शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

फायर आॅडिट हवेच

By admin | Updated: February 16, 2016 01:46 IST

सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये सवाई गंधर्व, वसंतोत्सवापासून ते नट-नट्यांच्या, गायकांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांचे नेहमी आयोजन केले जाते.

पुणे : सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये सवाई गंधर्व, वसंतोत्सवापासून ते नट-नट्यांच्या, गायकांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांचे नेहमी आयोजन केले जाते. यासोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवांचे भव्य सेट, शहराच्या विविध भागांमध्ये अलीकडच्या काळात रंगणारे पैठणींचे कार्यक्रम, जंगी पार्ट्या आणि लग्नसमारंभ...या सर्वांनाच आगीचा धोका असतो. पोलीस आणि अग्निशामक दलाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तसेच सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्यामुळे मोठ्या दुर्घटना घडतात. मुंबईमध्ये ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमादरम्यान सेटला लागलेल्या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. सुदैवाने या अग्नितांडवामध्ये कोणालाही इजा झाली नाही, तसेच जीवितहानीही झाली नाही.अग्निशामक दल आणि पोलिसांनी घेतलेल्या ‘फायर आॅडिट’मुळे संभाव्य जीवितहानी टळली. अलीकडच्या काळात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. विशेषत: बालेवाडी आणि मोकळ्या मैदानांवर सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मोटारी, फर्निचर, बांधकाम व्यवसाय, गृहोपयोगी वस्तू, कापड, शैक्षणिक अशा स्वरूपाची मोठमोठी प्रदर्शने आयोजित केली जातात. असे कार्यक्रम आयोजित करताना जागेची मर्यादा आणि येणारी संभाव्य गर्दी याचा प्रकर्षाने विचार करणे आवश्यक असते. मात्र, आयोजकांकडून अनेकदा त्याचा विचार केला जात नाही. भव्य कार्यक्रम आयोजित करताना अग्निशामक दल, पोलीस, करमणूक विभाग, महापालिका यांची परवानगी आवश्यक असते. विशेषत: अग्निशामक दल आणि पोलिसांच्या परवानगी या सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून फारच महत्त्वाच्या असतात. सुरक्षा व्यवस्थेची तसेच दुर्घटना घडल्यास केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून या दोन्ही घटकांनी परवानगी देणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा ‘स्पॉट व्हिजिट’ न करताच परवानग्या दिल्या जातात. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. नागरिकांनीही कार्यक्रमांना जाताना आपत्कालीन मार्ग, अग्निरोधक यंत्रणा याची माहिती घेतली पाहिजे. जेणेकरून दुर्घटना घडलीच तर सुखरूप बाहेर पडता येईल. दुर्घटना घडल्यानंतर सर्वांत मोठी भीती चेंगराचेंगरी होण्याची असते. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण आणि बाहेर पडण्यासाठी भरपूर मार्ग असायला हवेत. परंतु आयोजकांकडून याबाबतीत लक्ष घातले जात नसल्याचे अग्निशामक दलाचे निरीक्षण आहे. अग्निशामक दलाकडून आयोजकांना ‘टेम्पररी स्ट्रक्चर’ नियमावलीचे पालन करण्यासंदर्भात पत्र दिले जाते. आसन व्यवस्थेमध्ये दोन व्यक्ती, दोन खुर्च्यांमध्ये किती अंतर असावे इथपासून आपत्कालीन मार्गाच्या रचनेपर्यंतची सर्व माहिती दिली जाते. कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात येणार असल्यास त्यासाठी आपत्कालीन मार्गांची पुरेशी रचना असणे आवश्यक आहे. यासोबत प्रदर्शनांमध्ये अग्निशामक दलाचा बंब असणे आवश्यक आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये ‘फायर व्हेईकल्स’ राखीव ठेवणे बंधनकारक आहे. अग्निशामक दलाकडून वाहने घेतल्यास नाममात्र शुल्क आकारून ही वाहने पुरवली जातात. पोलिसांकडून कार्यक्रमांना लाऊड स्पीकर परवाना तसेच कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाते. परंतु, पोलिसांची भूमिका कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देण्याची असते. कार्यक्रम, प्रदर्शनांमध्ये येणाऱ्यांची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी आयोजकांचीच आहे. त्यासाठी ते शुल्क आकारत असतात. पोलिसांकडून कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हे पाहिले जाते. मात्र, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या खांद्यावर सुरक्षा टाकून आयोजक निर्धास्त होतात. दुर्घटना घडल्यास परिस्थिती नाजूकपणे हाताळणे महत्त्वाचे असते. जीवितहानी होऊ नये, जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध ठेवणे हीसुद्धा आयोजकांचीच जबाबदारी आहे. मात्र, फायदा कमावण्याच्या नादात नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ही बाब गंभीर आहे.- श्रीकांत पाठक, उपायुक्त, विशेष शाखा, पुणे पोलीसकार्यक्रम आयोजकांकडून अग्निप्रतिरोधक यंत्रणा, गर्दीचे नियोजन, आपत्कालीन मार्ग याचा अनेकदा विचारच केला जात नाही. कोणतीही दुर्घटना घडलीच तर अग्निशामक दल, पोलीस घटनास्थळी काही मिनिटांतच धावतात. बचावकार्य तेच करीत असल्यामुळे आयोजक निर्धास्त असतात. आयोजकांनी सुरक्षेची काळजी घेणे बंधनकारकच आहे. मात्र, त्यांच्याकडून काळजी घेतली जात नाही. अनेकदा आसनक्षमतेपेक्षा अधिक लोकांचा भरणा केला जातो. त्यामुळे चेंगराचेंगरीचा प्रकार घडू शकतो. दलाकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी करूनच परवानगी दिली जाते. - प्रशांत रणपिसे, प्रमुख अग्निशामक दल, पुणे