शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारताचा इतिहास वेगळा राहिला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST

पुणे : “काळाला काय हवे हे ओळखणारे द्रष्टे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकर होते. या दोघांना दीर्घायुष्य ...

पुणे : “काळाला काय हवे हे ओळखणारे द्रष्टे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि यशवंतराव होळकर होते. या दोघांना दीर्घायुष्य मिळाले असते तर भारताचा इतिहास कदाचित वेगळा असता,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी केले.

महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने इतिहास संशोधक संजय सोनवणी लिखित ‘द अनसंग हिरो ऑफ इंडिया -महाराजा यशवंतराव होळकर’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन प्रा. हरी नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि लेखक संजय सोनवणी आणि प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश खाडे उपस्थित होते.

इतिहासकार हे मेहनत करून पुस्तके लिहितात. पण, ती योग्यरीत्या समाजासमोर आणली जात नाहीत हे दुर्दैव असल्याची खंत प्रा. नरके यांनी व्यक्त केली. उदात्तीकरण म्हणजे इतिहास नाही. इतिहासाची वस्तुनिष्ठ मांडणी करणे महत्त्वाचे असते. कोणताही इतिहास अंतिम नसतो. तो काळानुरूप नव्याने उलगडत जातो. असा इतिहास अभ्यासपूर्ण मांडणीद्वारे नव्या पिढीसमोर मांडला पाहिजे, असे ते म्हणाले.

“महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासारखा महान पराक्रम गाजविणाऱ्या राजाने कधी विश्रांती घेतली नाही. सतत संघर्ष आणि लढाई केली. पण त्यांच्याबद्दल कुणी साधी माहिती देखील करून घेत नाही. या महापुरुषांबद्दल थोडी कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे,” असे सोनवणी म्हणाले. आजही ऐतिहासिक अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी साधने उपलब्ध नाहीत. आम्ही मालिका, चित्रपट आणि कादंबरीला इतिहास समजतो. पण तो इतिहास नाही. आपल्या शिक्षण प्रवाहात इतिहासाचे धडे देणारी दृष्टी देखील नाही, असे सोनवणी म्हणाले.

-----------------------------------------------