शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सांगा आम्ही आता जगायचं तरी कसं?

By admin | Updated: November 30, 2015 01:47 IST

‘सांगा आम्ही कसं जगायचं?...’ या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील प्रश्नाप्रमाणे मावळातील कातकरी आदिवासी समाजाचे जगणे झाले आहे

वडगाव मावळ : ‘सांगा आम्ही कसं जगायचं?...’ या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील प्रश्नाप्रमाणे मावळातील कातकरी आदिवासी समाजाचे जगणे झाले आहे. महागाई, टंचाई व भाववाढीने साधं माणसासारखं जगणंही अशक्य व्हावं, अशी गोरगरीब आदिवासी कातकरी समाजाची स्थिती झाली आहे. मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या या समाजाचे सर्व प्रयास भाकरीसाठीच चाललेले असतात. कारण भुकेची आग शांत करण्यासाठी माणसाला काहीही करावं लागतं. काबाडकष्ट करीत, रानोमाळ भटकत मिळेल ते अन्न खावून जठराग्नी शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. चैन,सूख त्यांच्यासाठी दुरापास्तच. सध्या कुपोषण ही समस्या कातकरी समाज्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या म्हणीप्रमाणे आजची परिस्थिती आहे. त्यामुळेच कातकरी समाजात समस्याच समस्या आहेत. शेती, महिलांचे प्रश्न. बालकांचे कुपोषण, बालमृत्यू, बालकामगार, शोषण, शैक्षणिक अडचणी अशा अनेक , समस्या कातकरी समाजाला भेडसावत आहेत. मावळमधील कातकरी महिला आणि कुपोषित बालकांची समस्या अधिकच बिकट आहे. कातकरी पाड्यापर्यंत पोषण आहार योजना पोहोचत नसल्यामुळे कातकरी माता आणि त्यांच्या बालकांचे कुपोषण सुरुच आहे. पाड्यापर्यंत शासकिय वैद्याकिय अधिकारी किंवा सुविधा पोहोचत नाही. ज त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न तर दिवसेंदिवस बिकट बनत आहे. कातकरी महिला आपल्या मुलांवर घरगुतीच उपचार करतात. त्याने जर बालक बरे झाले नाही तर त्यास उपचारासाठी घेवून जातात. आजही मावळमधील कातकरी पाड्यापर्यंत वीज किंवा पाणी आलेले नाही. शिधापत्रिकाही नसल्यामुळे कातकरींना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. या समाजातील लोकांसाठी काम करण्यासाठी सामाजिक संस्थांही सहसा पुढे येत नाहीत. राजकीय नेते त्यांना फक्त मतदानकार्ड काढून देतात व या समाजाचा वापर मतदानासाठी करतात. निवडणुकीनंतर समाजाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. मावळमधील शेकडो कातकरी तरुण शिक्षणाअभावी फिरत आहेत. झोपडीची जमीनही नाही नावेशिक्षणाचा अभाव, अज्ञान,अंधश्रद्धा यामुळे हा समाज पिचला आहे. त्यामुळे अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजाही ते व्यवस्थित भागवू शकत नाही. ते राहत असलेल्या झोपडीखालची जमीनदेखील त्यांच्या नावे नसल्यामुळे मूळ मालक त्यांना त्रास देतात. त्यांच्याकडे पिवळे रेशनिंग कार्ड असूनही त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे या अदिवासी लोकांच्या उपजीविकेसाठी शासनाने त्यांना धरणामध्ये मासेमारीची परवानगी द्यावी.- बंडू ठाकर, सह्याद्री आदिवासी विकास संघटना, जिल्हाध्यक्ष