शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ प्रमाणपत्राची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST

‘एनसीईआरटी’ने शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली. त्यामुळे २०१२ नंतर शिक्षक होण्यासाठी अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. ...

‘एनसीईआरटी’ने शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली. त्यामुळे २०१२ नंतर शिक्षक होण्यासाठी अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. राज्य शासनाने वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत सहा वेळा टीईटीची परीक्षा झाली. या परीक्षांमध्ये एकूण ८२ हजार २९८ उमेदवार उत्तीर्ण झाले. परीक्षेच्या पेपर एकमध्ये ४२ हजार व पेपर दोन मध्ये ४३ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १५ डिसेंबर २०१३ रोजी पहिली टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पेपर एकसाठी ३ लाख ८३ हजार ६३० तर पेपर दोनसाठी २ लाख ३५ हजार ७६१ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात एकूण ३१ हजार ७२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल २०१४ मध्ये मे महिन्यात जाहीर करण्यात आला. निकालाचे प्रमाणपत्र हे निकालाच्या तारखेपासून ७ वर्षांसाठी पात्र ठरणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पहिली परीक्षा दिलेल्या उमेदवारांची मुदत मे २०२१ रोजी संपली.

राज्यात २०१२ नंतर बंद असलेल्या शिक्षक भरतीवरील बंदी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी उठवली होती. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली. या प्रणालीच्या माध्यमातून सुमारे ६ हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. परंतु, शासनाने या प्रणालीमार्फतच पहिल्या टप्प्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्याचे जाहीर केले होते.

पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना टीईटी प्रमाणपत्राची मुदत संपली असली, तरी त्यांना या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, यापुढील भरतीसाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चौकट

राज्य परीक्षा परिषदेतर्फे मे महिन्यात टीईटी परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसेच केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे टीईटी प्रमाणपत्राची मुदत सात वर्षे एवढीच आहे.

- तुकाराम सुपे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे