शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

टँकर फेऱ्या चार हजारांनी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:45 IST

उन्हाच्या छळा तीव्र होत असतानाच शहरातही पाण्याची मागणी वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने शहरातील टँकरच्या फेऱ्या

पुणे : उन्हाच्या छळा तीव्र होत असतानाच शहरातही पाण्याची मागणी वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने शहरातील टँकरच्या फेऱ्या मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल चार हजारांनी वाढल्या असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये शहरात सुमारे ११ हजार ९२२ टँकर फेऱ्या होत्या तर या वर्षी फेब्रुवारी २०१६ मध्ये हा आकडा सुमारे १५ हजार १४२ फेऱ्या झाल्या आहेत.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये या वर्षी पावसाळा संपल्यानंतरही जेमतेम ५० टक्केच पाणी होते. त्यामुळे महापालिकेकडून आॅक्टोबर २०१६ पासूनच शहरात दिवसाआड पाणी देणे सुरू केलेले आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर जानेवारी २०१६ पर्यंत थंडी असल्याने पाण्याची मागणीही कमीच होती. मात्र, फेब्रुवारीपासूनच उन्हाळयाच्या छळा जाणवू लागल्या आहेत.फेब्रुवारीत चार वर्षांचा उच्चांक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात टँकरच्या मागणीने गेल्या चार वर्षांचा उच्चांक गाठला आहे. २०१२-१३ मध्ये ८ हजार ९००, १३-१४ मध्ये १२ हजार ४०० तर १५-१६ मध्ये १११ हजार ९०० टँकरच्या फेऱ्या शहरात झाल्या होत्या. मात्र, या वर्षी हा आकडा तब्बल १५ हजार १४२ वर पोहोचला असल्याचे दिसून आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिकेच्या माध्यमातून टँकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे.मागील वर्षी शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे पाण्याची मागणी या वर्षीच्या तुलनेने कमी असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत शहरात सुमारे १ लाख ५८ हजार १६९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा या वर्षी ११ महिन्यांतच ओलांडला आहे. या वर्षी एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत सुमारे १ लाख ६२ हजार ७११ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत चार हजारांनी अधिक आहे. तर दरवर्षी मार्च महिन्यात सुमारे १५ हजार टँकरची मागणी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वर्षी हा आकडा पावणेदोन लाख टँँकर फेऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.>>> विभागात २१० टँकरद्वारे पाणीपुरवठाविभागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, तब्बल ४ लाख ६८ हजार नागरिकांना २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गंभीर परिस्थिती असून, येथे तब्बल ७३ टँकर सुरू आहेत. गत वर्षी या वेळी विभागात केवळ १५ टँकर सुरू होते. विभागात आजअखेर २१० टँकरद्वारे तब्बल १८१ मोठी गावे आणि तब्बल १ हजार ३३० वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १०१ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू असून, पुणे ६४, सातारा ३६ आणि सोलापूर जिल्ह्यात ९ टँकर सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे विभागातील ४ लाख ६८ हजार ५०० लोक बाधित झाले आहेत.>>टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांची तालुकानिहाय स्थिती :पुणे : बारामती २२, इंदापूर १७, पुरंदर १२, दौंड १३, सातारा : माण २८, कोरगाव ४, वाई २, फलटण १,सांगली : जत ७३, खानापूर ७, तासगाव १२, कवठेमहांकाळ ६, आटपाडी २, कडेगाव १, सोलापूर : दक्षिण सोलापूर ५, अक्कलकोट ३ आणि करमाळा १