शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

पीयूसी केंद्रांवर नियंत्रणच नाही

By admin | Updated: March 11, 2015 01:07 IST

वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या पीयूसी केंद्रांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कसलेही नियंत्रण नसल्याची

पुणे : वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या पीयूसी केंद्रांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कसलेही नियंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्रांनी वाहनांची केलेली तपासणी तसेच त्यांच्याकडील वाहनांच्या माहितीची कोणतीही नोंद कुठेही ठेवली जात नाही. ही सर्व माहिती पीयूसी केंद्रांपर्यंतच मर्यादित राहत आहे. त्यामुळे पीयूसी केंद्रे केवळ उपचारासाठीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुण्यात पेट्रोल पंपावरील व फिरती अशी एकूण २१६ पीयूसी केंद्रे आहेत. या केंद्रांना आरटीओमार्फत परवाने देण्यात आले आहेत. तसेच, या केंद्रांकडून अयोग्य पद्धतीने चाचणी किंवा प्रमाणपत्र दिले जात असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आरटीओला आहे. मात्र, एखाद्या केंद्राबद्दल तक्रार आल्यानंतरच आरटीओकडून संबंंधित केंद्राची तपासणी केली जाते. काही केंद्रचालकांकडून वाहनचालकांना बोगस पीयूसी दिले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. तसेच, चाचणी घेताना निष्काळजीपणा केल्याचेही समोर आले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता केंद्रांवर परिवहन विभागाचे कसलेही नियंत्रण नाही. केंद्रांना मुंबईतून परिवहन विभागाकडून पीयूसी चाचणी प्रमाणपत्रे दिली जातात. एकदा ही प्रमाणपत्रे केंद्रचालकाच्या ताब्यात आल्यानंतर त्यांचे पुढे काय होते, याची माहिती विभागाकडे संकलित होत नाही.पीयूसी केंद्रचालकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये दोन प्रती असतात. वायूंचे प्रमाण नमूद करून एक प्रत वाहनचालकालला दिली जाते, तर दुसरी केंद्रचालकाकडेच असते. या प्रतीचा पुढे कोणताही लेखाजोखा परिवहन विभागाकडे जमा केला जात नाही. त्यामुळे केंद्रचालकांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची कसलीही नोंद विभागाकडे मिळत नाही. परिणामी, काही केंद्रचालकांकडून बोगस प्रमाणपत्रे दिली जातात. प्रमाणपत्रावर खोट्या नोंदीचा प्रकारही उजेडात आला आहे. परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन पीयूसी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)