शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थसंकल्पात सध्या तूट दिसत असली, तरी देशाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आहे. अर्थसंकल्पात सध्या तूट दिसत असली, तरी देशाची अर्थव्यवस्था पुढील दाेन वर्षांत रांगेत येईल. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांकरिता माेठ्या प्रमाणावर तरतूद केली गेली. पुण्यासह महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रकल्पाना केंद्राने निधी यापूर्वीच दिला आहे व ती कामे चालू आहेत. त्यासाठी आवश्यक आणखी निधी दिला जाईल. त्यामुळे महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात अन्याय झाला नाही, असा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.

भाजपचे मंत्री देशभरात जाऊन पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्पाची माहिती देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जावडेकर यांची पुण्यात पत्रकार परिषद रविवारी पार पडली. खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने, जगदीश मुळीक उपस्थित होते.

जावडेकर यांनी, अर्थसंकल्पात कृषी, आराेग्य, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रासाठी आर्थिक तरतुदींची आकडेवारी सांगतानाच हा अर्थसंकल्प आत्मनिर्भरतेकडे जाणारा असल्याचे संगितले. आजमितीला पेट्राेल व डिझेलची दरवाढ होत असली, तरी ती आंतरराष्ट्रीय बाजारभावावर अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या भावांत चढउतार हाेत असतात. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर इंधनदरवाढ हाेण्याच्या बातम्या आल्या. पण तसे हाेणार नाही. या इंधनावर केवळ कृषी अधिभार लावण्यात आला असला तरी एक्साईज कमी केला आहे. त्यामुळे भविष्यात भाववाढ हाेणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

केंद्राने पुण्यातील मेट्राेच्या दाेन टप्प्यांकरिता निधी यापूर्वीच दिलेला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मार्गाचे काम जरी सुरू झाले असले, तरी आमच्याकडे याबाबतचा प्रस्ताव आलेला नाही. तसेच अन्य नवीन काेणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. जसे प्रस्ताव जसा येईल तसा निधी दिला जाणार आहे. राज्यासाठी पुरेशी तरतूद केली आहे. सगळ्या राज्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांकरिता माेठ्या प्रमाणावर तरतूद केली गेल्याने, दीर्घकाळ टिकणारी कामे हाेतील. त्यामुळे प्रचंड प्रमाणात राेजगार निर्माण हाेणार आहे. त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला हाेईल.

यावेळी स्कूटर इंडिया कंपनी विक्रीचे उदाहरण देत जावडेकर यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या विक्रीविषयी मत मांडले. ज्या कंपन्या फायद्यात नाही, त्या विकल्या पाहिजेत. त्या चालू ठेवल्या तर माेठे नुकसान हाेते. यापूर्वी बाल्काे ही कंपनी विकली, ती कंपनी चालू हाेती, तेव्हा जेवढे उत्पन्न मिळत नव्हते त्यापेक्षा अधिक उत्पन्न आता सरकारला मिळत असल्याचेही ते म्हणाले.