शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

खेड शिवापूर महावितरण कार्यालयात अधिकारीच नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:01 IST

हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनसरापूर : हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शिवापूर परिसरात महावितरणविषयी नाराजीचा सूर वाढू लागला आहे.शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणाचे कार्यालयात ग्रामस्थ आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी व सांगण्यासाठी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गेले असता सदर कार्यालयात गेले आठ दिवस झाले अधिकारीच येत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझी आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. या गोष्टीला दहा दिवस झाले तरी अधिकारी म्हणून शिवापूर कार्यालयात कोणाचीही वर्णी लागली नाही. आमच्या अडचणी आम्ही कोणाला सांगायच्या, असा सवाल येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी केला.शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणचे ऊर्जाकेंद्र आहे. या केंद्रातून कल्याण, पेठ, मोरदारी, रहाटवडे, भिलारेवाडी, शिवतारवाडी, कोंढणपूर, अवसरेवाडी, आर्वी, सणसवाडी, खेड शिवापूर, शिवापूर, श्रीरामनगर (सर्व ता. हवेली) व भोर तालुक्यातील रांझे, कुसगाव, खोपी, शिवरे, कासुर्डी या सुमारे अठरा गावांना वीजपुरवठा केला जातो. एवढ्या मोठ्या केंद्रात जर दहा दिवस अधिकारी नसतील तर आणि काही अडचण झाल्यास सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारींना येथूनच वीजजोड असल्याने तीन ते चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे अनेक त्रस्त ग्रामस्थांनी सांगितले. या सर्व अडचणींना नागरिक वैतागले असून सर्व गावांमध्ये महावितरणविषयी नाराजी आहे. येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्या ठिकाणी अजूनही दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. कल्याण ते शिवापूर या पट्ट्यात सुमारे आठ गावे आहेत. या गावांच्या देखरेखीसाठी किंवा काही विजेची अडचण असल्यास वायरमन नेमले आहेत. त्यांची संख्या फक्त तीनच आहे. जर आठ ते नऊ गावांसाठी तीन वायरमन असतील तर त्यांचे काय हाल होत असतील याची जाणीव बहुतेक महावितरणाला आलेली नसावी. त्यातच या वायरमनपैकी फक्त दोघेजणच विजेच्या खांबावर चढू व उतरू शकतात हे माहिती सर्व ग्रामस्थांना आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहेच; पण त्यातील काही कर्मचारी हे अप्रेंटिस (शिकाऊ) आहेत, त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचे चित्र आहे.जास्तीचे बिल ग्राहकांच्या माथीआमच्या मीटरवरील रीडिंग घेऊन गेले की, बिलामध्ये फोटो व्यवस्थित दिसत नाही. परिणामी त्या महिन्याचे वीजबिल कमी जास्त दाखवतात. असे सलग तीन-चार महिने वीजबिल कमी जास्त देऊन त्यानंतर येणाऱ्या बिलामध्ये एकदम हजारोच्या रकमेचे बिल ग्राहकांच्या माथी मारले जाते. कारण त्यामध्ये युनिट वाढले की आपोआपच बिल हे पूर्वीच्या युनिट रेटपेक्षा अधिक असते. यावरून वीजबिलामध्येही सावळा गोंधळ चालल्याचे नागरिकांना दिसून येते.आंदोलनाचा इशाराशिवापूरच्या सरपंच व ग्रामस्थांनी लेखी निवेदन महावितरणला दिले आहे. निवेदनात तीव्र संताप व्यक्त करून लवकरात लवकर अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्राहकांच्या अडचणी सोडवाव्यात, असे नमूद केले आहे, तसेच असे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा तोंडी इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी सरपंच जयश्री दिघे, उपसरपंच अण्णा दिघे, भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र दिघे, राजू सट्टे, कसबे किरण, ग्रा. पं. सदस्या शारदा बारमुख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.