शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

दहा शिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: December 10, 2015 01:31 IST

भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे.

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून दोन बंदुका, मारलेला ससा, जळलेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आले. वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. कोकणातून काही शिकारी शिकार करण्यासाठी अभयारण्यात आल्याची बातमी त्यांना मिळाली होती. त्यांनी सर्व वनरक्षकांना जंगलात फिरवून शिकाऱ्यांचा ठिकाणा शोधून काढला. खेड तालुक्यातील यळवली गावाच्या हद्दीत आंबेनळीच्या जवळ शिकारी रात्री मुक्कामी असल्याचे वनरक्षक बी. टी. खरात यांना आढळून आले. रात्री पकडण्यापेक्षा पहाटे शिकाऱ्यांना पकडण्याचे नियोजन तुषार ढमढेरे यांनी केले व रात्रीपासूनच त्यांच्यावर नजर ठेवली.ढमढेरे यांच्यासह वनमजूर डी. आर. सुपे, वनपाल पी. पी. लांघी असे सुमारे १२ वनकर्मचाऱ्यांच्या टीमने दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सापळा रचून शिकाऱ्यांवर धाड टाकली. सर्वप्रथम बंदुका ताब्यात घेऊन आरोपींना पकडले. यांतील काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य प्रकारे सापळा लावलेला असल्यामुळे सर्व आरोपी पकडण्यात यश आले. कारवाईच्या ठिकाणी शिकाऱ्यांकडून ठासणीची बंदूक, हत्यारे, मारलेला ससा व जळालेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आला. हा प्राणी मुुंगूस किंवा उदमांजर असल्याचा अंदाज वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपींमध्ये गुरुनाथ तातू वारे, मोहन वसंत वारे, गणेश जैतू उघडे, बळीराम जाणू दरवडा, रवी शंकर पादीर, चिंतामण रामा उघडे, मंगेश गोटीराम हिंदोळ, भरत भगवान मांगे, केतन वसंत वारे व माधव गोविंद उघडे या १० जणांचा समावेश असून, सर्व आरोपी धोत्रेवाडी (ता. कर्जत, जि. रायगड) येथील आहेत. या सर्व आरोपींना सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे व तुषार ढमढेरे यांनी राजगुरुनगर येथे न्यायालयात हजर केले असता, दि. १४ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींवर वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ नुसार विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करणे, विनापरवाना अभयारण्यात शस्त्र बाळगणे, अभयारण्यात वस्तू पेटविणे, अभयारण्यात शिकार करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे पुढील तपास करीत आहेत. शिकार करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी वन्यजीव अधिनियमानुसार शिक्षा होऊ शकते. भीमाशंकरचे जंगल हे जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असून, सगळ्यांकडून त्याचे संरक्षण झाले पाहिजे. भीमाशंकरच्या जंगलात आठ वनसंरक्षण समितीच्या मार्फत काम सुरू आहे़ स्थानिकही जंगलाबाबत जागरूक होत आहेत.(वार्ताहर)