शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

आदिवासी पट्ट्यात पावसाळ््यातही टँकरची मागणी

By admin | Updated: June 20, 2017 07:15 IST

आदिवासी भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर दुसरीकडे पावसाने या भागामध्ये पडण्यासाठी धरलेला अट्टहास

लोकमत न्यूज नेटवर्कतळेघर : एकीकडे आदिवासी भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर दुसरीकडे पावसाने या भागामध्ये पडण्यासाठी धरलेला अट्टहास यामुळे आदिवासी जनतेला मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. ऐन पावसाळा सुरू होऊनही वरुणराजाच्या अवकृपेमुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ््यातील चार महिने या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो; परंतु या भागाचे दुर्भाग्य असे उन्हाळ््यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, विहिरी, कूपनलिकांमध्ये पाण्याचा खडखडाट झाला आहे. आदिवासी महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला टॅँकरचा आधार घ्यावा लागत आहे़ या भागामध्ये असणारे तुरळक पिण्याच्या पाण्याच्या साठ्यातील पाणी दूषित झाल्यामुळे साथीच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. जुलाब, उलट्या, बॅक्टेरिया, मलेरिया, अंगाला खाज येणे यांसारखे आजार या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बळावले असून, या भागातील सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. जसजसे पावसाळा लांबणीवर पडत आहे तसतसे आदिवासी बांधवांचे पाण्याविषयी हाल होत आहेत.