शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पालिकेकडून जादा दराने ताडपत्रीची खरेदी

By admin | Updated: June 19, 2017 05:22 IST

आषाढी वारीतील वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकमत प्रतिनिधींनी शहरातील बाजारपेठेत जाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढी वारीतील वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ताडपत्री खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकमत प्रतिनिधींनी शहरातील बाजारपेठेत जाऊन ताडपत्रीच्या दरांबाबत चौकशी केली, माहिती घेतली. तसेच आॅनलाइन सर्च केल्यानंतर विविध वितरकांशी बोलल्यानंतर ताडपत्रीत संख्येनुसार दर कमी-अधिक होत असल्याचे कळाले. दोन हजार रुपयांपासून अडीच हजार रुपयांपर्यंत ताडपत्री मिळत असल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात ताडपत्रीत घोळ झाल्याचे उघड होते. प्रशासनाने रेट अ‍ॅनालिसीस केले नसून यात महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांची रिंग झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यात येते. गेल्या वर्षी वारकऱ्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण गाजले होते. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता गेली होती. सत्तांतर होऊन भारतीय जनता पक्षाच्या हाती सूत्रे सोपविली गेली. पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपाच्या कालखंडातही पूर्वीसारखीच परिस्थिती आहे. प्रतिताडपत्री एक हजाराचा गैरव्यवहारबाजारात २४०० रुपयांपर्यंत मिळणारी ताडपत्री भाजपाने ३४१२ रुपयांना खरेदी केली आहे. ६५० ताडपत्री खरेदी करण्यात येणार होत्या. वाढीव दरानुसार २२ लाख १७ हजार ८०० रुपये खर्च अपेक्षित होता. २४०० रुपये दर अपेक्षित धरल्यास १५ लाख ६० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. सुमारे सहा लाख ५७ हजार आठशे रुपयांचा गैरव्यहार झाल्याचे निश्चित झाले आहे. निविदाप्रक्रियेत ना निकोप स्पर्धा झाली ना दर पृथक्करण. कुठे गेला पारदर्शक कारभार?