली,

सासवड : ‘पुरंदर तालुक्यावर दुष्काळी म्हणून शिक्का आहे. 1962 ते 72 मध्ये तत्कालीन आमदार स्व. बापूसाहेब खैरे यांनी गराडे, घोरवडी, पिलाणवाडी, नाझरे या धरणांची निर्मिती केली. आज ही धरणो वजा केली, तर तालुक्यात काय राहील?’ असा सवाल करून गेल्या 42 वर्षात लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी एकही प्रकल्प राबविला नाही किंवा त्यासाठी प्रय}ही केले नाहीत, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले. 
पिंपळे (ता. पुरंदर) येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन संजय जगताप यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. जगताप म्हणाले, ‘‘सासवडमध्ये 1क् वर्षापूर्वी  पाण्याची टंचाई होती. दररोज 5क् टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. चंदुकाका जगताप यांच्या हाती नगरपालिकेची सत्ता आल्यावर वीर धरणातून पाणी योजना करून सासवडचा पाणीप्रश्न कायमचा मिटविला. आज सासवड पाण्याबाबत स्वयंपूर्ण आहे.’’
निवडून आल्यावर लोकप्रतिनिधी स्वत:च्या गावात किती दिवस राहिले, असा सवाल करून सासवड स्वयंपूर्ण व सुरक्षित झाल्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर आपल्या गावी न राहता सासवडला राहायला आले, असे जगताप यांनी सांगितले. 
आमदारांनी स्वत: एकही संस्था स्थापन केली नाही; उलट आमच्या संस्थेतील कर्मचा:यांना पगार देत नाही, अशी खोटी माहिती ते देत आहेत, असे जगताप म्हणाले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या मनीषा काकडे, प्रदीप पोमण, गणोश मेमाणो, प्रा. शशिकांत काकडे, पिंपळे, युवक काँग्रेसचे अक्षय क्षीरसागर, सचिन भणगे, संदीप लोळे आदींनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शिवसेनेतून प्रशांत वाल्हेकर, तानाजी ए. चव्हाण, राष्ट्रवादीतून तानाजी चव्हाण यांसह अनेक कार्यकत्र्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 
या वेळी पंचायत समिंती सदस्य दत्ता झुरंगे, विठ्ठल   मोकाशी, अप्पा दिघे, उत्तमभाऊ पोमण, श्रीरंग खेनट, किसन खेनट, सोपान भणगे, संजय पोमण, लालबहाद्दूर खेनट, भीमराव कांबळे, दत्तात्नय खेनट, संपत खेनट, सतीश पोमण, नंदू पोमण, दशरथ पोमण यांसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)