शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

मुलींच्या वसतिगृहाविषयी बोलणोही गुन्हा!

By admin | Updated: July 29, 2014 22:57 IST

विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात एक ना अनेक समस्या आहेत. वेळोवेळी त्या अनेकदा समोरही आल्या आहेत. परंतु सध्या जर एखाद्या गोष्टीविषयी कोणी तक्रार केली

पुणो विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात एक ना अनेक समस्या आहेत. वेळोवेळी त्या अनेकदा समोरही आल्या आहेत. परंतु सध्या जर एखाद्या गोष्टीविषयी कोणी तक्रार केली तर त्या विद्यार्थिनीलाच त्रस दिला जातो. खोली सोडा येथ पासून ते प्रशासकीय कामात अडचण निर्माण केली, विद्यापीठाची बदनामी केली असे कोणतेही आरोप करत विद्यार्थिनींना त्रस दिला जातो, हे विद्यार्थिनींनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले. कारण नाव दिले की, आम्हाला अजून त्रस देण्यात येईल अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
येथील एकूण यंत्रणाच घाणोरडी असल्याचे सांगितले. मेस मधील जेवण रेक्टरने तपासून मग ते मुलिंना देण्यात यावे असा नियम आहे. परंतु येथील व्यवस्थापिका घरी स्वयंपाक करण्या ऐवजी मेसमधीलच जेवण, नाश्ता घेणो पसंत करत असल्याने मेसच्या दर्जावर बोट उचलणारेच कोणी नाही. परंतु प्रत्यक्षात मेसचा दर्जा एवढा खालावलेला आहे की, विद्यार्थीनी मेसचे जेवण्याऐवजी बाहेरून डबा मागविणो पसंत करतात. म्हणजे विद्यापीठाने सर्व सुविधा पुरवूनही विद्यार्थीनींचे प्रचंड हाल होत आहेत. त्याचप्रमाणो वसतीगृहांना पाण्याचे नियोजन नाही. एका इमारतीतील पाणी संपले की, त्यांना बादल्या घेऊन दुस:या इमारतीत जावे लागते. म्हणजे शिक्षणापेक्षा जणू जगण्याचाच लढा त्यांना द्यावा लागत आहे. येथे सगळ्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह व स्नानगृहे आहेत. त्यातही विद्यार्थिनी नको म्हणत असताना काहीतरी सुधारणा करायची म्हणून पाश्चात्य पध्दतीचे स्वच्छतागृह बांधण्यात आले. तेथे पाणी अधिक लागते आणि स्वच्छतेविषयी आनंदी आनंद असल्याने मुली तेथे जाणो टाळतात. जीन्या लाईटस् नाहीत. परंतु तक्रार करण्याची सोय नाही.  वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियाही पारदर्शी नाही. जर कोणाचे नाव वेटींगलिस्टमध्ये असेल त्या विद्यार्थिनीला कळवायला हवे. परंतु तसे न कळवता  खेटा माराव्या लागतात. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी विध्यार्थीनींनी केली आहे. 
 
आदिवासी वसतिगृहात 
खानावळ 
निकृष्ट
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीनींचे शासनाने पालकत्व घेतले असूनही असुविधा आणि खाण्या-राहण्याची आबाळ अशी अवस्था येथील विद्यार्थिनींची झाली आहे. येथील खानावळीचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असल्याची तक्रार विद्यार्थिनी कायमच करत असतात. शासन प्रत्येक विद्यार्थिनी मागे 32क्क् रुपये खानावळीसाठी देते. 
 
बाहेर एवढय़ा रुपयांत पंचतारांकीत खानावळ विद्यार्थिनींना मिळेल. परंतु वसतीगृहातील जेवण खाण्यायोग्यही नसते. तसेच मुलींना पास साठी 9क्क् रुपये भत्ता शासन देते. परंतु तोही 6-6 महिने विद्यार्थिनींना मिळत नाही. 
 
सहलीचेही 2क्क्क् रुपये शासन देते. परंतु शासनाने आपल्यासाठी एवढय़ा सुविधा दिल्या आहेत ही माहितीच मुळात विद्यार्थिंनीपर्यंत पोहचू दिली जात नाही. शिवाय पुस्तकेही शासनाकडून मिळतात. मात्र त्यासाठीही मुलींना वारंवार व्यवस्थापनाकडे खेटा माराव्या लागतात. एका खोलीत 14 मुली राहतात. त्यांच्यासाठी केवळ एकच स्वच्छता व स्नानगृह असते. त्यामुळे असुविधा होते.