शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी स्थितीबाबत आमसभा घ्यावी

By admin | Updated: March 25, 2017 03:37 IST

पुरंदर तालुक्यात मार्च महिना अखेरीसच तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण

जेजुरी : पुरंदर तालुक्यात मार्च महिना अखेरीसच तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीव्र स्वरुपाच्या पाणीटंचाईमुळे गावठाण आणि वाड्या- वस्त्यावरून पिण्याच्या पाण्याचे नियोजन होऊ शकले नसल्याने सर्वसामान्यांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक घटकाला पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे बनले आहे. शेतकऱ्यांचे पशुधन चारा-पाण्याअभावी बाजारात विक्रीस जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी तालुक्यात आमसभा घ्यायला हवी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा वर्षांत एकदाही आमसभा झालेली नाही. पुरंदर तालुक्यात गेल्या वर्षीचे पर्जन्यमान सरासरीच्या निम्मेच राहिले होते. सप्टेंबर महिनाअखेर पुरंदरचे सरासरी पर्जन्यमान केवळ २५५ मि.मी. होते. यात परिंचे व गराडे परिसरातील पश्चिम पुरंदरच्या पट्ट्यात सुमारे ३०० ते ४०० मिमी पाऊस पडला होता. इतरत्र पावसाचे प्रमाण केवळ ६० मिमी ते १५० मि.मी. येवढेच राहिल्याने ओढे नाले वाहू शकले नव्हते. यामुळे तालुक्यातील खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम तसे सुमारच राहिल्याने सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांसाठीही पिण्याचे पाणी, चारा तसेच रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसल्याचेच निदर्शनास येत आहे. केवळ पिण्याच्या पाण्याचे टँकर प्रस्ताव आणि त्यांचे नियोजन यापलीकडे कोणतेही नियोजन नाही. टँकरबाबत प्रस्ताव आल्यानंतरच पाहणी व मंजुरी दिली जाते. गेल्या वर्षभराची वस्तुस्थिती जाणून घेऊन तालुका प्रशासनाने स्वत:हून पुढाकार घेऊन प्रत्येक गावातील पाहणी करून नियोजनाची अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. टँकरच्या प्रस्तावानंतर टँकर सुरू झालेले आहेत. तरी ही गावपातळीवरील राजकारणाचा फटका अनेक वाड्या व वस्त्यांना बसतो, हा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता नियोजन आवश्यक आहे. पुरंदर तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणीसाठाही अल्पच असल्याने येथून करण्यात येणारा पाणीपुरवठा हा गाळमिश्रित व अशुद्ध आहे. टंचाईच्या काळात सर्वसामान्यांना अशुद्ध पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचेही नियोजन आवश्यक आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्थानिक पाणीपुरवठा योजना आहेत. त्या योजनांचे उद्भव कोरडे पडलेले आहेत. यावर्षी तालुक्यातील पश्चिम दक्षिणपट्टा वगळता इतर सर्वच खेड्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागणार आहेत. (वार्ताहर)