शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची रिक्त पदे भरणार

By admin | Updated: July 14, 2016 00:46 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे देऊनही यावर्षी विद्यार्थी गळती कमी करण्यात अपयश आल्याने जिल्हा परिषदेने आता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला

पुणे : कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे देऊनही यावर्षी विद्यार्थी गळती कमी करण्यात अपयश आल्याने जिल्हा परिषदेने आता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला असून, रिक्त पदांच्या ५० टक्के जागा भरण्याचे ठरविले आहे.बुधवारी झालेल्या स्थायी समितीत याबाबत चर्चा झाली असून, तसा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. यात सर्वसाधारण प्रवर्ग वगळता इतर गटातील पदे भरण्यात येणार आहेत. रोष्टर पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही पदे भरण्यास परवानगी द्या, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. बिंदूनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ‘शिक्षक द्या... शिक्षक.’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातून होत आहे. गेली तीन वर्षे जिल्ह्यात रोष्टरचे काम सुरू आहे. रोष्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन; तसेच भरती करता येत नाही. ज्या ठिकाणी एक किंवा दोन शिक्षकी शाळा आहेत, तेथील शिक्षक रजेवर गेल्यावर शाळा बंद ठेवाव्या लागतात. या विषयांवर जिल्हा परिषदेच्या अनेक बैठकांमध्ये यापूर्वी चर्चा झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी हा विषय चर्चेला घेतला. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. किती दिवस विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे, यावर सर्वजण ठाम होऊन रिक्त पदांच्या ५० टक्के शिक्षकभरती करण्याचे ठरविण्यात आले. यात जिल्ह्यात सर्वसाधारण गटातील शिक्षकांची पदे अतिरीक्त असल्याने तो प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. साधारण ४७0 पदे भरली जाती असे शिक्षणाधिकारी मुश्ताग शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)1आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी, अशा ४५० शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत. हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा, अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोष्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात होते. त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीने २०१२ पर्यंत ज्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असे २७१, तर सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त १५१ जणांचा समावेश आहे. पटसख्या घटल्याने चिंतापटसंख्या वाढविण्यासाठी आंम्ही वर्षभर आटोकाट प्रयत्न केले. तरीही यावर्षी जूनअखेरच्या आकडेवारीनुसार ती कमी झाल्याचे दिसत आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी पुढील काळात आणखी प्रयत्न केले जातील असे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सांगितले.