शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरेगावात घुंगरांच्या छमछमला विरोधच

By admin | Updated: January 30, 2016 03:55 IST

पुणे-नगर महामार्गावर सणसवाडीनंतर कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याबाबत परवान्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता कोरेगावातही घुंगरांचा नाद

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर सणसवाडीनंतर कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सांस्कृतिक कला केंद्र सुरू करण्याबाबत परवान्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे आता कोरेगावातही घुंगरांचा नाद घुमणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र महिला मंडळाच्या व ग्रामस्थांच्या ठोस विरोधामुळे सरपंच असेपर्यंत कला केंद्रास परवानगी देणार नाही, अशी ठोस भूमिका सरपंच अनिता भालेराव यांनीही घेतली आहे. ग्रामसभेतही कला केंद्राचा विषय चर्चिला जाणार नसल्याने कला केंद्राच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे. अर्जदारानेही परवान्याचा अर्जच माघारी घेतला आहे. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीकडे १३ जानेवारीस सांस्कृतिक कला केंद्रास परवानगीचा अर्ज दाखल झाला. या अर्जावर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेने व महिला सभेने ग्रामसभेत निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा चालू असतानाच २६ जानेवारीस होणारी ग्रामसभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली होती. दरम्यान, गावातील प्रियदर्शनी महिला मंडळाने व ग्रामस्थांनी कला केंद्र होऊ न देण्याची भूमिका घेतली होती. दरम्यान, गावात कला केंद्र सुरू होणार की नाही, अशी उलटसुलट चर्चा सुरू असतानाच तंटामुक्ती समितीच्या बैठकीत प्रियदर्शनी महिला मंडळाने कला केंद्राच्या परवान्याविरोधात अर्ज दाखल केला. कला केंद्रास ग्रामस्थांचा वाढता विरोध लक्षात घेत व अर्जदाराने कला केंद्राच्या परवान्याचा अर्ज माघारी घेतला असल्याने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता भालेराव यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या वेळी काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष नारायणराव फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक काका गव्हाणे, महेश ढेरंगे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बबुशा ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, पै. गणेश फडतरे, जितेंद्र गव्हाणे, सुरेंद्र भांडवलकर, संगीता गव्हाणे, संगीता कांबळे, आशा काशीद, कल्पना गव्हाणे, मालन साळुंखे, शारदा गव्हाणे, दिनकर गव्हाणे, आशिष सव्वाशे, सुनील ढेरंगे, सुमन ढेंरगे, कृष्णाबाई गव्हाणे, भामाबाई गव्हाणे, मंजुळाबाई सासवडे, मालन गव्हाणे उपस्थित होत्या. नारायणराव फडतरे व राजाराम ढेरंगे यांनी सांगितले, ‘‘गावच्या विकासाच्या दृष्टीने घातक असणाऱ्या कला केंद्रास ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन सकारात्मकपणे घेतलेला निर्णय योग्य असून यापुढील काळातही गावच्या हिताचेच निर्णय सत्ताधाऱ्यांकडून घेतले जातील, तर गावात शाळा, कॉलेज असल्याने गावच्या प्रगतीच्या दृष्टीने मारक असणाऱ्या कला केंद्राविरोधात ग्रामस्थांनी ठोस भूमिका घेतल्याने या निर्णयाचे स्वागत असून गावच्या विकासाच्यादृष्टीने सकारात्मक निर्णयांना पाठिंबा आहे, अशी भूमिका विरोधी गटाकडून मांडण्यात आली.’’ अजून किती संसार उद्ध्वस्त करायचे?परिसरात असणाऱ्या कला केंद्रामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे समाजात पाहण्यास मिळत आहेत. गावात २३ वर्षे दारूविरोधात आम्ही महिला मंडळाच्या माध्यमातून लढा देत आहोत. गावात कला केंद्राच्या परवानगीचा विषय आल्याने अजून किती महिलांचे संसार उद्ध्वस्त करायचे आहेत, असा सवाल प्रियदर्शनी महिला मंडळाच्या प्रमुखांनी उपस्थित केला आहे,