शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

तहसीलदार मागतात रेशनिंगच्या प्रत्येक कट्ट्याला १0 रुपये

By admin | Updated: January 28, 2015 23:42 IST

रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा

मार्गासनी : रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा गंभीर आरोप करून कर्मचा-यांनी त्यांच्या काळ्या कारभाराचा भंडाफोड केला.गेल्या काही दिवसांपासून वेल्हेचे तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यापार्श्वभूमीवर मंगळवारी तहसील कार्यालयात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदारांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप केले. तहसीलदार कचेरीतील कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलून मानसिक, शारीरिक व आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. यानंतर तहसीलदारांनी महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष व येथील अव्वल कारकून प्रकाश धानेपकर यांनी कर्मचाऱ्यांच्या सह्या दबावाखाली घेतल्या असून, ते कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप केला होते. यापार्श्वभूमीवर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस विनायक राऊत, विभागीय कोषाध्यक्ष अंकुश अटोळे यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यात कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.बैठकीच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या निवेदनावर आम्ही कोणाच्याही दबावाखाली सह्या केल्या नसून, तहसीलदार तक्रारीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करीत आहेत, अशी भूमिका मांडली. मंडलाधिकारी एम. पी. नेरेकर यांनी सांगितले, की तहसीलदारांनी पगार सात-सात महिने थांबवला. कर्मचाऱ्यांच्या आजारी वडिलांनी विनंती करूनदेखील पगार काढला नाही. नंतर प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यावर पगार देण्यात आला. एन.जी. भाट यांनी तहसीलदार अर्वाच्च भाषा वापरत असल्याचे सांगितले, तर सागर तिडके यांनी ते मानसिक त्रास देतात, असे सांगितले.गोडाऊनकिपर एस. एस. रोकडे यांनी, तर तहसीलदारांनी रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपयांची मागणी माझ्याकडे केली. तालुक्यात दरमहा सरासरी चार हजार कट्टा येत असून, दहा रुपयांप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी ते माझ्याकडे करीत आहेत. शिवाय महिन्याप्रमाणे मागील सहा महिन्यांचे मिळून दोन लाख चाळीस हजार रुपये आणा, आसा आदेशच त्यांनी दिला आहे. दिवाळीमध्ये आलेल्या साखरेमधील सात पोती साखर त्यांनी बाजूला काढून ठेवावयास सांगितल्याचेही रोकडे यांनी सांगितले. तसेच, चव्हाण यांनी अक्कलकोट येते कार्यरत असतानाचे २०१२ चे अपूर्ण काम येथील कर्मचाऱ्यांकडून २०१४ मध्ये करून घेतल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)