शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा: राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:10 IST

पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी ...

पाटेठाण : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना तातडीने सुरू करा, यासोबतच ग्रामीण भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली.

कुल म्हणाले की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही योजना मागील तीन महिन्यांपासून कागदावरच आहे. ती स्थगित झालेली असून, त्वरित सुरू करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भाग आणि जनता ही कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. शेतीचे भवितव्य हे पाण्यावर अवलंबून असते. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या झालेल्या योजनांचा कुठल्याही प्रकारचा निधी काही मराठवाड्याच्या अनुशेषाच्या नावाखाली नवीन काम हाती न घेणे हे आम्ही समजू शकतो. अब्जावधी रुपयांच्या योजना ना दुरुस्त असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी नाश होतेय. एका बाजूने आपण जलयुक्त शिवारसारखी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगली योजना राबवण्याचा प्रयत्न केला. याचा जिरायत भागात फायदा झाला. पाणी असता ते शेतापर्यंत नेण्याची व्यवस्थेची मात्र दुरवस्था झाली आहे.

जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पशुधन मारले गेले आहे. ज्या शेतकऱ्यांना वन विभागाच्या जमिनी महसूल विभागाने दिल्या. १९८० पूर्वी निर्वणीकरणाचे अधिकारी आणि वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आणि १९८० चा केंद्र सरकारचा वनसंवर्धन कायदा आल्यानंतर मात्र अतिशय अडचण त्या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र असे आहे की, ते महसूल विभागाने वाटले. परंतु, केंद्राच्या कायद्यामुळे आज कुठल्याही वहिवाटीला तसेच नवीन काही करायला अडचण येत आहे.