शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा: राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी ...

पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली.

कुल म्हणाले की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना मागील तीन महिन्यांपासून कागदावरच आहे. ती स्थगित झालेली असून, त्वरित सुरू करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भाग आणि जनता ही कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतीचे भवितव्य हे पाण्यावर अवलंबून असते. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या योजनांचा कुठल्याही प्रकारचा निधी काही मराठवाड्याच्या अनुशेषाच्या नावाखाली नवीन काम हाती न घेणे हे आम्ही समजू शकतो. अब्जावधी रुपयांच्या योजना ना दुरुस्त असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी नाश होतेय. एका बाजूने आपण जलयुक्त शिवारसारखी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगली योजना राबवण्याचा प्रयत्न केला. याचा जिरायत भागात फायदा झाला. पाणी असता ते शेतापर्यंत नेण्याची व्यवस्थेची मात्र दुरवस्था झाली आहे.

जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पशुधन मारले गेले आहे. ज्या शेतकऱ्यांना वन विभागाच्या जमिनी महसूल विभागाने दिल्या. १९८० पूर्वी निर्वणीकरणाचे अधिकारी आणि वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आणि १९८० चा केंद्र सरकारचा वनसंवर्धन कायदा आल्यानंतर मात्र अतिशय अडचण त्या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र असे आहे की, ते महसूल विभागाने वाटले. परंतु, केंद्राच्या कायद्यामुळे आज कुठल्याही वहिवाटीला तसेच नवीन काही करायला अडचण येत आहे.