शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची गरज

By admin | Updated: January 25, 2017 02:13 IST

सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण

पुणे : सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असे मत ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. ‘अग्निपंख’ आयोजित दुसऱ्या युवा मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, माजी आमदार उल्हास पवार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, सचिन इटकर, प्रकाश पवार, सचिन सानप, कृष्णा काजळे, ज्ञानेश्वर मोडक, संकेत पडवळ, हनुमंत पवार उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘‘सांस्कृतिक आव्हान पेलण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. आज भटक्या विमुक्त समाजातील तरुण या संमेलनाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर फक्त जानव्यात, आळंदीत किंवा पुण्यात जन्मला येतो, असे नसून भटक्या तांड्यातही तो जन्म घेत आहे.’’युवकांची, परिवर्तनाची देशाला सातत्याने गरज असून, त्यासाठी साहित्य हे महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर विचार परिपक्व करण्याच्या दृष्टीने तरुणांनी करायला हवा. या माध्यमांमधील विकृतींपासून दूर राहायला हवे. आपल्यासमोर धार्मिक विकृतीला बळी पडणाऱ्या तरुणाईला वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भाकरीपासून ते लग्नापर्यंतचे तरुणांचे प्रश्न विवेकाने सोडवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.भाई वैद्य म्हणाले, ‘‘देशात सध्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा बिकट आव्हान तरुणांसमोर आहे. त्या आव्हानांना तोंड देताना परिणामी स्वकीयांच्याही विरोधात जाण्याची तयारी तरुणांनी ठेवायला हवी. तरुण भविष्याची आशा आहेत. मात्र, या देशात भविष्य कशा प्रकारचे घडणार आहे याचा प्रश्न पडला आहे. धर्मनिष्ठ राष्ट्र निर्माण करत असताना जे जन्मत: बंडखोर असतात अशा तरुणांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न सध्या होत आहेत. (प्रतिनिधी)