शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

तळमाचीवाडी पुनर्वसन योजना आजही अर्धवट

By admin | Updated: July 5, 2017 02:34 IST

डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी

नितीन ससाणे/ लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील तळमाचीवाडी गावातील ग्रामस्थ सन २००५ पासून जीव मुठीत धरून राहात आहेत. गावाला तसेच ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने राज्य शासनाने या गावासाठी पुनर्वसन योजना राबविली परंतु अद्यापही निकृष्ट दर्जाचे बांधकाम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे पुनर्वसनाचे काम अर्धवट आहे. ग्रामस्थ घाबरूनच येथे राहात आहेत.४जुन्नरपासून २५ किमी अंतरावरील निमगिरी गावालगतच्या डोंगरावर तळमाचीवाडी हे गाव वसलेले आहे. जेमतेम ५०० लोकवस्ती आहे.४पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहातात. कारण भूस्खलनाची भीती त्यांना नेहमीच सतावत असते. सन २००५ साली डोंगराच्या पायथ्याशी ५ फूट खोल, ३ मीटर रुंद तर ५ किमी लांबीची भेग जमिनीला पडली होती. ४शासनाने भूवैज्ञानिकांचे पथक पाठवून पाहाणी करून अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या पथकाने दोन आठवडे अभ्यास करून या गावाला भूस्खलनाचा धोका असून गावाचे पुनर्वसन करण्याचा अहवाल सादर केला.४राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने सुरक्षित ठिकाणी १०० घरे बांधून देण्याचे काम सुरू केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले व ते देखील अर्धवटच़९ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर तळमाचीवाडीच्या पुनर्वसनासाठी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही झाले नाही. पुनर्वसनाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु शासनाने वा लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या या मागणीची जराही दखल घेतली नाही. शासनाच्या दिरंगाईने पुनर्वसनाचे घोंगडे इतकी वर्षे भिजतच पडले आहे.