शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तेजसमुळे मिळणार स्वदेशी विमान निर्मितीला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीमुळे स्वदेशी विमान निर्मितीच्या क्षमतेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीमुळे स्वदेशी विमान निर्मितीच्या क्षमतेत वाढ होणार आहे. यामुळे हवाई दलाच्या क्षमतेत वाढ होण्याबरोबरच देशी तंत्रज्ञानाचा आणि उद्योगांचा विकास होणार आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताची कल्पना साकार होणार आहे. विमान निर्मितीच्या प्रक्रियेत शेजारी चीन आपल्यापेक्षा पुढे असला तरी आपणही विमान निर्मितीला सुरुवात केली म्हणजे या क्षेत्रात ‘देर आये लेकिन दुरुस्त आये’ असे म्हणावे लागेल, अशी भावना हवाई दलातील माजी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

तेजस हे पहिले भारतीय बनावटीचे विमान आहे. ज्या वैमानिकांनी हे विमान उडवले आहे त्यांनी हे विमान उत्कृष्ट असल्याचा अहवाल दिला आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तेजस हे मिग २१ विमानांपेक्षाही सरस असल्याचे मत माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांनी व्यक्त केले. नाईक म्हणाले, स्वदेशी विमान बनविण्यात आपण चीनच्या तुलनेत खूप उशीर केला. कारण आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हते. त्यांनी हे दुसऱ्या महायुद्धापासूनच सुरुवात केली होती. तेव्हा ३०० ते ५०० विमाने लागायची. या अनुभवातून आज ते पुढे आहेत. मात्र, उशिरा का होईना आपण सुरुवात केली ते महत्त्वाचे आहे. आपली विमानांची गरज कमी होती. यामुळे ही विमाने कोण बनवणार, तसेच संख्या कमी असल्याने खासगी उद्योगांनीही याची तयारी दाखवली नाही. आता एचएएल ही विमाने बनवत आहे. त्यांच्या समन्वयाने खासगी उद्योगही विमान निर्मितीच्या प्रक्रियेत उतरणात आहेत. भविष्यातील शस्त्रास्त्र व्यवहारासाठी हे गरजेचे आहे. सध्या भारतीय हवाई दलात राफेल विमाने येत आहे. तेसुद्धा भारतात बनतील. तेजस हे चवथ्या पिढीच्या विमान ही भारतातच बनणार असल्याने या संमिश्र तंत्रज्ञानाचा फायदा होईल. याचा फायदा येत्या १० ते १५ वर्षात होईल.

निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले म्हणाले, हा करार नुसता तेजस विमानांबद्दल नाही. यासोबत आपण मालवाहू विमाने बनवण्यासाठीही करार केला आहे. एअर बसबरोबर टाटाने यासाठी करार केला आहे. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नेमलेल्या एका समितीचा मी अध्यक्ष होतो. तेव्हा याबाबत मी सूचना केल्या होत्या. याला मंजुरी मिळाली आहे. याचा फायदा असा होईल एन ३२ विमाने जेव्हा निवृत्त होतील तेव्हा ही विमाने त्यांची जागा घेतील. तेजसबद्दल बोलयाचे झाल्यास बऱ्याच वर्षांपासून हे विमान आपण बनवत आहोत. मात्र, त्यांना मोठी ऑर्डर मिळत नव्हती. कारण मोठ्या ऑर्डरमुळे अनेक खाजगी कंपन्याही यात उतरायला तयार नव्हत्या. एल अॅड टी यासाठी कोईमतूरमध्ये प्रकल्प उभारत आहेत. यामुळे जवळपास वर्षाला २० विमानांची निर्मिती करण्याची क्षमता असेल. तेजस प्रकल्पात अनेक खाजगी कंपन्या असल्याने आत्मनिर्भरतेबरोबर रोजगारनिर्मिती होईल आणि विमान निर्मितीचे देशाचे काैशल्यही वाढेल. यामुळे चीनशी तुलना न करता आपल्या क्षमतावाढीबद्दल विचार करावा.

------

चौकट

सहाव्या पिढीच्या विमान निर्मितीचेही काैशल्य वाढेल

जागात प्रगत देश पाचव्या आणि सहाव्या पिढीची विमाने बनवत आहेत. तेजस हे चवथ्या पिढीचे विमान असले तरी या विमानाच्या निर्मितीमुळे आपल्याला पुढच्या पिढीची विमाने बनवायला मदत होईल. कारण भारत अवकाश तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात पुढे आहे. या तंत्रज्ञानाची सांगड घालून ही विमाने बनवता येईल.

- एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक, माजी हवाईदल प्रमुख