शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुगाचा प्रवास करीत मनुष्यप्राणी ‘भ्रमयुगात’ : भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या ...

पुणे : ‘हतबलता’ हा काळाचा प्रवाह आहे. कोरोना महामारीमुळे झालेले सूक्ष्म बदल हे अनामिक भीतीने ग्रासलेले आहेत. महामारीचा या प्रसंगाला मानवजातीला पहिल्यांदाच सामोरे जावे लागते आहे, असे नाही. शंभर वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. लोक रस्त्यावर मरून पडत होती. या साथीच्या रोगावर ब्रिटिशांनी केलेल्या उपायांच्या नोंदी आठवतात; परंतु त्या नोंदीमध्ये समाजमानस शास्त्रीय नोंदी आढळत नाहीत. तंत्रयुग, अवकाशयुग, अणुयुग असा प्रवास करीत मनुष्य प्राणी आता भ्रमयुगात आलेला आहे. या युगात सर्वसामान्य मनुष्य भ्रमिष्ट झालेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी केले.

दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि लेखक राजीव बर्वे लिखित ‘मनमोकळं’ या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक विचारवंत भारत सासणे उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, विनोदी लेखन करणे ही खरं तर कसोटीच असते. मनाची निखळता असल्याशिवाय दर्जेदार विनोदी लेखन होऊच शकत नाही. समुद्र मंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. परंतु विनोदाचे पंधरावे रत्न गवसायचे असल्यास संसाररूपी समुद्र मंथन करण्याशिवाय पर्याय नसतो. संसारातील सर्व कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या सुख-दु:खाच्या प्रसंगातून अनुभव गाठीशी बांधत त्यात ही विनोद शोध बुद्धी जागृत ठेवावी लागते, तरच संसाररूपी रथ खेचून नेणे शक्य होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ‘मनमोकळ’ या विनोदी कथासंग्रह पुस्तकातील दोन कथांतील काही निवडक भागाचे अभिवाचन करण्यात आले. त्यात अविनाश ओगले, सुदीप बर्वे, प्रसन्न जोगदेव आणि सुनीता ओगले यांनी सहभाग नोंदविला होता.

मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.

-------------------------------------