शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

सांगा आम्ही आता जगायचं तरी कसं?

By admin | Updated: November 30, 2015 01:47 IST

‘सांगा आम्ही कसं जगायचं?...’ या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील प्रश्नाप्रमाणे मावळातील कातकरी आदिवासी समाजाचे जगणे झाले आहे

वडगाव मावळ : ‘सांगा आम्ही कसं जगायचं?...’ या कवी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील प्रश्नाप्रमाणे मावळातील कातकरी आदिवासी समाजाचे जगणे झाले आहे. महागाई, टंचाई व भाववाढीने साधं माणसासारखं जगणंही अशक्य व्हावं, अशी गोरगरीब आदिवासी कातकरी समाजाची स्थिती झाली आहे. मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने असलेल्या या समाजाचे सर्व प्रयास भाकरीसाठीच चाललेले असतात. कारण भुकेची आग शांत करण्यासाठी माणसाला काहीही करावं लागतं. काबाडकष्ट करीत, रानोमाळ भटकत मिळेल ते अन्न खावून जठराग्नी शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. चैन,सूख त्यांच्यासाठी दुरापास्तच. सध्या कुपोषण ही समस्या कातकरी समाज्यासाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या म्हणीप्रमाणे आजची परिस्थिती आहे. त्यामुळेच कातकरी समाजात समस्याच समस्या आहेत. शेती, महिलांचे प्रश्न. बालकांचे कुपोषण, बालमृत्यू, बालकामगार, शोषण, शैक्षणिक अडचणी अशा अनेक , समस्या कातकरी समाजाला भेडसावत आहेत. मावळमधील कातकरी महिला आणि कुपोषित बालकांची समस्या अधिकच बिकट आहे. कातकरी पाड्यापर्यंत पोषण आहार योजना पोहोचत नसल्यामुळे कातकरी माता आणि त्यांच्या बालकांचे कुपोषण सुरुच आहे. पाड्यापर्यंत शासकिय वैद्याकिय अधिकारी किंवा सुविधा पोहोचत नाही. ज त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न तर दिवसेंदिवस बिकट बनत आहे. कातकरी महिला आपल्या मुलांवर घरगुतीच उपचार करतात. त्याने जर बालक बरे झाले नाही तर त्यास उपचारासाठी घेवून जातात. आजही मावळमधील कातकरी पाड्यापर्यंत वीज किंवा पाणी आलेले नाही. शिधापत्रिकाही नसल्यामुळे कातकरींना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. या समाजातील लोकांसाठी काम करण्यासाठी सामाजिक संस्थांही सहसा पुढे येत नाहीत. राजकीय नेते त्यांना फक्त मतदानकार्ड काढून देतात व या समाजाचा वापर मतदानासाठी करतात. निवडणुकीनंतर समाजाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. मावळमधील शेकडो कातकरी तरुण शिक्षणाअभावी फिरत आहेत. झोपडीची जमीनही नाही नावेशिक्षणाचा अभाव, अज्ञान,अंधश्रद्धा यामुळे हा समाज पिचला आहे. त्यामुळे अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजाही ते व्यवस्थित भागवू शकत नाही. ते राहत असलेल्या झोपडीखालची जमीनदेखील त्यांच्या नावे नसल्यामुळे मूळ मालक त्यांना त्रास देतात. त्यांच्याकडे पिवळे रेशनिंग कार्ड असूनही त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे या अदिवासी लोकांच्या उपजीविकेसाठी शासनाने त्यांना धरणामध्ये मासेमारीची परवानगी द्यावी.- बंडू ठाकर, सह्याद्री आदिवासी विकास संघटना, जिल्हाध्यक्ष