शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पीयूसी केंद्रांवर नियंत्रणच नाही

By admin | Updated: March 11, 2015 01:07 IST

वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या पीयूसी केंद्रांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कसलेही नियंत्रण नसल्याची

पुणे : वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या पीयूसी केंद्रांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कसलेही नियंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्रांनी वाहनांची केलेली तपासणी तसेच त्यांच्याकडील वाहनांच्या माहितीची कोणतीही नोंद कुठेही ठेवली जात नाही. ही सर्व माहिती पीयूसी केंद्रांपर्यंतच मर्यादित राहत आहे. त्यामुळे पीयूसी केंद्रे केवळ उपचारासाठीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुण्यात पेट्रोल पंपावरील व फिरती अशी एकूण २१६ पीयूसी केंद्रे आहेत. या केंद्रांना आरटीओमार्फत परवाने देण्यात आले आहेत. तसेच, या केंद्रांकडून अयोग्य पद्धतीने चाचणी किंवा प्रमाणपत्र दिले जात असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आरटीओला आहे. मात्र, एखाद्या केंद्राबद्दल तक्रार आल्यानंतरच आरटीओकडून संबंंधित केंद्राची तपासणी केली जाते. काही केंद्रचालकांकडून वाहनचालकांना बोगस पीयूसी दिले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. तसेच, चाचणी घेताना निष्काळजीपणा केल्याचेही समोर आले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता केंद्रांवर परिवहन विभागाचे कसलेही नियंत्रण नाही. केंद्रांना मुंबईतून परिवहन विभागाकडून पीयूसी चाचणी प्रमाणपत्रे दिली जातात. एकदा ही प्रमाणपत्रे केंद्रचालकाच्या ताब्यात आल्यानंतर त्यांचे पुढे काय होते, याची माहिती विभागाकडे संकलित होत नाही.पीयूसी केंद्रचालकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये दोन प्रती असतात. वायूंचे प्रमाण नमूद करून एक प्रत वाहनचालकालला दिली जाते, तर दुसरी केंद्रचालकाकडेच असते. या प्रतीचा पुढे कोणताही लेखाजोखा परिवहन विभागाकडे जमा केला जात नाही. त्यामुळे केंद्रचालकांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची कसलीही नोंद विभागाकडे मिळत नाही. परिणामी, काही केंद्रचालकांकडून बोगस प्रमाणपत्रे दिली जातात. प्रमाणपत्रावर खोट्या नोंदीचा प्रकारही उजेडात आला आहे. परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन पीयूसी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)