शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची रिक्त पदे भरणार

By admin | Updated: July 14, 2016 00:46 IST

कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे देऊनही यावर्षी विद्यार्थी गळती कमी करण्यात अपयश आल्याने जिल्हा परिषदेने आता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला

पुणे : कृतियुक्त ज्ञानरचनावादाचे धडे देऊनही यावर्षी विद्यार्थी गळती कमी करण्यात अपयश आल्याने जिल्हा परिषदेने आता जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला असून, रिक्त पदांच्या ५० टक्के जागा भरण्याचे ठरविले आहे.बुधवारी झालेल्या स्थायी समितीत याबाबत चर्चा झाली असून, तसा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद व उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी सांगितले. यात सर्वसाधारण प्रवर्ग वगळता इतर गटातील पदे भरण्यात येणार आहेत. रोष्टर पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही पदे भरण्यास परवानगी द्या, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. बिंदूनामावलीचे काम रखडल्याने गेली ४ वर्षे शिक्षकांचे समायोजन किंवा भरती करता येत नसल्याने जिल्ह्यात त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ‘शिक्षक द्या... शिक्षक.’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातून होत आहे. गेली तीन वर्षे जिल्ह्यात रोष्टरचे काम सुरू आहे. रोष्टर पूर्ण होत नसल्याने जिल्ह्यात शिक्षकांचे समायोजन; तसेच भरती करता येत नाही. ज्या ठिकाणी एक किंवा दोन शिक्षकी शाळा आहेत, तेथील शिक्षक रजेवर गेल्यावर शाळा बंद ठेवाव्या लागतात. या विषयांवर जिल्हा परिषदेच्या अनेक बैठकांमध्ये यापूर्वी चर्चा झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही सदस्यांनी हा विषय चर्चेला घेतला. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. किती दिवस विद्यार्थ्यांचे नुकसान करायचे, यावर सर्वजण ठाम होऊन रिक्त पदांच्या ५० टक्के शिक्षकभरती करण्याचे ठरविण्यात आले. यात जिल्ह्यात सर्वसाधारण गटातील शिक्षकांची पदे अतिरीक्त असल्याने तो प्रवर्ग वगळता इतर प्रवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. साधारण ४७0 पदे भरली जाती असे शिक्षणाधिकारी मुश्ताग शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)1आंतरजिल्हा बदली व सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त विद्यार्थी, अशा ४५० शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे वेटिंगवर आहेत. हे शिक्षक वारंवार आंदोलन, उपोषण करीत आमचे समायोजन करा, अशी मागणी करीत आहेत. त्यांना रोष्टर पूर्ण झाल्यावर समायोजन करू, असे आश्वासन दिले जात होते. त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीने २०१२ पर्यंत ज्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असे २७१, तर सीईटी पुनर्मूल्यांकनप्राप्त १५१ जणांचा समावेश आहे. पटसख्या घटल्याने चिंतापटसंख्या वाढविण्यासाठी आंम्ही वर्षभर आटोकाट प्रयत्न केले. तरीही यावर्षी जूनअखेरच्या आकडेवारीनुसार ती कमी झाल्याचे दिसत आहे. ही चिंतेची बाब असून यासाठी पुढील काळात आणखी प्रयत्न केले जातील असे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सांगितले.