शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

मावळ तालुक्यातील दहा व्यक्ती सुखरूप

By admin | Updated: April 27, 2015 04:58 IST

पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या मावळ तालुक्यातील ३ कुटुंबातील १० व्यक्ती सुखरूप आहेत. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा

वडगाव मावळ : पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या मावळ तालुक्यातील ३ कुटुंबातील १० व्यक्ती सुखरूप आहेत. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. वडगाव मावळ येथून चौधरी यात्रा कंपनीच्या बसमधून नेपाळ येथे रवाना झाले. शनिवार दि. २५ रोजी दुपारी १२ वा. नेपाळची राजधानी काठमांडू शहरापासून सुमारे २०० किमी अंतरावरील नारायणी घाट येथे पोहोचले होते. त्याच सुमारास तीव्र भूकंप झाल्याने त्यांना शनिवारी पूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली. चिंतेत असलेले म्हाळसकर व काकरे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्कामुळे आनंदित झाले असून, ते घरी पोहोचण्याची प्रतीक्षा करत आहेत.वडगावातील संतोष निवृत्ती म्हाळसकर (वय ३२), राणी संतोष म्हाळसकर (वय २८), ओम संतोष म्हाळसकर (९), शिवराज संतोष म्हाळसकर (६), वैशाली पोपट म्हाळसकर (३६), अंशुमन पोपट म्हाळसकर (१४), आविष्कार पोपट म्हाळसकर (१२), जांभूळ येथील शंकर दत्तात्रय काकरे (४०), गौरी शंकर काकरे (३६) व कार्तिक शंकर काकरे (वय १३) उन्हाळी सुटीत पर्यटनासाठी रवाना झाले होते. तेथे तीव्र भूकंपामुळे इमारती, रस्ते व मंदिरे जमीनदोस्त होऊन हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. अनेक नागरिक ढिगाऱ्यात अडकले असून, अनेक जखमी झाल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे या ३ कुटुंबातील १० व्यक्तींसह दोन बसमधील ९० प्रवासी अडकून पडले होते. या परिसरात रात्री बाराला भूकंपाचे पुन्हा हादरे बसण्याचा अंदाज सांगितल्याने प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन पूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढली.म्हाळसकर यांचे भाऊ सतीश निवृत्ती म्हाळसकर यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर संपर्क झाला नसल्याने म्हाळसकर व काकरे कुटुंबीय चिंतेत होते. शेवटी शनिवारी रात्री ११ वा. त्यांच्याशी संपर्क झाला. तहसीलदार शरद पाटील म्हणाले, ‘‘रविवारी पहाटे ५ वा. यात्रा कंपनीच्या दोन बसमधील ९० प्रवासी नारायणी घाट येथून भारतात निघाले असून, त्यांच्यासोबत रविवारी सकाळी ११ वा. संपर्क झाला आहे. ते सुखरूप बिहार राज्यात पोहोचले असून, चार ते पाच दिवसांत घरी पोहोचतील. नेपाळमध्ये फिरण्यास गेलेल्या व्यक्तींची प्रतीक्षा त्यांचे कुटुंबीय करत आहे. या कुटुंबीयांची माहिती शासनाला कळविली आहे.’’