शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

तळमाचीवाडी पुनर्वसन योजना आजही अर्धवट

By admin | Updated: July 5, 2017 02:34 IST

डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी

नितीन ससाणे/ लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : डोंगरउतारावरील माती पावसाच्या पाण्याने वाहून येऊन झालेल्या माळीणसारख्या दुर्घटनेच्या सावटातच जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील तळमाचीवाडी गावातील ग्रामस्थ सन २००५ पासून जीव मुठीत धरून राहात आहेत. गावाला तसेच ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने राज्य शासनाने या गावासाठी पुनर्वसन योजना राबविली परंतु अद्यापही निकृष्ट दर्जाचे बांधकाम, शासनाचे दुर्लक्ष यामुळे पुनर्वसनाचे काम अर्धवट आहे. ग्रामस्थ घाबरूनच येथे राहात आहेत.४जुन्नरपासून २५ किमी अंतरावरील निमगिरी गावालगतच्या डोंगरावर तळमाचीवाडी हे गाव वसलेले आहे. जेमतेम ५०० लोकवस्ती आहे.४पावसाळ्यात येथील ग्रामस्थ जीव मुठीत धरून राहातात. कारण भूस्खलनाची भीती त्यांना नेहमीच सतावत असते. सन २००५ साली डोंगराच्या पायथ्याशी ५ फूट खोल, ३ मीटर रुंद तर ५ किमी लांबीची भेग जमिनीला पडली होती. ४शासनाने भूवैज्ञानिकांचे पथक पाठवून पाहाणी करून अहवाल तयार करण्यास सांगितले होते. या पथकाने दोन आठवडे अभ्यास करून या गावाला भूस्खलनाचा धोका असून गावाचे पुनर्वसन करण्याचा अहवाल सादर केला.४राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने सुरक्षित ठिकाणी १०० घरे बांधून देण्याचे काम सुरू केले होते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले व ते देखील अर्धवटच़९ फेब्रुवारी २०१५ रोजी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर तळमाचीवाडीच्या पुनर्वसनासाठी झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी यांनी तहसीलदारांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना केल्या होत्या. परंतु याबाबत केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही झाले नाही. पुनर्वसनाच्या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु शासनाने वा लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांच्या या मागणीची जराही दखल घेतली नाही. शासनाच्या दिरंगाईने पुनर्वसनाचे घोंगडे इतकी वर्षे भिजतच पडले आहे.