शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

टँकर फेऱ्या चार हजारांनी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 01:45 IST

उन्हाच्या छळा तीव्र होत असतानाच शहरातही पाण्याची मागणी वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने शहरातील टँकरच्या फेऱ्या

पुणे : उन्हाच्या छळा तीव्र होत असतानाच शहरातही पाण्याची मागणी वाढली आहे. महापालिकेकडून करण्यात येणारा पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने शहरातील टँकरच्या फेऱ्या मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल चार हजारांनी वाढल्या असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये शहरात सुमारे ११ हजार ९२२ टँकर फेऱ्या होत्या तर या वर्षी फेब्रुवारी २०१६ मध्ये हा आकडा सुमारे १५ हजार १४२ फेऱ्या झाल्या आहेत.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये या वर्षी पावसाळा संपल्यानंतरही जेमतेम ५० टक्केच पाणी होते. त्यामुळे महापालिकेकडून आॅक्टोबर २०१६ पासूनच शहरात दिवसाआड पाणी देणे सुरू केलेले आहे. त्यामुळे शहरातील बऱ्याच ठिकाणचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर जानेवारी २०१६ पर्यंत थंडी असल्याने पाण्याची मागणीही कमीच होती. मात्र, फेब्रुवारीपासूनच उन्हाळयाच्या छळा जाणवू लागल्या आहेत.फेब्रुवारीत चार वर्षांचा उच्चांक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात टँकरच्या मागणीने गेल्या चार वर्षांचा उच्चांक गाठला आहे. २०१२-१३ मध्ये ८ हजार ९००, १३-१४ मध्ये १२ हजार ४०० तर १५-१६ मध्ये १११ हजार ९०० टँकरच्या फेऱ्या शहरात झाल्या होत्या. मात्र, या वर्षी हा आकडा तब्बल १५ हजार १४२ वर पोहोचला असल्याचे दिसून आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी महापालिकेच्या माध्यमातून टँकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये वाढ झाली आहे.मागील वर्षी शहरात एकवेळ पाणीपुरवठा सुरू होता. त्यामुळे पाण्याची मागणी या वर्षीच्या तुलनेने कमी असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत शहरात सुमारे १ लाख ५८ हजार १६९ टँकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. हा आकडा या वर्षी ११ महिन्यांतच ओलांडला आहे. या वर्षी एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत सुमारे १ लाख ६२ हजार ७११ टँकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत चार हजारांनी अधिक आहे. तर दरवर्षी मार्च महिन्यात सुमारे १५ हजार टँकरची मागणी असल्याचे दिसून येते. त्यामुळे या वर्षी हा आकडा पावणेदोन लाख टँँकर फेऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.>>> विभागात २१० टँकरद्वारे पाणीपुरवठाविभागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असून, तब्बल ४ लाख ६८ हजार नागरिकांना २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात गंभीर परिस्थिती असून, येथे तब्बल ७३ टँकर सुरू आहेत. गत वर्षी या वेळी विभागात केवळ १५ टँकर सुरू होते. विभागात आजअखेर २१० टँकरद्वारे तब्बल १८१ मोठी गावे आणि तब्बल १ हजार ३३० वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १०१ टँकर सांगली जिल्ह्यात सुरू असून, पुणे ६४, सातारा ३६ आणि सोलापूर जिल्ह्यात ९ टँकर सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे विभागातील ४ लाख ६८ हजार ५०० लोक बाधित झाले आहेत.>>टँकर सुरू असलेल्या जिल्ह्यांची तालुकानिहाय स्थिती :पुणे : बारामती २२, इंदापूर १७, पुरंदर १२, दौंड १३, सातारा : माण २८, कोरगाव ४, वाई २, फलटण १,सांगली : जत ७३, खानापूर ७, तासगाव १२, कवठेमहांकाळ ६, आटपाडी २, कडेगाव १, सोलापूर : दक्षिण सोलापूर ५, अक्कलकोट ३ आणि करमाळा १