शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

मावळ तालुक्यातील दहा व्यक्ती सुखरूप

By admin | Updated: April 27, 2015 04:58 IST

पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या मावळ तालुक्यातील ३ कुटुंबातील १० व्यक्ती सुखरूप आहेत. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा

वडगाव मावळ : पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेलेल्या मावळ तालुक्यातील ३ कुटुंबातील १० व्यक्ती सुखरूप आहेत. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. वडगाव मावळ येथून चौधरी यात्रा कंपनीच्या बसमधून नेपाळ येथे रवाना झाले. शनिवार दि. २५ रोजी दुपारी १२ वा. नेपाळची राजधानी काठमांडू शहरापासून सुमारे २०० किमी अंतरावरील नारायणी घाट येथे पोहोचले होते. त्याच सुमारास तीव्र भूकंप झाल्याने त्यांना शनिवारी पूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली. चिंतेत असलेले म्हाळसकर व काकरे कुटुंबीय त्यांच्याशी संपर्कामुळे आनंदित झाले असून, ते घरी पोहोचण्याची प्रतीक्षा करत आहेत.वडगावातील संतोष निवृत्ती म्हाळसकर (वय ३२), राणी संतोष म्हाळसकर (वय २८), ओम संतोष म्हाळसकर (९), शिवराज संतोष म्हाळसकर (६), वैशाली पोपट म्हाळसकर (३६), अंशुमन पोपट म्हाळसकर (१४), आविष्कार पोपट म्हाळसकर (१२), जांभूळ येथील शंकर दत्तात्रय काकरे (४०), गौरी शंकर काकरे (३६) व कार्तिक शंकर काकरे (वय १३) उन्हाळी सुटीत पर्यटनासाठी रवाना झाले होते. तेथे तीव्र भूकंपामुळे इमारती, रस्ते व मंदिरे जमीनदोस्त होऊन हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. अनेक नागरिक ढिगाऱ्यात अडकले असून, अनेक जखमी झाल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यामुळे या ३ कुटुंबातील १० व्यक्तींसह दोन बसमधील ९० प्रवासी अडकून पडले होते. या परिसरात रात्री बाराला भूकंपाचे पुन्हा हादरे बसण्याचा अंदाज सांगितल्याने प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन पूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढली.म्हाळसकर यांचे भाऊ सतीश निवृत्ती म्हाळसकर यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर संपर्क झाला नसल्याने म्हाळसकर व काकरे कुटुंबीय चिंतेत होते. शेवटी शनिवारी रात्री ११ वा. त्यांच्याशी संपर्क झाला. तहसीलदार शरद पाटील म्हणाले, ‘‘रविवारी पहाटे ५ वा. यात्रा कंपनीच्या दोन बसमधील ९० प्रवासी नारायणी घाट येथून भारतात निघाले असून, त्यांच्यासोबत रविवारी सकाळी ११ वा. संपर्क झाला आहे. ते सुखरूप बिहार राज्यात पोहोचले असून, चार ते पाच दिवसांत घरी पोहोचतील. नेपाळमध्ये फिरण्यास गेलेल्या व्यक्तींची प्रतीक्षा त्यांचे कुटुंबीय करत आहे. या कुटुंबीयांची माहिती शासनाला कळविली आहे.’’