शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुठा नदीपात्रातील बेकायदा बांधकामे पाडा

By admin | Updated: July 5, 2017 03:46 IST

पुण्यातील एरंडवणा परिसरातील डी. पी. रोडवरील मंगल कार्यालये व खुले लॉन्स येथील परिसराची महापालिका आणि पाटबंधारे

पुणे : पुण्यातील एरंडवणा परिसरातील डी. पी. रोडवरील मंगल कार्यालये व खुले लॉन्स येथील परिसराची महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित पाहणी करून नदीपात्रात तसेच पूरनियंत्रण रेषेत येणारी बांधकामे चार आठवड्यांत पाडावित, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिला आहे़ नदीपात्र त्वरित मोकळे करुन नैसर्गिक परिसंस्थेचे नदीपात्रात अतिक्रमणांमुळे झालेल्या हानीची पुनर्स्थापना करण्याची प्रक्रिया ४ आठवड्यांत पूर्ण करावी. पूर्तता अहवाल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल करावा, असे आदेशात म्हटले आहे़ हरित न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती यु़ डी़ साळवी व डॉ़ अजय देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे़ सुजल सहकारी संस्थेतर्फे अ‍ॅड़ असीम सरोदे यांच्या मदतीने दाखल करण्यात आलेल्या पर्यावरणहित याचिकेत पुणे महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस महासंचालक, परिवहन मंत्रालय, नागरी/शहरी विकास विभागाचे सचिव, राज्य पर्यावरण मंत्रालय तसेच खडकवासला पाटबंधारे विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले होते़ मुठा नदीपात्रात तसेच पूरनियंत्रण रेषेच्या (ब्ल्यू लाइन) आत बेकायदेशीर बांधकाम, कचरा बेकायदेशीरपणे साठविणे असे प्रकार असतील, तर त्याचा पाहणी अहवाल दोन आठवड्यांत तयार करावा़ म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान डी़ पी़ रोडवरील बेकायदेशीर बांधकामे चार आठवड्यांत पाडावीत, असे हरित न्यायाधिकरणाने म्हटले आहे़ राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेच निवाडा केलेल्या विवेक ढाकणे विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न कार्यालये व लॉन्स या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत़ त्यानुसार लग्नासाठीचे खुले मंडप, लॉन्स प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतल्याशिवाय सुरु करु नये, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे़ या उल्लेख न्यायाधिकरणाने केला असून या मार्गदर्शक सूचनांची २ महिन्यांत अंमलबजावणी व्हावी़ बेकायदेशीरपणे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगल कार्यालयांना ५० हजार रुपये दंड प्रत्येक गुन्ह्यासाठी आकारण्यात यावा, असे म्हटले आहे. म्हात्रे पूल ते राजाराम पुलाकडे जाणाऱ्या डी. पी़ रोडवर कोणत्याही प्रकारे गोंगाटपूर्ण संगीत वाद्यांचा वापर करु नये़ जर अशा गोंगाटाचा समावेश असलेल्या वराती किंवा मिरवणुका आढळल्यास डीजे सिस्टिम किंवा संगीतवाद्य साहित्य वाहतूक पोलिसांनी जप्त करावेत, असे अंतरिम आदेशसुद्धा न्यायाधिकरणाने पारित केले होते़ कोणत्याही लग्नांना किंवा धार्मिक बाबींना विरोध न करता आधुनिक समाज जीवनात उत्सव साजरे करण्याचे स्वरुप बदलले पाहिजे ही आवश्यकता अधोरेखित करणारा महत्त्वाचा निर्णय या पर्यावरणहित याचिकेमुळे अस्तित्वात आला आहे़ उत्सव साजरे करताना मानवी समूहाची वागणूक बदलण्यासाठी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवहन विभाग अशा विविध यंत्रणांना जबाबदारीची जाणीव करुन देण्याचे काम राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने केले आहे़ शिवाय, त्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होईल, अशी व्यवस्थासुद्धा केल्याने या निर्णयातून परिणामकारक बदल घडून येतील, असे मत अ‍ॅड़ असीम सरोदे यांनी व्यक्त केले़