शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

दहा वर्षांनंतर निधी मिळूनही कामे रखडलेलीच!

By admin | Updated: April 6, 2016 01:29 IST

पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या.

भोर : पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्या कामासाठी तब्बल १० वर्षांनी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाईपलाईन टाकण्यास हद्द निश्चित करून दिली जात नसल्याने दोन महिन्यांपासून काम रखडले आहे.त्याचा परिणाम ९ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर होत असून, आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे याची शाश्वती नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कामाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. काम त्वरित सुरु न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तब्बल १० वर्षे वाट पाहिल्यावर दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. महामार्गावरील शिंदेवाडी, खेड शिवापूर, वेळू, वर्वे, नसरापूर, कामथडी, कापूरव्होळ,किकवी, सारोळे या गावांतील नळपाणी पुरवठाच्या पाईपलाईन तुटलेल्या होत्या. १० वर्षांपूर्वी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्तारुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या आजूबाजूने गेलेल्या गावातील नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्यामुळे गावांसह वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हापासून हे काम करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत होते. मात्र दशकभराने हे काम सुरू होण्याची आशा असताना ठेकेदारास पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून हद्द निश्चित करून मिळत नसल्याने हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु करता येत नाही. दुसरीकडे हे काम वेगात सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरुच झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा व महामार्ग प्राधिकरण यांच्यात ताळमेळ नाही. दोघांकडून टोलवाटोलवी सुरूअसल्याचे दिसून येत आहे. या वादात मात्र लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.(वार्ताहर)