शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुगाचा प्रवास करीत मनुष्यप्राणी ‘भ्रमयुगात’ : भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या ...

पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या प्रसंगाला मानवजातीला पहिल्यांदाच सामोरे जावे लागते आहे, असे नाही. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. लोक रस्त्यावर मरून पडत होती. या साथीच्या रोगावर ब्रिटिशांनी केलेल्या उपायांच्या नोंदी आठवतात; परंतु त्या नोंदीमध्ये समाजमानस शास्त्रीय नोंदी आढळत नाहीत. तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुग असा प्रवास करीत मनुष्य प्राणी आता भ्रमयुगात आलेला आहे. या युगात सर्वसामान्य मनुष्य भ्रमिष्ट झालेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले.

दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि लेखक राजीव बर्वे लिखित ‘मनमोकळं’ या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक विचारवंत भारत सासणे उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, विनोदी लेखन करणे ही खरं तर कसोटीच असते. मनाची निखळता असल्याशिवाय दर्जेदार विनोदी लेखन होऊच शकत नाही. समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. परंतु विनोदाचे पंधरावे रत्न गवसायचे असल्यास संसाररूपी समुद्र मंथन करण्याशिवाय पर्याय नसतो. संसारातील सर्व कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या सुख-दु:खाच्या प्रसंगातून अनुभव गाठीशी बांधत त्यात ही विनोद शोध बुद्धी जागृत ठेवावी लागते, तरच संसाररूपी रथ खेचून नेणे शक्य होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘मनमोकळ’ या विनोदी कथासंग्रह पुस्तकातील दोन कथांतील काही निवडक भागाचे अभिवाचन करण्यात आले. त्यात अविनाश ओगले, सुदीप बर्वे, प्रसन्न जोगदेव आणि सुनीता ओगले यांनी सहभाग नोंदविला होता.

मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.

-------------------------------------