शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

...ठाकरे-पवार सरकारवर आता विश्वास राहिला नाही : खासदार छत्रपती संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल ...

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला असल्याचे असे सरकारी वकिलांनीच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे सरकार यावर कोणते पाऊल उचलणार आहे? येत्या २५ जानेवारीला न्यायालयात जी अंतिम सुनावणी होणार आहे, सरकारची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न पडला आहे. सरकार हतबल झाल्याचीच शंका आम्हाला वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही,” अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाला ‘इडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. २४) छत्रपती संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर दि. २५ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या अंतिम सुनावणीत मला गडबड वाटू लागली आहे. आजवर मी नेहमी राज्य सरकारची बाजू घेत होतो. सरकारच्या बाबतीत सकारात्मक होतो. मात्र, यात काही धोका झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार राहणार आहे.”

ज्यांना कोणाला आरक्षण घ्यायचे असेल ते न्यायालयात जातील आणि आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतील, असे सरकारी वकिलांनीच मला सांगितले, असे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने हे धोरण राबवू नये. जर यात काही घोटाळा झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार असेल. कारण, त्यांच्याच वकिलाने त्यांना दिलेला हा सल्ला आहे.

‘सारथी’ हे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. मराठा समाजासाठी असणाऱ्या या संस्थेची अवस्था काय झाली आहे? मला समजत नाही नेमके काय सुरू आहे? सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. ‘इडब्ल्यूएस’च्या बाबतीत मी सांगितलेले सरकारला पटले. मात्र, एकदमच त्यांनी हा विषय काढला, त्यामध्ये त्यांचे काय गणित आहे, हे मला समजेना,”असे म्हणाले.

चौकट

आंदोलन व्यर्थ जाणार का?

“मराठा समाजातील सर्वजण १० टक्क्यात किती बसतात याचा अभ्यास करावा, किती टक्के आरक्षण मिळणार आहे याचाही अभ्यास करावा. एसइबीसीचे स्वतंत्र आरक्षण होते आणि हे आरक्षण पूर्ण वेगळे. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. ४८ लोकांनी बलिदान दिले. घरदार सोडून अनेकजण १९६७ पासून लढा दिला. अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. हे सगळे व्यर्थ जाणार आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे.” -छत्रपती संभाजीराजे