शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

‘इलेक्शन फंड’साठी भाजपाकडून समाविष्ट गावांसाठी निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये मलवाहिन्या आणि एसटीपी प्लांट उभारण्यासाठी ३९२ कोटींची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये मलवाहिन्या आणि एसटीपी प्लांट उभारण्यासाठी ३९२ कोटींची काढलेली निविदा म्हणजे पालिकेच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) जागाच ताब्यात नसतानाही निविदा काढण्यात आली असून ठराविक ठेकेदाराला फायदा मिळवून देण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे. भाजपाने ‘इलेक्शन फंड’साठी हा घाट घातल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे.

‘मनसे’चे शहराध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते वसंत मोरे, नेते बाबू वागस्कर यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत हे आरोप केले. मोरे म्हणाले की, निविदेमध्ये टाकलेल्या अटी व शर्ती ठराविक ठेकेदाराला नजरेसमोर ठेवून टाकल्या आहेत. ड्रेनेज विभागाचे अधिकारी आणि दोन ठेकेदारांचे फोन कॉल डिटेल्स तपासले जावेत आणि दोषींवर कारवाई करावी. मांजरी व केशवनगर येथे दोन एसटीपी प्लांट उभारण्यासाठी १० हेक्टर जागेची गरज आहे. यापैकी मांजरीची जागा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आहे. अद्याप एकाही जागा मालकाशी भूसंपादनाबाबत पत्रव्यवहार झालेला नाही.

मे. खिलारी इन्फ्रास्टक्चर कंपनीला पालिकेने २०१६ ते २०१८ अशी सलग दोन वर्ष काळ्या यादीत टाकले होते. या कंपनीला पुन्हा कामे देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविणे आवश्यक असतानाही केवळ काळ्या यादीचा कालावधी संपल्याचे कारण देत पुन्हा काम देण्यात आले आहे. पात्र ठेकेदाराला ‘मोबीलायजेशन अ‍ॅडव्हान्स’ म्हणून १० टक्के अर्थात सुमारे ४० कोटी रुपये देण्यात येणार आहे. राज्य शासनाने अशा स्वरुपाची रक्कम देण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांना मनाई केलेली आहे. तरीही ही रक्कम का दिली जात आहे असा सवाल मोरे व वागस्कर यांनी केला.

चौकट

‘मनसे’चे आरोप म्हणजे विकासाला खीळ

“मनसेने केलेल्या आरोपांमधून केवळ समाविष्ट गावांचा विकास रोखण्याचा आणि विकास कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न दिसतोय. बिनबुडाच्या आरोपांमुळे विकास कामांना खीळ बसली तर या गावांचे नुकसान होणार आहे. या गावांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक त्या विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.”

- गणेश बिडकर, सभागृह नेता