शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार मागतात रेशनिंगच्या प्रत्येक कट्ट्याला १0 रुपये

By admin | Updated: January 28, 2015 23:42 IST

रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा

मार्गासनी : रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा गंभीर आरोप करून कर्मचा-यांनी त्यांच्या काळ्या कारभाराचा भंडाफोड केला.गेल्या काही दिवसांपासून वेल्हेचे तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यापार्श्वभूमीवर मंगळवारी तहसील कार्यालयात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदारांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप केले. तहसीलदार कचेरीतील कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलून मानसिक, शारीरिक व आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. यानंतर तहसीलदारांनी महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष व येथील अव्वल कारकून प्रकाश धानेपकर यांनी कर्मचाऱ्यांच्या सह्या दबावाखाली घेतल्या असून, ते कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप केला होते. यापार्श्वभूमीवर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस विनायक राऊत, विभागीय कोषाध्यक्ष अंकुश अटोळे यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यात कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.बैठकीच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या निवेदनावर आम्ही कोणाच्याही दबावाखाली सह्या केल्या नसून, तहसीलदार तक्रारीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करीत आहेत, अशी भूमिका मांडली. मंडलाधिकारी एम. पी. नेरेकर यांनी सांगितले, की तहसीलदारांनी पगार सात-सात महिने थांबवला. कर्मचाऱ्यांच्या आजारी वडिलांनी विनंती करूनदेखील पगार काढला नाही. नंतर प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यावर पगार देण्यात आला. एन.जी. भाट यांनी तहसीलदार अर्वाच्च भाषा वापरत असल्याचे सांगितले, तर सागर तिडके यांनी ते मानसिक त्रास देतात, असे सांगितले.गोडाऊनकिपर एस. एस. रोकडे यांनी, तर तहसीलदारांनी रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपयांची मागणी माझ्याकडे केली. तालुक्यात दरमहा सरासरी चार हजार कट्टा येत असून, दहा रुपयांप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी ते माझ्याकडे करीत आहेत. शिवाय महिन्याप्रमाणे मागील सहा महिन्यांचे मिळून दोन लाख चाळीस हजार रुपये आणा, आसा आदेशच त्यांनी दिला आहे. दिवाळीमध्ये आलेल्या साखरेमधील सात पोती साखर त्यांनी बाजूला काढून ठेवावयास सांगितल्याचेही रोकडे यांनी सांगितले. तसेच, चव्हाण यांनी अक्कलकोट येते कार्यरत असतानाचे २०१२ चे अपूर्ण काम येथील कर्मचाऱ्यांकडून २०१४ मध्ये करून घेतल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)