शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘कुजबुज’साठी किस्से

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस सलग पंधरा वर्षे राज्याच्या आणि दहा वर्षे देशाच्या सत्तेत होती. मात्र या कालावधीत या पक्षाला प्रशस्त कार्यालय ...

राष्ट्रवादी कॉंग्रेस सलग पंधरा वर्षे राज्याच्या आणि दहा वर्षे देशाच्या सत्तेत होती. मात्र या कालावधीत या पक्षाला प्रशस्त कार्यालय शहरात उभे करता आले नव्हते. माजी महापौर आणि नगरसेवक प्रशांत जगताप यांनी मात्र शहराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पक्षासाठी भव्य कार्यालयाची तजवीज अल्पावधीत केली. या धडाक्यामुळे जगताप यांनी थोरल्या आणि धाकट्या अशा दोन्ही पवारांची मने जिंकली असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांनी वेळात वेळ काढून या कार्यालयाला भेट दिली. यापूर्वीच्या शहराध्यक्षांना जे जमले नाही ते जगताप यांनी एकहाती करुन दाखवले. मात्र पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी जगताप यांचे तोंड भरून कौतूक केल्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांचा मात्र जळफळाट झाला आहे. त्यामुळे या नव्या कार्यालयाच्या उभारणीसाठी कोणी, काय योगदान दिले याचे खरे-खोटे किस्से तिखट-मीठ लावून सांगण्याची स्पर्धाच आता सुरु झाल्याचे ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते सांगत आहेत. प्रशांत जगताप मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पुढच्या कामाला लागले आहेत. अर्थातच ते म्हणजे हे सध्या भाडेतत्त्वावर असणारे हे कार्यालय पक्षाच्या ‘नावावर’ कसे करुन घ्यायचे.

--------

‘पंकजाताईं’मुळे उत्साह

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ पुण्यात आहे. तरीही या गटाला ताकद देण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांच्याकडून आजवर फारसा झालेला नाही. पुण्यातल्या पक्षीय कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा फारसा सहभाग दिसलेला नाही. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्त्व करण्यासाठी पंकजा मुंडे मोठ्या कालखंडानंतर पुण्यात आल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे बऱ्याच कालावधीनंतर शहर भाजपामध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. वास्तविक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कोथरुड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र कोथरुडकरांना आपलेसे करण्यातच त्यांचा एवढा वेळ चालला आहे की शहरात अन्यत्र लक्ष देण्यास फार वेळ उरत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपामध्ये जान ओतण्यासाठी पंकजाताईंनी वारंवार पुण्यात यावे अशी चर्चा भाजपा कार्यकर्ते करत होते.

---------------

पालिका आयुक्त माजी मुख्यमंत्र्यांच्या दारी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आंबील ओढ्यातील अतिक्रमणाच्या कारवाईसंदर्भात ही भेट होती की अन्य कारणासाठी यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. आंबील ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेने पुरेसा अवधी दिला. त्यानंतरही मुठभरांचा विरोध या कारवाईस होतो आहे. मात्र या कारवाईला आता बिल्डर-राजकारण्यांचे साटेलोटे असल्याचा संदर्भ जोडला गेल्याने संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनुभवी सनदी अधिकारी असणारे विक्रम कुमार अजितदादांच्या कानावर घातल्याखेरीज फडणवीसांच्या भेटीला जातील का? की अजितदादांनीच त्यांना फडणवीस यांच्या भेटीसाठी पाठवले याचा खुलासा अद्याप झालेला नाही.