शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या कोरोना विमा संरक्षणापासून शिक्षक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने करोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाखांचा विमा संरक्षण देण्याचा आदेश जाहीर केला आहे. कोरोनाकाळात प्रत्यक्ष शिक्षकांनी ...

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने करोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाखांचा विमा संरक्षण देण्याचा आदेश जाहीर केला आहे. कोरोनाकाळात प्रत्यक्ष शिक्षकांनी घरोघरी जाऊन दैनंदिन सर्वेक्षण केलेले आहे, चेकपोस्टवर दिवस-रात्र काम केलेले आहे, रेशनिंग दुकानावर काम, कोविड सेंटरवर काम, विलगीकरण कक्षात काम, लसीकरण केंद्रावर नोंदणी, कोविड दवाखाने यांमध्ये काम केलेले असताना, म्हणजे ज्या कर्मचारीवर्गाला विमा आहे, त्यांच्या शेजारी बसून किंवा तेच काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाने या विमासंरक्षण पासून सोशल डिस्टनसिंग दिले आहे.

ग्रामविकास विभागांतर्गत सर्व ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी कार्यकर्ती,अंगणवाडी मदतनीस, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून कोरोना समितीत काम करणे, औषध उपचार करणे, वैद्यकीय पथकाला मदत करणे, थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी करणे आदी कामे प्रामाणिक केलेली आहेत.हीच कामे शिक्षकांनी देखील केलेली असताना शिक्षकांचा जीव म्हणजे नेमके काय ? असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

"ज्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना नाही, असे अनेक तरुण शिक्षक या कोरोनाकाळात राष्ट्रीय कर्तव्य बजावत या मोहिमेत अग्रक्रमावर होते, मात्र त्याच तरुण शिक्षकांचा हे काम करत असताना कोरोना संक्रमित होऊन मृत्यू झाला असल्याने त्यांच्या कुटुंबाची पूर्णपणे वाताहात झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा शासनाने आधारवड बनले पाहिजे व जुन्या पेन्शनचा लाभाच्या योजना त्या कुटुंबाला दिल्या पाहिजे."

- प्रभाकर दिघे

अध्यक्ष,जुनी पेन्शन हक्क संघटना ,जुन्नर