शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

...तर शहराच्या विकासाला ब्रेक

By admin | Updated: April 22, 2017 04:03 IST

भाजप बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता संकुचित विचाराने काम करत आहे. यामुळे भविष्यात शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे

पुणे : भाजप बहुमताच्या जोरावर विरोधकांना विश्वासात न घेता संकुचित विचाराने काम करत आहे. यामुळे भविष्यात शहराच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसच्या शहराध्यक्षा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी येथे केले. महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाने बहुमताच्या जोरावर तब्बल ३५ टक्के अधिक दराची निविदा असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रस्ताव मान्य केला. या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण यांनी शुक्रवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, केंद्राच्या निधीतून कात्रज ते फुरसुंगी या संपूर्ण बाह्यवळण मार्गाचे काम पूर्ण होत असले तर त्याचे स्वागतच करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. या वेळी महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते चेतन तुपे उपस्थित होते. चव्हाण म्हणाल्या, की राष्ट्रवादी काँगे्रसची दहा वर्षे महापालिकेमध्ये सत्ता होती. निवडणुका सोडल्यास आमच्या पक्षाने सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊनच सभागृहात काम केले आहे. याची कल्पना भाजपलाही आहे. परंतु नुकतेच सत्तेत आलेल्या भाजपाने विरोधी पक्षांना विश्वासात घेणे तर दूरच; परंतु सभागृहातील बसण्याच्या जागांचे वाटप, सभागृहात बोलू न देणे असे संकुचित वृत्तीचे राजकारण केले आहे. यामुळे प्रशासनावर अंकुश राहणार नाही आणि शहराच्या विकासाला खीळ बसेल. (प्रतिनिधी)कात्रज चौकात सोमवारी राष्ट्रवादीचे आंदोलनसभागृहनेते श्रीनाथ भिमाले आता सांगताहेत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करून केंद्राच्या निधीतून त्याचा विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. असे होते तर भिमाले यांनी सभागृहातच सांगायला हवे होते. या ठिकाणी पादचारी भुयारी मार्गासह वाहतूक सुधारणेसाठी आवश्यक ती कामे करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका अमृता बाबर, पक्षाचे पदाधिकारी नमेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली २४ एप्रिलला या चौकात आंदोलन करण्यात येणार असल्याचे खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण आणि चेतन तुपे यांनी सांगितले.राष्ट्रवादीचे पक्षीय राजकारण : टिळेकरशहराचा बाह्यवळण रस्ता असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती वाढली आहे. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वारंवार अपघात होत आहेत. यामुळे या रस्त्यांसाठी गेल्या वीस वर्षांपासून आम्ही तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस झगटत होतो. वेळोवेळी मागणी करुन देखील या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुरेसा निधी टाकला नाही. यासाठी अनेक आदोलने केली त्यानंतर तुटपुंजी तरतुद करण्यात आली. आता विरोधक म्हणून बोलत असलेल्या याच राष्ट्रवादी काँग्रेसने अभियात्रिकी पुले ते पाटील इस्टेट दरम्यानचा उडाण पुलाची निविदा तब्बल ३५. ११ टक्के वाढीव दराने व शिवणे ते म्हात्रे पुल व संगमवाडी ते खराडी नदी काठचा रस्ता डिफर्ड पेमेंट पध्दतीने विकसित करण्यासाठी १८ टक्के वाढीव दराच्या निविदा मंजूर केल्या आहेत.