शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

खेड शिवापूर महावितरण कार्यालयात अधिकारीच नाही

By admin | Updated: July 8, 2017 02:01 IST

हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनसरापूर : हवेली तालुक्यातील शिवापूर येथील महावितरणच्या कार्यालयात गेले आठ दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शिवापूर परिसरात महावितरणविषयी नाराजीचा सूर वाढू लागला आहे.शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणाचे कार्यालयात ग्रामस्थ आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी व सांगण्यासाठी परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गेले असता सदर कार्यालयात गेले आठ दिवस झाले अधिकारीच येत नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझी आठ दिवसांपूर्वी बदली झाली आहे. या गोष्टीला दहा दिवस झाले तरी अधिकारी म्हणून शिवापूर कार्यालयात कोणाचीही वर्णी लागली नाही. आमच्या अडचणी आम्ही कोणाला सांगायच्या, असा सवाल येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी केला.शिवापूर (ता. हवेली) येथे महावितरणचे ऊर्जाकेंद्र आहे. या केंद्रातून कल्याण, पेठ, मोरदारी, रहाटवडे, भिलारेवाडी, शिवतारवाडी, कोंढणपूर, अवसरेवाडी, आर्वी, सणसवाडी, खेड शिवापूर, शिवापूर, श्रीरामनगर (सर्व ता. हवेली) व भोर तालुक्यातील रांझे, कुसगाव, खोपी, शिवरे, कासुर्डी या सुमारे अठरा गावांना वीजपुरवठा केला जातो. एवढ्या मोठ्या केंद्रात जर दहा दिवस अधिकारी नसतील तर आणि काही अडचण झाल्यास सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारींना येथूनच वीजजोड असल्याने तीन ते चार दिवस नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे अनेक त्रस्त ग्रामस्थांनी सांगितले. या सर्व अडचणींना नागरिक वैतागले असून सर्व गावांमध्ये महावितरणविषयी नाराजी आहे. येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत; परंतु त्या ठिकाणी अजूनही दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. कल्याण ते शिवापूर या पट्ट्यात सुमारे आठ गावे आहेत. या गावांच्या देखरेखीसाठी किंवा काही विजेची अडचण असल्यास वायरमन नेमले आहेत. त्यांची संख्या फक्त तीनच आहे. जर आठ ते नऊ गावांसाठी तीन वायरमन असतील तर त्यांचे काय हाल होत असतील याची जाणीव बहुतेक महावितरणाला आलेली नसावी. त्यातच या वायरमनपैकी फक्त दोघेजणच विजेच्या खांबावर चढू व उतरू शकतात हे माहिती सर्व ग्रामस्थांना आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहेच; पण त्यातील काही कर्मचारी हे अप्रेंटिस (शिकाऊ) आहेत, त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचे चित्र आहे.जास्तीचे बिल ग्राहकांच्या माथीआमच्या मीटरवरील रीडिंग घेऊन गेले की, बिलामध्ये फोटो व्यवस्थित दिसत नाही. परिणामी त्या महिन्याचे वीजबिल कमी जास्त दाखवतात. असे सलग तीन-चार महिने वीजबिल कमी जास्त देऊन त्यानंतर येणाऱ्या बिलामध्ये एकदम हजारोच्या रकमेचे बिल ग्राहकांच्या माथी मारले जाते. कारण त्यामध्ये युनिट वाढले की आपोआपच बिल हे पूर्वीच्या युनिट रेटपेक्षा अधिक असते. यावरून वीजबिलामध्येही सावळा गोंधळ चालल्याचे नागरिकांना दिसून येते.आंदोलनाचा इशाराशिवापूरच्या सरपंच व ग्रामस्थांनी लेखी निवेदन महावितरणला दिले आहे. निवेदनात तीव्र संताप व्यक्त करून लवकरात लवकर अधिकाऱ्याची नेमणूक करून ग्राहकांच्या अडचणी सोडवाव्यात, असे नमूद केले आहे, तसेच असे न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा तोंडी इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी सरपंच जयश्री दिघे, उपसरपंच अण्णा दिघे, भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र दिघे, राजू सट्टे, कसबे किरण, ग्रा. पं. सदस्या शारदा बारमुख आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.