शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

भुसार बाजारातील व्यवहारावरही आता वेळेची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मर्यादित ग्राहक आणि कमी वेळेत त्या त्या दिवशीचा बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मर्यादित ग्राहक आणि कमी वेळेत त्या त्या दिवशीचा बाजार चालविण्यावर बाजार समिती प्रशासनाने भर दिला आहे. यासाठी आता गूळ-भुसार विभाग सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेतच सुरू राहणार आहे. याआधी सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत भुसार बाजार सुरू होता. गर्दी टाळण्यासाठी या विभागातील व्यवहाराची वेळ कमी केल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आदी विभागांतील व्यवहाराची वेळ पहाटे ३ ते दुपारी १ अशी निश्चित केली आहे. तसेच भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ विभाग बाह्य पाकळ्या आणि अंतर्गत पाकळ्या दिवसाआड सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे या विभागातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात बाजार प्रशासनाला यश आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भुसार विभागातील व्यवहाराची वेळ कमी केली आहे.

--

बाजरात पासशिवाय प्रवेश नाही, किरकोळ व डमी विक्रेत्यांवर बंदी घातली आहे. परिणामी गर्दी कमी झाली आहे. रिक्षाला बंदी, मार्केट यार्डात येणारे सर्व रस्ते बॅरिकेड्सने अडविले आहेत. माल घेऊन येणा‍ऱ्या तसेच माल घेऊन जाणा‍ऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या गेटने प्रवेश दिला जात आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

- मधुकांत गरड, मुख्य प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

--

८२६ वाहनांतून बाजारात आवक

भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागात ८२६ वाहनांतून भाज्या, कांदा-बटाटा आणि फळांची बुधवारी आवक झाली. १७ हजार ७८८ क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी आला होता. तर कांद्याची ४ हजार ५३० क्विंटलची आवक झाली. कडक निर्बंध असले, तरी बाजारात विक्रमी आवक होत आहे. योग्य नियोजनामुळे बहुतांश मालाची विक्रीही होत आहे.

- बाबासाहेब बिबवे, फळबाजार विभागप्रमुख

--

मार्केट यार्डात प्रशासकांनी केलेल्या नियमांची, तसेच सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. गर्दी नियंत्रणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आवकही चांगली होत आहे. मात्र, काटेकोर अंमलबजावणीमुळे गर्दीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

- दत्तात्रय कळमकर, भाजीपाला विभागप्रमुख