शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मासिक पाळीवर जनजागृतीसाठी शिक्षण विभागाचा ‘टास्क फोर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:22 IST

शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयुनिसेफच्या सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीदरम्यान शाळेत जात नाहीत.पालिका आयुक्त, जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी हे टास्क फोर्सचे अध्यक्षया कार्यक्रमामध्ये पालकांनाही करून घेतले जाणार सहभागी

पुणे : शाळेतील किशोरवयीन मुलींची मासिक पाळीमुळे होणारी कुचंबणा टाळणे तसेच याविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तीन स्तरावर ‘स्वच्छ विद्यालय स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’ स्थापन करण्यात येणार आहे.देशात मासिक पाळी या विषयावर अनेक समज-गैरसमज असल्याने मासिक पाळी या विषयावर चर्चा करणेही टाळले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात युनिसेफच्या एका सर्वेक्षणात ६० ते ७० टक्के किशोरवयीन मुली पाळीच्या दरम्यान शाळेत जात नाहीत.  अशा परिस्थितीत मुलींना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ मिशनमध्ये याचाही समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील जालना, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांत युनिसेफच्या सहायाने मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रम राबविला आहे.  

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका, जिल्हा, नगरपालिका स्तरावर स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केला जाणार आहे. अनुक्रमे पालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्याधिकारी हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. या फोर्स मध्ये अन्य सहा सदस्य असतील. मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी, नियंत्रण, आढावा घेण्याची जबाबदारी या टास्क फोर्सवर असेल. मुलींना मासिक पाळी व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबर शाळांमध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत समन्वय साधण्याची जबाबदारी ही समिती करेल. या कार्यक्रमामध्ये पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :educationशैक्षणिक