शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
4
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
5
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
6
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
7
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
8
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
9
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
10
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
11
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
12
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
13
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
14
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
15
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
16
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
18
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
19
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
20
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले

...ठाकरे-पवार सरकारवर आता विश्वास राहिला नाही : खासदार छत्रपती संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल ...

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतले, तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास (एसईबीसी)चे हक्काचे आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला असल्याचे असे सरकारी वकिलांनीच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे सरकार यावर कोणते पाऊल उचलणार आहे? येत्या २५ जानेवारीला न्यायालयात जी अंतिम सुनावणी होणार आहे, सरकारची भूमिका काय असेल, हा मोठा प्रश्न पडला आहे. सरकार हतबल झाल्याचीच शंका आम्हाला वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यातल्या सरकारवर आता विश्वास राहिलेला नाही,” अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाला ‘इडब्ल्यूएस’चा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (दि. २४) छत्रपती संभाजीराजे बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर दि. २५ जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. या अंतिम सुनावणीत मला गडबड वाटू लागली आहे. आजवर मी नेहमी राज्य सरकारची बाजू घेत होतो. सरकारच्या बाबतीत सकारात्मक होतो. मात्र, यात काही धोका झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार राहणार आहे.”

ज्यांना कोणाला आरक्षण घ्यायचे असेल ते न्यायालयात जातील आणि आर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण घेतील, असे सरकारी वकिलांनीच मला सांगितले, असे छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्य सरकारने हे धोरण राबवू नये. जर यात काही घोटाळा झाला तर याला राज्य सरकारच जबाबदार असेल. कारण, त्यांच्याच वकिलाने त्यांना दिलेला हा सल्ला आहे.

‘सारथी’ हे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. मराठा समाजासाठी असणाऱ्या या संस्थेची अवस्था काय झाली आहे? मला समजत नाही नेमके काय सुरू आहे? सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. ‘इडब्ल्यूएस’च्या बाबतीत मी सांगितलेले सरकारला पटले. मात्र, एकदमच त्यांनी हा विषय काढला, त्यामध्ये त्यांचे काय गणित आहे, हे मला समजेना,”असे म्हणाले.

चौकट

आंदोलन व्यर्थ जाणार का?

“मराठा समाजातील सर्वजण १० टक्क्यात किती बसतात याचा अभ्यास करावा, किती टक्के आरक्षण मिळणार आहे याचाही अभ्यास करावा. एसइबीसीचे स्वतंत्र आरक्षण होते आणि हे आरक्षण पूर्ण वेगळे. मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. ४८ लोकांनी बलिदान दिले. घरदार सोडून अनेकजण १९६७ पासून लढा दिला. अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली. हे सगळे व्यर्थ जाणार आहे का, याचे उत्तर सरकारने द्यावे.” -छत्रपती संभाजीराजे