शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कामगारांची चाचणी करा, अन्यथा कंपन्या बंद ठेवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST

आंबेठाण : खेड तालुक्यासह औद्योगिक भागातील गावांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत चालल्याने परिस्थिती गंभीर झाली. ही परिस्थिती आटोक्यात ...

आंबेठाण : खेड तालुक्यासह औद्योगिक भागातील गावांमध्ये कोरोना रुग्णाची संख्या प्रचंड वाढत चालल्याने परिस्थिती गंभीर झाली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांनी सर्व कामगारांची आरटी-पीसीआर चाचणी करावी, तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच कंपनीतील उत्पादन करावे, अन्यथा ८ मेपासून कंपन्या बंद करण्यात येतील, असा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनच्या क्षेत्रातील बहुतांश गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांनी प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये जाऊन कोरोना संबंधी कामगारांचे टेस्ट केलेले रिपोर्ट मागितले असता, आम्हाला बंधनकारक नाही व आम्हाला कसलेही शासनाचे परिपत्रक आमच्यापर्यंत आले नाही. मग, आम्ही कशाला टेस्ट करायची अशी चुकीची उत्तरं कंपनी प्रशासनाकडून मिळाली आहेत. शंभरातल्या फक्त एकदोन कंपन्यांत कामगारांची टेस्ट केल्याचे निदर्शनास आल्याने हे प्रमाण किती नगण्य आहे. कंपनीत गेल्यावर कामगारांना मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग आदी सुविधा पुरवल्या जात नसल्याने समोर आले आहे.

वराळे, शिंदेगाव, सावरदरी, भांबोली आदी गावांचे सरपंचांसह सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित एमआयडीसीतील कंपनीत जाऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येणाऱ्या ७ मे २०२१ पर्यंत सर्व कामगार वर्गाचे आरटी-पीसीआर टेस्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केलेल्या ८ मे २०२१ नंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून या कंपन्या बंद केल्या जातील, असा इशारा देण्यात आला आहे.

--

कोट

कंपन्यांनी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार काम करावे. कंपन्या बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. कंपन्यांनी काही दिवसांसाठी कामगारांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था करावी. कंपन्या बंद ठेवण्यात आल्या, तर कामगारांना त्या दिवसांचे पगार द्यावेत जेणेकरून रोजंदारीवर काम करणारे कामगार आपापल्या गावी जाणार नाहीत.

- अमोल पानमंद, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग.

--

९० टक्के कारखाने कामगारांची आरटी-पीसीआर तपासणी करत नाही. काहीजण रॅपिड ॲन्टीजन तपासणी करून लॅबकडून निगेटिव्ह रिपोर्ट मागतात. यामुळे कामगार मोठ्या प्रमाणावर संसर्गित झाले असून, त्यामुळे परिसरातील गावांना मोठा धोका पोहोचला आहे. तालुका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच सरपंचांनी कंपन्यांना तपासणी करण्याची विनंती आहे.

- शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य.

--------------------------------------------------------

फोटो क्रमांक : ०४ चाकण कंपनी टेस्ट

फोटो -कंपनीचे कामगार तपासणी करण्याचे पत्र कंपनी अधिकाऱ्यांना देताना वराळे गावचे सरपंच व ग्रामसेवक.