शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

दहा शिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: December 10, 2015 01:31 IST

भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे.

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यातील यळवली गावाच्या जवळ जंगली प्राण्यांची शिकार करताना १० शिकाऱ्यांना वन्यजीव विभागाने पकडले आहे. त्यांच्याकडून दोन बंदुका, मारलेला ससा, जळलेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आले. वनक्षेत्रपाल तुषार ढमढेरे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. कोकणातून काही शिकारी शिकार करण्यासाठी अभयारण्यात आल्याची बातमी त्यांना मिळाली होती. त्यांनी सर्व वनरक्षकांना जंगलात फिरवून शिकाऱ्यांचा ठिकाणा शोधून काढला. खेड तालुक्यातील यळवली गावाच्या हद्दीत आंबेनळीच्या जवळ शिकारी रात्री मुक्कामी असल्याचे वनरक्षक बी. टी. खरात यांना आढळून आले. रात्री पकडण्यापेक्षा पहाटे शिकाऱ्यांना पकडण्याचे नियोजन तुषार ढमढेरे यांनी केले व रात्रीपासूनच त्यांच्यावर नजर ठेवली.ढमढेरे यांच्यासह वनमजूर डी. आर. सुपे, वनपाल पी. पी. लांघी असे सुमारे १२ वनकर्मचाऱ्यांच्या टीमने दि. ८ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सापळा रचून शिकाऱ्यांवर धाड टाकली. सर्वप्रथम बंदुका ताब्यात घेऊन आरोपींना पकडले. यांतील काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य प्रकारे सापळा लावलेला असल्यामुळे सर्व आरोपी पकडण्यात यश आले. कारवाईच्या ठिकाणी शिकाऱ्यांकडून ठासणीची बंदूक, हत्यारे, मारलेला ससा व जळालेल्या अवस्थेतील प्राणी मिळून आला. हा प्राणी मुुंगूस किंवा उदमांजर असल्याचा अंदाज वनकर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आरोपींमध्ये गुरुनाथ तातू वारे, मोहन वसंत वारे, गणेश जैतू उघडे, बळीराम जाणू दरवडा, रवी शंकर पादीर, चिंतामण रामा उघडे, मंगेश गोटीराम हिंदोळ, भरत भगवान मांगे, केतन वसंत वारे व माधव गोविंद उघडे या १० जणांचा समावेश असून, सर्व आरोपी धोत्रेवाडी (ता. कर्जत, जि. रायगड) येथील आहेत. या सर्व आरोपींना सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे व तुषार ढमढेरे यांनी राजगुरुनगर येथे न्यायालयात हजर केले असता, दि. १४ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या आरोपींवर वन्यजीव संरक्षक अधिनियम १९७२ नुसार विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करणे, विनापरवाना अभयारण्यात शस्त्र बाळगणे, अभयारण्यात वस्तू पेटविणे, अभयारण्यात शिकार करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक मुख्य संरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे पुढील तपास करीत आहेत. शिकार करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी वन्यजीव अधिनियमानुसार शिक्षा होऊ शकते. भीमाशंकरचे जंगल हे जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण असून, सगळ्यांकडून त्याचे संरक्षण झाले पाहिजे. भीमाशंकरच्या जंगलात आठ वनसंरक्षण समितीच्या मार्फत काम सुरू आहे़ स्थानिकही जंगलाबाबत जागरूक होत आहेत.(वार्ताहर)