शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वणवा पेटवणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: January 24, 2017 01:30 IST

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरात दर उन्हाळ्यात वणवा पेटवल्याने हजारो एकर गवत, झाडेझुडपे त्याचबरोबर निष्पाप

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरात दर उन्हाळ्यात वणवा पेटवल्याने हजारो एकर गवत, झाडेझुडपे त्याचबरोबर निष्पाप वन्यप्राणी जळून नष्ट होत आहेत. अज्ञानामुळे वणवा लावण्याचे प्रकार होत आहेत. वन विभागाकडून अशा लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच, वणवा लावण्याचे प्रकार कमी होऊन जंगलांचे संरक्षण होईल, अशी मागणी भोर तालुक्यातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.भोर तालुक्याचा पश्चिम भाग सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आहे. या भागात गवताचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात हिरवेगार गवत वृक्षवेलींची घनदाट झाडी यांमुळे डोंगरदऱ्यात ससा, हरिण, तरस, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, काळवीट, मोर, वाघ, लांडोर असे लहान-मोठे प्राणी याशिवाय विविध प्रकारचे पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. मात्र, दर वर्षी शेतकरी वणवा पेटवत असल्याने जंगलातील पशुपक्षी, औषधी वनस्पती व संपूर्ण जंगलच नष्ट होत आहे.वणवा लावण्याने त्या जागेवर गवत चांगले उगवते आणि उत्पन्नातही वाढ होते, या गैरसमजापोटी शेकडो एकर डोंगररांगेतील गवत रात्रीच्या वेळी वणवा लावल्याने जळून खाक होते.वन विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गावोगावी वनसंरक्षण समित्यास्थापन केल्या आहेत. त्यात गावातील लोकांचा सहभाग आहे. मात्र, अनेक गावांतील समित्या प्रभावीपणे काम करीत नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांत व समित्यांमध्ये वणवा लावण्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल जनजागृती वन विभागकडून केली जाते. अनेक गावांत वन विभागाने गॅसचे वाटप केल्यामुळे ग्रामीण भागात जंगलतोड अत्यंत कमी झाली आहे.(वार्ताहर)