शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘टीईटी’ प्रमाणपत्राची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:11 IST

‘एनसीईआरटी’ने शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली. त्यामुळे २०१२ नंतर शिक्षक होण्यासाठी अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. ...

‘एनसीईआरटी’ने शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली. त्यामुळे २०१२ नंतर शिक्षक होण्यासाठी अनेक उमेदवारांनी टीईटी परीक्षा दिली. राज्य शासनाने वर्षातून दोन वेळा टीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वर्षातून एकदाच ही परीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत सहा वेळा टीईटीची परीक्षा झाली. या परीक्षांमध्ये एकूण ८२ हजार २९८ उमेदवार उत्तीर्ण झाले. परीक्षेच्या पेपर एकमध्ये ४२ हजार व पेपर दोन मध्ये ४३ हजार उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १५ डिसेंबर २०१३ रोजी पहिली टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पेपर एकसाठी ३ लाख ८३ हजार ६३० तर पेपर दोनसाठी २ लाख ३५ हजार ७६१ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात एकूण ३१ हजार ७२ उमेदवार उत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल २०१४ मध्ये मे महिन्यात जाहीर करण्यात आला. निकालाचे प्रमाणपत्र हे निकालाच्या तारखेपासून ७ वर्षांसाठी पात्र ठरणार असल्याचेही केंद्र शासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पहिली परीक्षा दिलेल्या उमेदवारांची मुदत मे २०२१ रोजी संपली.

राज्यात २०१२ नंतर बंद असलेल्या शिक्षक भरतीवरील बंदी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी उठवली होती. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पद्धतीने व्हावी यासाठी शासनाने पवित्र पोर्टल प्रणाली विकसित केली. या प्रणालीच्या माध्यमातून सुमारे ६ हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. परंतु, शासनाने या प्रणालीमार्फतच पहिल्या टप्प्यात बारा हजार शिक्षकांची भरती करण्याचे जाहीर केले होते.

पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना टीईटी प्रमाणपत्राची मुदत संपली असली, तरी त्यांना या भरतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, यापुढील भरतीसाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता शिक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चौकट

राज्य परीक्षा परिषदेतर्फे मे महिन्यात टीईटी परीक्षा घेतली जाणार होती. परंतु, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. तसेच केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे टीईटी प्रमाणपत्राची मुदत सात वर्षे एवढीच आहे.

- तुकाराम सुपे, आयुक्त, राज्य परीक्षा परिषद, पुणे