शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मासिक पाळीवर जनजागृतीसाठी शिक्षण विभागाचा ‘टास्क फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:22 IST

शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयुनिसेफच्या सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीदरम्यान शाळेत जात नाहीत.पालिका आयुक्त, जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी हे टास्क फोर्सचे अध्यक्षया कार्यक्रमामध्ये पालकांनाही करून घेतले जाणार सहभागी

पुणे : शाळेतील किशोरवयीन मुलींची मासिक पाळीमुळे होणारी कुचंबणा टाळणे तसेच याविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.देशात मासिक पाळी या विषयावर अनेक समज-गैरसमज असल्याने मासिक पाळी या विषयावर चर्चा करणेही टाळले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात युनिसेफच्या एका सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीच्या दरम्यान शाळेत जात नाहीत.  अशा परिस्थितीत मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मिशनमध्ये याचाही समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील जालना, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांत युनिसेफच्या सहायाने मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम राबविला आहे.  

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका, जिल्हा, नगरपालिका स्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे. अनुक्रमे पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्याधिकारी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. या फोर्स मध्ये अन्य सहा सदस्य असतील. मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी, नियंत्रण, आढावा घेण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर असेल. मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबर शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी ही समिती करेल. या कार्यक्रमामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक