शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

तळमाचीवाडी पुनर्वसन योजना आजही अर्धवट

By admin | Updated: July 5, 2017 02:34 IST

डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी

नितीन ससाणे/ लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील तळमाचीवाडी गावातील ग्रामस्थ सन २००५ पासून जीव मुठीत धरून राहात आहेत. गावाला तसेच ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने राज्य शासनाने या गावासाठी पुनर्वसन योजना राबविली परंतु अद्यापही निकृष्ट दर्जाचे बांधकाम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे पुनर्वसनाचे काम अर्धवट आहे. ग्रामस्थ घाबरूनच येथे राहात आहेत.४जुन्नरपासून २५ किमी अंतरावरील निमगिरी गावालगतच्या डोंगरावर तळमाचीवाडी हे गाव वसलेले आहे. जेमतेम ५०० लोकवस्ती आहे.४पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहातात. कारण भूस्खलनाची भीती त्यांना नेहमीच सतावत असते. सन २००५ साली डोंगराच्या पायथ्याशी ५ फूट खोल, ३ मीटर रुंद तर ५ किमी लांबीची भेग जमिनीला पडली होती. ४शासनाने भूवैज्ञानिकांचे पथक पाठवून पाहाणी करून अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या पथकाने दोन आठवडे अभ्यास करून या गावाला भूस्खलनाचा धोका असून गावाचे पुनर्वसन करण्याचा अहवाल सादर केला.४राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने सुरक्षित ठिकाणी १०० घरे बांधून देण्याचे काम सुरू केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले व ते देखील अर्धवटच़९ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर तळमाचीवाडीच्या पुनर्वसनासाठी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही झाले नाही. पुनर्वसनाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु शासनाने वा लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या या मागणीची जराही दखल घेतली नाही. शासनाच्या दिरंगाईने पुनर्वसनाचे घोंगडे इतकी वर्षे भिजतच पडले आहे.