शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
4
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
5
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
6
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
7
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
8
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
9
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
10
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
11
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
12
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
13
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
14
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
15
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
16
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
17
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
18
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
19
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
20
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत

आदिवासी पट्ट्यात पावसाळ््यातही टँकरची मागणी

By admin | Updated: June 20, 2017 07:15 IST

आदिवासी भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर दुसरीकडे पावसाने या भागामध्ये पडण्यासाठी धरलेला अट्टहास

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : एकीकडे आदिवासी भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर दुसरीकडे पावसाने या भागामध्ये पडण्यासाठी धरलेला अट्टहास यामुळे आदिवासी जनतेला मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळा सुरू होऊनही वरुणराजाच्या अवकृपेमुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ््यातील चार महिने या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो; परंतु या भागाचे दुर्भाग्य असे उन्हाळ््यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, विहिरी, कूपनलिकांमध्ये पाण्याचा खडखडाट झाला आहे. आदिवासी महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला टॅँकरचा आधार घ्यावा लागत आहे़ या भागामध्ये असणारे तुरळक पिण्याच्या पाण्याच्या साठ्यातील पाणी दूषित झाल्यामुळे साथीच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. जुलाब, उलट्या, बॅक्टेरिया, मलेरिया, अंगाला खाज येणे यांसारखे आजार या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बळावले असून, या भागातील सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. जसजसे पावसाळा लांबणीवर पडत आहे तसतसे आदिवासी बांधवांचे पाण्याविषयी हाल होत आहेत.