शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

तेल्याभुत्याच्या कावडीची उभारणी

By admin | Updated: March 28, 2017 23:48 IST

दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी शेकडो वर्षांच्या

खळद : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पायी वारीने जाण्यासाठी पंचक्रोशीच्या संत तेल्याभुत्याच्या कावडीची आज गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी संत निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली एखतपूर येथे उभारणी करण्यात आली.खळद, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीची संत तेल्याभुत्याची कावड परंपरेनुसार शिखर शिंगणापूर यात्रेसाठी पायी वारीने रामनवमीच्या दिवशी प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने आज गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत कावडीची उभारणी करण्यात आली. या वेळी कावडीची एखतपूर-मुंजवडी येथे रंगाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात भव्य ग्राममिरवणूक काढण्यात आली. यानंतर येथील भैरवनाथ मंदिरात पंचक्रोशीच्या भाविकांची बैठक झाली. या वेळी पायी वारीबाबत सातारा व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिखर शिंगणापूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीचा वृत्तांत एखतपूर मुंजवडीचे माजी सरपंच रामभाऊ झुरंगे, माजी उपसभापती देविदास कामथे यांनी सांगितला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, नीरा बाजार समितीचे सभापती नंदकुमार जगताप, जोगवडीकर ग्रामस्थ यांनी भेट दिली.या वेळी जि. प. सदस्य दत्ता झुरंगे, खळदचे माजी सरपंच कैलास कामथे यांनीही मार्गदर्शन करीत यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. यंदा यात्रेत कावडीची जबाबदारी खळद गावावर असून कावडीची सेवा करण्यासाठी १४ बैलगाडीधारकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये येथील आबासो कृष्णा कामथे यांच्या बैलगाडीला कावडीची सेवा करण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते करण्यात आला. आजपासून भाविक यात्रेच्या तयारीला लागतात. यादरम्यान आपल्या बैलगाड्यांना दट्या बसविणे, त्यावर यात्राकाळात पुरेल एवढी वैरण बांधणे, बैलांच्या पायाला पत्रा बसविणे, वाहनांना पाण्याच्या टाक्या बसविणे, यात्रेदरम्यान जेवणाची व्यवस्था करणे आदी कामे करतात.रामनवमीच्या पूर्वसंध्येला संत तेल्याभुत्याच्या जळत्या घराच्या जागेला, तेलाच्या घाण्याला कावड भव्य मिरवणुकीने प्रदक्षिणा घालते व पुन्हा येथे पंचक्रोशीची बैठक होऊन तयारीचा आढावा घेतला जातो. रामनवमीच्या दिवशी ४ एप्रिल रोजी सायं. चार वाजता एखतपूर येथे समाधीस्थळाला प्रदक्षिणा घालीत खळद येथे शाही मिरवणुकीने कावड प्रस्थान करील.(वार्ताहर)