शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा तातडीने घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकरभरतीवर अप्रत्यक्ष बंदीच ...

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकरभरतीवर अप्रत्यक्ष बंदीच सरकारने आणलेली आहे. त्यामुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. परीक्षार्थी खूप नैराश्यात आहेत. शासनस्तरावरून म्हणाव्या तशा उपाययोजना केल्या जात नाहीत. राज्य शासनाला आदेश देऊन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे. तसेच रखडलेल्या परीक्षा तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

एमपीएससीच्या गट-क, कृषी सेवा, आणि वन सेवा या २०२० च्या जाहिराती २०२१ संपायला आले तरीही आलेल्या नाहीत. या पदभरती तत्काळ जाहीर करण्यात याव्या. फेब्रुवारी २०२१ ला झालेली आरोग्य भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांमध्ये, खासगी कंपन्याद्वारा होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी यापुढील गट-क आणि गट-ड पदांच्या सर्व परीक्षा एमपीएससीव्दारे घेण्यात याव्या.

-----

एमपीएससीची सदस्य संख्या वाढवा

मागील दोन वर्षात काेरोनाचे थैमान असताना स्पर्धा परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत आणि नवीन जाहिरातीही आलेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक विद्यार्थी वय संपल्यामुळे एज बार झालेले आहेत, म्हणून सरसकट सगळ्या परीक्षांच्या वय मर्यादेत दोन वर्षाची सूट जाहीर करावी. एमपीएससीचे वेळापत्रक यूपीएससीप्रमाणे एक वर्षाआधी जाहीर करण्यात यावे. एमपीएससीचे काही सदस्य येणाऱ्या काळात निवृत्त होत आहेत, त्यांची निवड प्रक्रिया आताच सुरू करावी. एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या १५ ते २० पर्यंत वाढविण्यात यावी. रखडलेले निकाल लवकरात लवकर लावावेत.

----

धनगर, वंजारी समाजावर अन्याय

पोलीस भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविण्यात यावी. दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षकपद भरती लवकरात लवकर राबवावी. शालीय आणि महाविद्यालयीन फी कपात १५ टक्के कपात करण्यात यावी. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी धनगर एनटी-सी व वंजारी एनटी-डी या समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जागा वाढून मिळव्यात. २०२० साली जाहीर झालेल्या जाहिरातीत धनगर समाजाला २ जागा व वंजारी समाजाला एकही जागा मिळाली नाही. हा या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असे विद्यार्थी महेश घरबुडे याने सांगितले.