शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुगाचा प्रवास करीत मनुष्यप्राणी ‘भ्रमयुगात’ : भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या ...

पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या प्रसंगाला मानवजातीला पहिल्यांदाच सामोरे जावे लागते आहे, असे नाही. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. लोक रस्त्यावर मरून पडत होती. या साथीच्या रोगावर ब्रिटिशांनी केलेल्या उपायांच्या नोंदी आठवतात; परंतु त्या नोंदीमध्ये समाजमानस शास्त्रीय नोंदी आढळत नाहीत. तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुग असा प्रवास करीत मनुष्य प्राणी आता भ्रमयुगात आलेला आहे. या युगात सर्वसामान्य मनुष्य भ्रमिष्ट झालेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले.

दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि लेखक राजीव बर्वे लिखित ‘मनमोकळं’ या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक विचारवंत भारत सासणे उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, विनोदी लेखन करणे ही खरं तर कसोटीच असते. मनाची निखळता असल्याशिवाय दर्जेदार विनोदी लेखन होऊच शकत नाही. समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. परंतु विनोदाचे पंधरावे रत्न गवसायचे असल्यास संसाररूपी समुद्र मंथन करण्याशिवाय पर्याय नसतो. संसारातील सर्व कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या सुख-दु:खाच्या प्रसंगातून अनुभव गाठीशी बांधत त्यात ही विनोद शोध बुद्धी जागृत ठेवावी लागते, तरच संसाररूपी रथ खेचून नेणे शक्य होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘मनमोकळ’ या विनोदी कथासंग्रह पुस्तकातील दोन कथांतील काही निवडक भागाचे अभिवाचन करण्यात आले. त्यात अविनाश ओगले, सुदीप बर्वे, प्रसन्न जोगदेव आणि सुनीता ओगले यांनी सहभाग नोंदविला होता.

मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.

-------------------------------------