शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

टेकावडे खूनप्रकरणी गुंतागुंत

By admin | Updated: November 19, 2015 04:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खून प्रकरणानंतर गुंतागुत वाढू शकते, याची कुणकुण लागलेल्यांच्या वर्तणुकीत बदल जाणवू लागला होता.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्या खून प्रकरणानंतर गुंतागुत वाढू शकते, याची कुणकुण लागलेल्यांच्या वर्तणुकीत बदल जाणवू लागला होता. चव्हाण आणि टेकावडे यांच्यावरील खुनी हल्ल्यात साधर्म्य असल्याने पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू असताना, आणखी काही संशयित पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे चव्हाण याच्या खुनानंतर झालेला टेकावडे यांचा खून हे बदलासत्र असल्याचे संकेत मिळाले आहेत. टेकावडे यांच्या खुनाची घटना ३ सप्टेंबर २०१५ ला घडली. याप्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाच्या कटातील प्रमुख सूत्रधार अमोल वहिले याच्यासह बालाजी ऊर्फ बाल्या दामोदर शिंदे, किशोर ऊर्फ गोट्या विजय भिगवणकर या दोन आरोपींना पोलिसांनी पकडले. त्यांना पिस्तूल पुरविणारा नरेंद्र शर्मा यालाही ताब्यात घेतले. पिस्तूल पुरविणारा शर्मा पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर टेकावडे यांच्या खूनप्रकरणातील तपासाला कलाटणी मिळत गेली. गुंड चव्हाण याच्यावरील हल्ल्यासाठी वापरात आलेले पिस्तूल शर्माकडूनच दिले गेले होते. टेकावडे खुनी हल्ल्यातील आरोपींना शर्मानेच पिस्तूल दिले असल्याचे उघड झाल्यानंतर शर्माशी संबंधित असलेल्यांची घाबरगुंडी उडाली. हे प्रकरण अंगाशी येऊ शकते, या भीतीपोटी काहींनी मन:शांतीसाठी पर्यटन केले, तर काहींनी स्वसंरक्षणासाठी बंदोबस्त वाढवला. याप्रकरणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध आलेल्या काहींच्या वर्तणुकीत बदल झाल्याचे जाणवले. टेकावडे खून प्रकरणातील आरोपी ताब्यात आल्यानंतरही टेकावडे यांच्या पत्नी सुजाता यांनी खुनामागे आणखी काही आरोपी असल्याचा संशय व्यक्त करणारा अर्ज पोलिसांना दिला होता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली. टेकावडे,चव्हाण हल्ल्यात साधर्म्य तीन महिन्यांपूर्वीची नगरसेवक अविनाश टेकावडे यांच्यावरील खुनी हल्ल्याची घटना कामगारनेते प्रकाश चव्हाण याच्यावरील १० डिसेंबर २०१४ च्या हल्ल्याच्या घटनेशी साम्य असलेली होती. चव्हाण याच्यावर हल्लेखोरांनी पूर्णानगर येथील त्याच्या कार्यालयाजवळ हल्ला केला. आरटीओजवळील अत्यंत वर्दळीच्या परिसरात हल्लेखोरांनी डोळ्यांत मिरची पूड टाकून चव्हाण याच्यावर हल्ला केला होता. चाकूहल्ल्यासह पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. नगरसेवक टेकावडे यांच्यावरील हल्ला घरात घुसून केला गेला. डोळ्यांत मिरची पूड टाकून चाकूहल्ला केला. पिस्तूल होते; परंतु हल्लेखोरांनी त्याचा वापर केला नाही. दोन्ही हल्ले एकाच पद्धतीने झाले. (प्रतिनिधी)नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या चार संशयित आरोपींना पिंंपरी न्यायालयात बुधवारी हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा चिखली), बाबू ऊर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५,रा.चिंचवड), इंद्रास युवराज पाटील (वय ३८, रा. चिखली), आकाश अनिल पोटघन (वय २०, रा. मोहननगर) यांना मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी पिंपरी न्यायालयात त्यांना हजर केले असता, न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.पंचवीस लाख रूपये तसेच सदनिका अशी टेकावडे यांच्या खूनाची सुपारी दिली होती, अशी चर्चा आहे. टेकावडे यांच्या खूनप्रकरणातील प्रमुख सूत्रधार वहिले असला तरी त्याला पुढे करणारे दुसरेच होते. टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून पोलिसांनी रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. चिखली), बाबू ऊर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५, रा. चिंचवड), इंद्रास युवराज पाटील (वय ३८, रा. चिखली), आकाश अनिल पोटघन (वय २०, रा. मोहननगर) यांना ताब्यात घेतले आहे. रमेश हा प्रकाश चव्हाण याचा भाऊ, तर इंद्रास चव्हाणबरोबर माथाडी कामगार संघटनेचे काम पाहत होता. बाबू शेट्टीला ताब्यात घेतले आहे.