शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
4
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
5
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
6
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
7
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
8
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
9
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
10
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
11
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
12
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
13
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
14
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
15
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
16
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
17
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
18
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
19
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
20
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला

बाजारपेठेला ‘चिनी’ वस्तूंशिवाय नाही पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारताने चिनी वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, चीन सरकारने भारताला चिनी वस्तूंशिवाय पर्याय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारताने चिनी वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र, चीन सरकारने भारताला चिनी वस्तूंशिवाय पर्याय नसल्याचे सांगत डिवचले आहे. प्रत्यक्षात चीन सरकारचे म्हणणे हे काहीअंशी खरे ठरले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रविवार पेठ, बोहरी आळीसारख्या मध्यवर्ती बाजारपेठेतही चिनी वस्तूंचा जुना माल विक्रीस काढला आहे आणि या वस्तूंच्या खरेदीस ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोदीसरकारने ‘स्वदेशी’चा नारा देत भारतीय वस्तूंच्या खरेदीवर भर द्या, असे आवाहन केले असले तरी भारतीय वस्तूंच्या तुलनेत चिनी वस्तू स्वस्त आहेत. त्यामुळे चिनी मालालाच पसंती दिली जात आहे. दरम्यान, मोबाईलमध्येही चीनचेच वर्चस्व अधिक असून, ‘वन प्लस’ला तरुणाईची अधिक मागणी आहे. या मोबाईलच्या ऑनलाईन खरेदीला तरुणवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे.

लडाखच्या सीमेवर चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर, भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा देत आवाहन केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला लोकांनी प्रतिसादही देण्यास सुरुवात केली. मात्र, कोरोनाने लोकांना देशप्रेमापेक्षा जगण्याचा धडा दिला. दिवसेंदिवस वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागत असल्याने स्वस्त वस्तूंच्या खरेदीकडे आता लोकांनी मोर्चा वळविला आहे. चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लाईटच्या माळा, सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. चिनी वस्तूंच्या आयत-निर्यातीवर बंदी असल्याने नवीन माल बाजारपेठेत आलेला नाही. परंतु, जो माल दोन वर्षांपासून घेऊन ठेवला आहे, त्याचे करायचे काय? म्हणून जुना चायना माल विकला जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.

--------------------------------------