शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

तहसीलदार मागतात रेशनिंगच्या प्रत्येक कट्ट्याला १0 रुपये

By admin | Updated: January 28, 2015 23:42 IST

रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा

मार्गासनी : रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा गंभीर आरोप करून कर्मचा-यांनी त्यांच्या काळ्या कारभाराचा भंडाफोड केला.गेल्या काही दिवसांपासून वेल्हेचे तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यापार्श्वभूमीवर मंगळवारी तहसील कार्यालयात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदारांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप केले. तहसीलदार कचेरीतील कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलून मानसिक, शारीरिक व आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. यानंतर तहसीलदारांनी महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष व येथील अव्वल कारकून प्रकाश धानेपकर यांनी कर्मचाऱ्यांच्या सह्या दबावाखाली घेतल्या असून, ते कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप केला होते. यापार्श्वभूमीवर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस विनायक राऊत, विभागीय कोषाध्यक्ष अंकुश अटोळे यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यात कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.बैठकीच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या निवेदनावर आम्ही कोणाच्याही दबावाखाली सह्या केल्या नसून, तहसीलदार तक्रारीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करीत आहेत, अशी भूमिका मांडली. मंडलाधिकारी एम. पी. नेरेकर यांनी सांगितले, की तहसीलदारांनी पगार सात-सात महिने थांबवला. कर्मचाऱ्यांच्या आजारी वडिलांनी विनंती करूनदेखील पगार काढला नाही. नंतर प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यावर पगार देण्यात आला. एन.जी. भाट यांनी तहसीलदार अर्वाच्च भाषा वापरत असल्याचे सांगितले, तर सागर तिडके यांनी ते मानसिक त्रास देतात, असे सांगितले.गोडाऊनकिपर एस. एस. रोकडे यांनी, तर तहसीलदारांनी रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपयांची मागणी माझ्याकडे केली. तालुक्यात दरमहा सरासरी चार हजार कट्टा येत असून, दहा रुपयांप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी ते माझ्याकडे करीत आहेत. शिवाय महिन्याप्रमाणे मागील सहा महिन्यांचे मिळून दोन लाख चाळीस हजार रुपये आणा, आसा आदेशच त्यांनी दिला आहे. दिवाळीमध्ये आलेल्या साखरेमधील सात पोती साखर त्यांनी बाजूला काढून ठेवावयास सांगितल्याचेही रोकडे यांनी सांगितले. तसेच, चव्हाण यांनी अक्कलकोट येते कार्यरत असतानाचे २०१२ चे अपूर्ण काम येथील कर्मचाऱ्यांकडून २०१४ मध्ये करून घेतल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)