शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सुजलाम्, सुफलाम् बरोबर आरोग्यवर्धम् ही संज्ञा रूढ व्हावी : डाॅ. अविनाश भोंडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:17 IST

पुणे : भारताला कृषी, शिक्षण, अध्यात्म, तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांत मोठी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्याच समृद्ध परंपरेचा वारसा ...

पुणे : भारताला कृषी, शिक्षण, अध्यात्म, तंत्रज्ञान आदी सर्वच क्षेत्रांत मोठी समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्याच समृद्ध परंपरेचा वारसा लक्षात घेऊन सुजलाम्, सुफलाम् बरोबरच आरोग्यवर्धम् ही संज्ञा रूढ व्हावी, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ विधिज्ञ, विचारवंत, ॲड. भास्करराव आव्हाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ॲड. भास्करराव आव्हाड पुरस्काराने डाॅ. अविनाश भोंडवे यांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, डाॅ. भास्करराव आव्हाड यांचे बंधू ज्येष्ठ विधिज्ञ लेखक डाॅ. ॲड. सुधाकरराव आव्हाड आणि ॲड. भास्करराव आव्हाड यांचे चिरंजीव महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड उपस्थित होते.

डाॅ. भोंडवे म्हणाले, कोरोना हे महामारीचे संकट सर्वांनाच नवीन होते. आम्हालादेखील रोज जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्ययावत माहिती येत होती. त्यामुळे सुरुवातीला सर्वच स्तरावर गोंधळाचे वातावरण होते. वैद्यकीय माहिती ही किचकट स्वरूपात येत असल्याने त्याचे सुलभीकरण करून समाजात पसरलेली भीती आणि अस्वस्थता कशी कमी करता येईल या दृष्टीने मी लेखन आणि प्रबोधन करीत गेलो. सुशिक्षितांमध्येदेखील आरोग्याविषयी अज्ञान पाहून आरोग्य क्षेत्रात अजूनही आपणांस बराच मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात आले. बालमृत्यू, गरोदर महिलांचे आरोग्याचे प्रश्न तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याबाबतचे प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आरोग्य साक्षरता वाढविणे आवश्यक आहे.

डाॅ. पी.डी. पाटील म्हणाले, समाज भांबावलेल्या अवस्थेत असताना डाॅ. अविनाश भोंडवे यांनी त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले. अवघड काळात ते उभे राहिले.

यावेळी ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले, तर उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.