शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

त्यांचा ‘लाकडी पाळण्या’चा त्रास संपणार...!

By admin | Updated: September 4, 2016 04:03 IST

जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या गावी मांडवी नदीवर पूल नसल्यामुळे नदीपात्र अरुंद व खोल असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जो लाकडी पाळण्याचा त्रास

ओतूर : जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या गावी मांडवी नदीवर पूल नसल्यामुळे नदीपात्र अरुंद व खोल असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जो लाकडी पाळण्याचा त्रास सहन करावा लागत होता तो आता संपणार आहे. या पुलासाठी शासनाने ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा विषय सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडून विद्यार्थी‘दशा’ उघड केली होती. या गावातील विद्यार्थ्यांना मांडवी नदीला सतत पाणी असल्यामुळे लाकडी पाळण्यातून आजही ये-जा करावी लागते. शेतकऱ्यांनादेखील तराफाद्वारे, पाळण्याद्वारे शेतीमाल आंबेगाव येथे उतरून घ्यावा लागे. या वर्षानुवर्षे सुरू असणाऱ्या विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समस्येला लोकमतने वाचा फोडली. ‘स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण असे अधांतरी... धोकादायक लाकडी पाळण्यात आंबेगव्हाणच्या विद्यार्थ्यांचा जीव लागतो टांगणीला’ या शीर्षकाखाली ३० जुलै २०१६ रोजी प्रसिद्ध झाले. लोकमतच्या आॅनलाइन पोर्टलवरदेखील याचे व्हिडिओ झळकले आणि जगभरात हा विषय पोहोचला. लोकमतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर आमदार शरद सोनवणे, तहसीलदार आज्ञा होळकर, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी भेट दिली होती. त्या वेळी तहसीलदार होळकरने पाळण्याचा वापर करू नका, केल्यास कायदेशीर कारवाई करू, असे सांगितले होते. आमदार सोनवणे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना निवेदन देऊन आपत्ती व्यवस्थापन निधीतून त्वरित पुलाची मागणी केली होती. लोकमतमुळेच हा प्रश्न तडीस लागला, अशी भावना सामाजिक कार्यकर्ते नीलेश महाले व वाय. जी. जायकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कार्यकर्त्यांकडे चौकशी करता ते म्हणाले, ‘‘या मांडवी नदीवर एकेरी पूल बांधण्यासाठी शासनाने ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. १३ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संवेदनशील विषय म्हणून आपत्ती व्यवस्थापनातून ९७ लाख ८० हजार रुपयाचा निधी मंजूर केला व प्रस्ताव शासनाकडे पाठविला.’’६० मीटरचा एकेरी पूलहा एकेरी पूल ६० मीटर लांब १.८० मीटर रुंद व १० मीटर उंची असलेला पूल आहे. या पुलावरून छोटी चारचाकी, दुचाकी जाऊ-येऊ शकतील, असे नियोजन आहे. यासंबंधी जुन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जी. बी. यांच्याकडे दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.