शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची गरज

By admin | Updated: January 25, 2017 02:13 IST

सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण

पुणे : सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असे मत ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ‘अग्निपंख’ आयोजित दुसऱ्या युवा मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, माजी आमदार उल्हास पवार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, सचिन इटकर, प्रकाश पवार, सचिन सानप, कृष्णा काजळे, ज्ञानेश्वर मोडक, संकेत पडवळ, हनुमंत पवार उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘सांस्कृतिक आव्हान पेलण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. आज भटक्या विमुक्त समाजातील तरुण या संमेलनाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर फक्त जानव्यात, आळंदीत किंवा पुण्यात जन्मला येतो, असे नसून भटक्या तांड्यातही तो जन्म घेत आहे.’’युवकांची, परिवर्तनाची देशाला सातत्याने गरज असून, त्यासाठी साहित्य हे महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर विचार परिपक्व करण्याच्या दृष्टीने तरुणांनी करायला हवा. या माध्यमांमधील विकृतींपासून दूर राहायला हवे. आपल्यासमोर धार्मिक विकृतीला बळी पडणाऱ्या तरुणाईला वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भाकरीपासून ते लग्नापर्यंतचे तरुणांचे प्रश्न विवेकाने सोडवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.भाई वैद्य म्हणाले, ‘‘देशात सध्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा बिकट आव्हान तरुणांसमोर आहे. त्या आव्हानांना तोंड देताना परिणामी स्वकीयांच्याही विरोधात जाण्याची तयारी तरुणांनी ठेवायला हवी. तरुण भविष्याची आशा आहेत. मात्र, या देशात भविष्य कशा प्रकारचे घडणार आहे याचा प्रश्न पडला आहे. धर्मनिष्ठ राष्ट्र निर्माण करत असताना जे जन्मत: बंडखोर असतात अशा तरुणांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न सध्या होत आहेत. (प्रतिनिधी)