शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
2
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
3
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
5
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
6
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
7
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
8
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
9
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
10
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
11
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
13
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
14
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
15
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
16
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
17
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
18
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
19
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
20
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. याबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. याबाबत तुम्हाला काय वाटते ?’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहेत. काही लोक असे काही तरी बोलत राहतात, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’’ असे सांगत अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव घेणे टाळून दुर्लक्ष केले.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. यावर अधिक भाष्य करणे अजित पवार यांनी टाळले.

----------

आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या हातात

महाराष्ट्रात असा ओबीसी व मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसाच प्रश्न गुजरात, राजस्थान व अन्य राज्यांमध्ये देखील निर्माण झाला आहे. राज्यातील आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेला आहे. शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोतच, पण सध्या आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या हातात आहे. त्यांनी मनावर घेतले तरच मार्ग निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.