शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा तातडीने घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकरभरतीवर अप्रत्यक्ष बंदीच ...

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकरभरतीवर अप्रत्यक्ष बंदीच सरकारने आणलेली आहे. त्यामुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. परीक्षार्थी खूप नैराश्यात आहेत. शासनस्तरावरून म्हणाव्या तशा उपाययोजना केल्या जात नाहीत. राज्य शासनाला आदेश देऊन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे. तसेच रखडलेल्या परीक्षा तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

एमपीएससीच्या गट-क, कृषी सेवा, आणि वन सेवा या २०२० च्या जाहिराती २०२१ संपायला आले तरीही आलेल्या नाहीत. या पदभरती तत्काळ जाहीर करण्यात याव्या. फेब्रुवारी २०२१ ला झालेली आरोग्य भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांमध्ये, खासगी कंपन्याद्वारा होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी यापुढील गट-क आणि गट-ड पदांच्या सर्व परीक्षा एमपीएससीव्दारे घेण्यात याव्या.

-----

एमपीएससीची सदस्य संख्या वाढवा

मागील दोन वर्षात काेरोनाचे थैमान असताना स्पर्धा परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत आणि नवीन जाहिरातीही आलेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक विद्यार्थी वय संपल्यामुळे एज बार झालेले आहेत, म्हणून सरसकट सगळ्या परीक्षांच्या वय मर्यादेत दोन वर्षाची सूट जाहीर करावी. एमपीएससीचे वेळापत्रक यूपीएससीप्रमाणे एक वर्षाआधी जाहीर करण्यात यावे. एमपीएससीचे काही सदस्य येणाऱ्या काळात निवृत्त होत आहेत, त्यांची निवड प्रक्रिया आताच सुरू करावी. एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या १५ ते २० पर्यंत वाढविण्यात यावी. रखडलेले निकाल लवकरात लवकर लावावेत.

----

धनगर, वंजारी समाजावर अन्याय

पोलीस भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविण्यात यावी. दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षकपद भरती लवकरात लवकर राबवावी. शालीय आणि महाविद्यालयीन फी कपात १५ टक्के कपात करण्यात यावी. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी धनगर एनटी-सी व वंजारी एनटी-डी या समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जागा वाढून मिळव्यात. २०२० साली जाहीर झालेल्या जाहिरातीत धनगर समाजाला २ जागा व वंजारी समाजाला एकही जागा मिळाली नाही. हा या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असे विद्यार्थी महेश घरबुडे याने सांगितले.