शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दहा वर्षांनंतर निधी मिळूनही कामे रखडलेलीच!

By admin | Updated: April 6, 2016 01:29 IST

पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या.

भोर : पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्या कामासाठी तब्बल १० वर्षांनी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाईपलाईन टाकण्यास हद्द निश्चित करून दिली जात नसल्याने दोन महिन्यांपासून काम रखडले आहे.त्याचा परिणाम ९ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर होत असून, आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे याची शाश्वती नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कामाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. काम त्वरित सुरु न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.तब्बल १० वर्षे वाट पाहिल्यावर दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. महामार्गावरील शिंदेवाडी, खेड शिवापूर, वेळू, वर्वे, नसरापूर, कामथडी, कापूरव्होळ,किकवी, सारोळे या गावांतील नळपाणी पुरवठाच्या पाईपलाईन तुटलेल्या होत्या. १० वर्षांपूर्वी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्तारुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या आजूबाजूने गेलेल्या गावातील नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्यामुळे गावांसह वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हापासून हे काम करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत होते. मात्र दशकभराने हे काम सुरू होण्याची आशा असताना ठेकेदारास पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून हद्द निश्चित करून मिळत नसल्याने हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु करता येत नाही. दुसरीकडे हे काम वेगात सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरुच झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा व महामार्ग प्राधिकरण यांच्यात ताळमेळ नाही. दोघांकडून टोलवाटोलवी सुरूअसल्याचे दिसून येत आहे. या वादात मात्र लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.(वार्ताहर)