शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या वाटेवरही अनेक प्रकल्प रखडलेले

By admin | Updated: May 2, 2015 05:28 IST

शहरात सायन्स पार्क, दुमजली उड्डाणपूल, चोवीस तास पाणीपुरवठा, विविध रस्ते हे प्रकल्प गेल्या दोन वर्षात पूर्णत्वास गेले. मात्र, काही महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत.

शहरात सायन्स पार्क, दुमजली उड्डाणपूल, चोवीस तास पाणीपुरवठा, विविध रस्ते हे प्रकल्प गेल्या दोन वर्षात पूर्णत्वास गेले. मात्र, काही महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी स्वस्त घरकुल योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने २००९ ला घेतला. यासाठी सुमारे पन्नास हजार जणांनी अर्ज केले. यामध्ये साडेतेरा हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यासाठी २०११ला सोडत काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६७२० लाभार्थींना, तर उर्वरित लाभार्थींना दुसऱ्या टप्प्यात घर देण्याचे ठरले. अद्यापपर्यंत पहिल्या टप्प्यातील ३०६६ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, यापैकी काही घरांचा ताबाही देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. लाभार्थी मात्र घर कधी मिळणार याकडेच डोळे लावून बसले आहेत. जागा उपलब्ध नसल्याने दुसरा टप्पा पूर्णत्वास जाईल की नाही अशी स्थिती आहे. २०११ ला सोडत काढल्यानंतर लाभार्थींच्या यादीत नाव आले, तेव्हापासून लाभार्थी घराची आस लावून बसले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पही अर्धवट स्थितीत आहेत. काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे तर काहींचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास उशीर होत आहे. विठ्ठलनगर येथे १३ इमारतींचा प्रकल्प राबविला जात असून, १० इमारतींतील घरांचे वाटप झाले आहे. निगडीतील सेक्टर क्रमांक २२ येथील प्रकल्प पूर्णत्वाला आला असतानाच तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. वेताळनगर येथील प्रकल्पातील ९ पैकी ४ इमारतीतील घरांचे वाटप झाले आहे. निगडी-दापोडी, काळेवाडी-देहू, आळंदी रस्ता, नाशिक फाटा-पिंपळे गुरव, सांगवी-किवळे या चार मार्गांवर बीआरटीएस प्रकल्पाचे नियोजित आहे.