शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पालिकेच्या शाळेत नव्या प्रवेशांची नोंदच नाही

By admin | Updated: November 24, 2015 01:02 IST

शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सहा महिने उलटून गेले तरी, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बहुतांश शाळांनी नोंदवहीत नावेच लिहिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या पाहणीतच उघडकीस आले आहे

पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सहा महिने उलटून गेले तरी, नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बहुतांश शाळांनी नोंदवहीत नावेच लिहिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या पाहणीतच उघडकीस आले आहे. त्यामुळे अद्यापही या नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश अधिकृत झाले नसल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही शाळेमध्ये जर एखादा विद्यार्थी नव्याने प्रवेशित झाला, तर शाळेकडून त्यांची नोंदवहीत नाव घालून त्याला अधिकृत नोंदणी क्रमांक देण्याची पद्धत आहे. विद्यार्थ्याचा प्रवेश झाल्यापासून १ ते २ दिवसांत होणे अपेक्षित आहे. तसा नियमही आहे. या नोंदवहीत जर विद्यार्थ्याचे नाव नोंदविले तरच त्याचा प्रवेश झाला, असे ग्राह्य धरण्यात येते. मात्र, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडूनच करण्यात आलेल्या पाहणीत हे सत्य उघड झाले आहे. बहुतांशी शाळांनी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंद सहा महिने उलटून गेले तरीही केलेली नाही. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार होऊनही पालिका अधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत याबाबत कोणत्याही मुख्याध्यापक किंवा शिक्षकावर कारवाई झालेली नाही. याबाबत शिक्षण मंडळातील सूत्रांनी सांगितले की, बरेच विद्यार्थी हे मधूनच शाळा सोडून जातात. गळती होते. नोंद झाल्यानंतर जर काही विद्यार्थी शाळा सोडून गेले तर त्यानंतर शिक्षकांना अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्यामुळे बहुतांशी शिक्षक हे नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची अर्धे वर्ष होईपर्यंत नोंदच करत नाहीत. नवीन विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर जुलैमध्येच शिक्षण मंडळाने नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर पर्यवेक्षकांकडून या नोंदी झाल्या आहेत की नाही याची तपासणीही करण्यात येते. यासंदर्भात पुन्हा एकदा सूचना देण्यात येतील व जे मुख्याध्यापक व शिक्षक या नोंदी करणार नाहीत, त्यांच्यावर तसेच संबंधित पर्यवेक्षकावरही कारवाई करण्यात येईल. - बबन दहिफळे, शिक्षणप्रमुख, पुणे महापालिका शिक्षण मंडळ